सध्या शेतक-यांच्या कर्जमाफीची चर्चा जोरात आहे.महाराष्ट्रापासून मध्यप्रदेश आणि पंजाबमध्ये शेतक-यांनी आंदोलने करून सरकारला झुकण्यास भाग पाडले आहे.महाराष्ट्र सरकारही कर्जमाफीस तयार झाले आहे.मात्र केवळ कर्जमाफीने शेतक-यांच्या सर्व समस्या सुटल्या असत्या तर प्रतिदिवस शेतक-यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आल्या नसत्या.यापूर्वी सुद्धा शरद पवार मुख्यमंत्री असताना शेतक-यांचे कर्जमाफ करण्यात आले होते मात्र तरी शेतक-यांच्या आत्महत्या न थांबता याच्या प्रमाणात वाढच होत गेली.कर्जमाफी ही शेतक-यांच्या समस्यांवरिल तात्पुरती मलमपट्टी आहे.शेतक-यांच्या समस्यांवर दिर्घकालिन उपाययोजना करणे गरजेचे आहे.आत्ताच सरकारला जाग आली नाही तर शेती सोडणा-यांची संख्या वाढत जाईल.देशासाठी अन्न-धान्याचे उत्पादन करणा-या शेतक-यांची झोळी खाली असेल तर , देशाचे पोट जास्त दिवस भरू शकणार नाही.देशासाठी अन्न , फळे आणि भाज्यांचे उत्पादन करणारा शेतकरी आज जर रडत आहे , आत्महत्या करत आहे तर याला फक्त सरकारच जबाबदार नाही तर ती यंत्रणा आहे जीने फक्त धान्याच्या किंमती पासून पुरवठयापर्यंत आपले नियंत्रण ठेवले आहे. मृत्यूला कवटाळणारा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.