मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१८ वर्षापर्यंतच्या मुलांना मिळावे मोफत आणि सक्तीचे शिक्षण

बाल मजुरी विरोधात काम करणारे कैलाश सत्यार्थी यांच्या बाल संस्थेमार्फत दिल्ली मध्ये आयोजित शिक्षणाच्या राष्ट्रीय संमेलनात कधी काळी खाणीत बाल मजुरी करणारी ब्रिटनच्या प्रतिष्ठित डायना पुरस्काराने सन्मानित १३ वर्षांची चंपा बोलत होती.ती आता ८ वी मध्ये शिकते.चंपाने सांगितले की,‘मलाही शाळा सोडावी लागली होती,कारण शिक्षण ही माझ्या कुटुंबाची प्राथमिकता नव्हती.मी माझ्या गावातील खाणीत काम करायचे.बाल मजुरीच्या दलदलीतून मुक्त करून मला एका सरकारी शाळेत प्रवेश दिला गेला.ज्यामुळे मी आज ईथे आहे.माझे हे मानने आहे की शिक्षण हे एकमेव हत्यार आहे जे माझ्यासारख्या बाल मजुरांची रक्षा करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते.त्यामुळे माझी ईच्छा आहे की,सर्व मुले शाळेत शिकावित.’या संमेलनात अनेक खासदार,अधिकारी,न्यायाधिश,पोलिस अधिकारी आणि बाल अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.चंपा आता राष्ट्रीय बाल पंचायतची उपाध्यक्ष आहे.छोटया चंपाने आपल्या अनुभवातुन जी गोष्ट समोर ठेवली तिचा खोल नीतितार्थ आहे. या नीतितार्थला समजण्यापूर्वी जरा ही आकडेवारी पाहू या.भारत सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या एका अहवालानुसार देशात...

सामुहिक आत्महत्येच्या दिशेने

मागिल काही काळात लोकप्रिय झालेल्या चित्रपट मालिका अवेंजर्सचा खलनायक थैनोस विश्वाला वाचवण्यासाठी पृथ्वीवरिल अर्ध्या मानव जातीला नष्ट करतो.थैनोस असे मानतो की,मानवाने पर्यावरण आणि संसाधनांचा नाश करून संपुर्ण विश्वाला धोका निर्माण केला आहे त्यामुळे मानव जातीला समुळ नष्ट केले पाहिजे.या चित्रपटाचे नायक थैनोस विरुद्ध महायुद्ध लढतात आणि शेवटी यशस्वी होतात.मात्र वास्तवात जे होत आहे ते याच्या एकदम उलट आहे.कोण्या थैनोसला आपल्याला नष्ट करण