सध्या भारत आणि चीन यांच्यात डोकलामवरून तणावाचे वातावरण आहे.चीन सरकार आणि तेथील सरकारी वृतपत्राने धमकी दिली आहे की , भारताने आपले सैन्य डोकलामवरून हटवावे अन्यथा युद्धास तयार रहावे.चीनच्या अशा प्रकारच्या धमक्या आणि भारतीयात त्याच्याप्रती वाढत्या तिरस्कारामुळे भारतात चीनी वस्तूंबद्दल बहिष्काराची स्थिती निर्माण झाली आहे.३० जुलैला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे प्रत्यक्ष नाव न घेता सणांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.त्यांनी म्हटले आहे की , भारतातील मातीपासून बनलेल्या मुर्त्या आणि दिवे यांचा वापर केल्याने गरिबांना रोजगार मिळेल.साहजिकच त्यांचा रोख चीनकडे होता.सध्या आर्थिक मंदीतून जात असलेल्या चीनची आर्थिक नाकेबंदी केली तरच चीनची खुमखुमी उतरेल. दरवर्षी रक्षाबंधन , गणेशोत्सव , दिपावलीच्या दरम्यान चीन मधून हजारो कोटींचा माल भारतात आयात केला जातो.भारतात चीनी वस्तूंना त्या स्वस्त असल्याने मोठया प्रमाणावर मागणी आहे.चीनी वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे या वस्तूंची निर्मीती करणारे स्वदेशी उदयोग संकटात सापडले असून हळू-हळू ते लयाला जात आहेत.डोकलाम विवादावरून च...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.