मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आजचा दिवस महत्वाचा.

                        आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.सोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही बोलणार आहेत.जेंव्हापासून भारताने काश्मीरमधुन कलम ३७० हटवले आहे तेंव्हापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.जगाचे लक्ष काश्मीर मुद्दयाकडे वळवण्यासाठी आणि या प्रश्नावर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थी करावी म्हणून पाकिस्तानने सर्व आघाडयांवर प्रयत्न करून पाहिले मात्र त्याला तोंडघशी पडावे लागले आहे.भारताने हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हा मुद्दा ईथे मांडण्यास विरोध दर्शवला आहे तर दूसरीकडे पाकिस्तानने हा मुद्दा मांडण्याचे साफ संकेत दिले आहेत.पाकिस्तान काश्मीर मुद्दयाबाबतीत संयुक्त राष्ट्र महासभेच्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल तर भारताचा भर नेहमीप्रमाणे दहशतदावाचा मुद्दा सर्वोपरी करण्यावर असेल.पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेवून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा नेहमी प्रयत्न करत आला आहे.कलम ३७० हटवल्यानंतर तर पाकव्याप्त काश्मीर मधुन मोठया प्...

सावधान!आपण कॅमेराच्या नजरेखाली आहात..

लोकांना वाटते की,देशात सकारात्मक बदल कोणी नेता वा अधिकारी घडवून आणेल.मात्र वास्तविकता ही आहे की,ही क्रांती व्हिडिओ आणि कॅमेरा घडवून आणेल.कॅमेरा हे एक अद्भुत माध्यम आहे.याचा दृक आणि श्राव्य दोन्ही माध्यम म्हणून हवा तसा वापर करता येतो,म्हणजे याला डोळेही आहेत आणि वाचाही.आता हेच बघा ना,नेता असो वा अधिकारी,पोलिस असो वा पत्रकार,सज्ज्न असो वा दुर्जन सगळे कॅमेराच्या नजरेखाली आहेत.आपण सोशल मीडियावर काय करत आहात,कसे नाचत आहात,आपलं करिअर बनवण्यासाठी किती जणांपुढे नतमस्तक होत आहात,फिरायला कुठे गेला आहात अथवा अमक्या कडून पाचशे रुपयांची लाच घेतली सर्व काही पुराव्यासह ऑनलाईन आहे ते केवळ या कॅमेराच्या जादुमुळे. अगोदर वर्तमानपत्र अथवा चॅनलवाले पत्रकार होते,आता सामान्य जनताही पत्रकार आहे.हातात मोबाईल फोन घेवून लोक आता कुणाचाही समाचार घेतात,मग त्यातुन नविन मोटार वाहतुक नियमानूसार दंड आकारणारे पोलिसही सुटले नाहीत.सर्व जण कॅमे-यामुळे स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची अनुभूती करतायत.हेच काय पोलिस सुद्धा आता हातात बंदुक अथवा लाठी घेण्याऐवजी कॅमेराचा आधार घेत आहेत.राजकिय सभा असो वा मिरवणुक त्यावर ड्रोन कॅमेराच...

भारतीय युवकांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण

म नुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा अशा स्थिती निर्माण होतात जेंव्हा तो हतबल होवून जातो , परिस्थितीशी दोन हात करू शकत नाही. जेंव्हा त्याला कोणताच मार्ग दिसत नाही तेंव्हा एकच मार्ग त्याच्या पूढे शिल्लक राहतो तो म्हणजे आत्महत्येचा. आत्महत्या हा आत्मघाती निर्णय आहे. आत्महत्या कोणीही करू शकतो. उच्च शिक्षित , अभिनेता , राजकिय नेता , वैज्ञानिक , महिला , युवक वा सामान्य माणुस. आत्महत्येचे प्रमाण सुशिक्षित लोकात कमी आहे किंवा ते आत्महत्या करत नाहीत असा गैरसमज लोकात आहे. भारतात अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यात आपल्या आयुष्यात यशस्वी असलेल्या लोकांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशी उदाहरणे जेंव्हा समोर येतात तेंव्हा सामान्य माणुस हा विचारही करू शकत नाही की , संबंधीत व्यक्ती अशा प्रकारचा निर्णयही घेवू शकते. देशात कित्येक आयपीएस , आएएस , राजकिय नेते , उद्योगपती आणि चित्रपट नायक-नायिकांनी नैराश्यात येवून आत्महत्या केल्या आहेत. मागे राष्ट्रसंत भैय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. आत्महत्या करण्यापासून व्यक्ती स्वत:ला वेळीच रोखू शकतो मात्र त्याची व...

'सर्जा-राजा'च्या सणावर दुष्काळाचे सावट

 श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात.पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते.संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं.अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा'.यावर्षी मात्र महाराष्ट्रात सरासरीच्या ४० टक्केच पाऊस झाल्याने मराठवाडा,खानदेश आणि विदर्भात भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे या भागात आज हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्याची चिन्हे आहेत तर कोल्हापूर, सांगली जिल्हयात आलेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत.या शेतक-यांच्या डोळ्यात आज आपल्या जिवापाड जपलेल्या बैलजोडीची आठवण येवून अश्रु आल्याशिवाय राहणार नाहीत.             पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.पोळ्याला त्यांना नदी,ओढय़ात नेऊन धुण्यात येते.न...

हतबल पाकिस्तान

काश्मीरमध्ये सरकारने केलेला घटनात्मक आणि प्रशासकिय बदल किती मोठे पाऊल आहे ही गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आता आली असेल.५ ऑगस्टला कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सरकार भारताला घेरण्याच्या प्रयत्नात आहे.१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती आरिफ अल्वींचे संपूर्ण भाषण यावरच केंद्रीत होते.पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी यादिवशी पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत भाषण केले.ते तिथे येण्यापूर्वी अनेक केंद्रीय मंत्री अगोदरच उपस्थित होते.पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक पत्रकार परिषदही आयोजित केली होती. पाकिस्तानच्या हालचालीवरून असे वाटते की,जणू काश्मीर मधून कलम ३७० हटविण्याऐवजी बलुचिस्तान,गिलगित सोबत संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरच नाही तर आणखीन काही प्रदेश पाक कडून भारताने हिरावून घेतला आहे.पाकिस्तानने भारतासोबत राजकिय संबंध कमी करण्यासोबत,रेल्वे-बस सेवा बंद करणे,व्यापार ईत्यादी बंद करणे अशी पाऊल उचलून काय साधण्याचा प्रयत्न केला माहित नाही.पूर्ण पाकिस्तान या गोंधळात पडला आहे की,भारताच्या विरोधात कोण-कोणते पर्याय अवलंबता येतील.याचा निष्कर्...

धाडसी परंतु ऐतिहासिक निर्णय

 सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.काश्मीरवरील सर्व अटकळ व शंका संपुष्टात आल्या.मोदी सरकारच्या मिशन काश्मीरचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यातून कलम ३७० हटविण्यात आले आहे,सोबत जम्मू-काश्मीरला विशेष नागरी दर्जा देणारे कलम- ३५अ रद्द करण्यात आले आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ते हटवण्याची शिफारस केली.काश्मीरचे विभाजन करून लडाख व जम्मू हे दोन केंद्रशासित राज्य अस्तीत्वात येणार आहेत.तेथील परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना परत राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे मतांचे राजकारण करणारे विरोधक,काश्मीरमधील फुटीरतावादी आणि पाकिस्तानचा या निर्णयामुळे तिळपापड झाला असून त्यांच्याकडे स्वत:च्या डोक्याला हात लावून बसण्याशिवाय हाती काहीही राहिले नाही.या निर्णयामुळे काश्मीरच्या सुवर्णयुगाला पुन्हा सुरूवात होईल. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेबाबत निश्चितच मोठा निर्णय घेतला आहे.कलम ३५अ मुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा व सुविधा देण्यात आल्या होत्या.हे कलमच आता रद्द करण्यात आल्याने आता आपण तेथे जमीन खरेदी क...

मुस्लिम महिलांना दिलासा नाहीच.

३० जुलैला लोकसभेनंतर राज्यसभेतही तीन तलाक विरोधी कायदा संमत झाला.या कायदयाला मुस्लिम महिला विधेयक(विवाह अधिकार संरक्षण) २०१९ असे नाव देण्यात आले आहे.यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने याला कायदयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिलांकडून सुरू असलेल्या संघर्षाने जनमानसाच्या मनात जागा केली.ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचल्यानंतर संसदेत यावर चर्चा होवून याचे कायदयात रूपांतर झाले आहे.या कायदयातील तरतुदींनूसार तीन तलाक म्हणणा-या पतीला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा होईल तसेच हा गुन्हा अजामिनपात्र असेल.या कायद्यामुळे खरच मुस्लिम महिलांना संरक्षण लाभेल का?मुस्लिम महिलांचे केवळ या कायदयामुळे प्रश्न सुटतील का? समाजातील अनेक वाईट चालीरिती आणि रूढींविरोधात यापूर्वीही अनेक कायदे होवूनही म्हणावा तसा फरक पडलेला नाही.बाल विवाह विरोधी कायदा होवूनही दरवर्षी हजारो बाल विवाह होतात.सती प्रथेच्या विरोधात बंगाल सती रेग्युलेशन १८२९ पासून सती निवारण अधिनियम १९८७ पर्यंत सुधारणा करूनही अलिकडच्या काळातही सती बनवल्या गेल्याच्या घटना कानावर येतात.कौटुंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायदा...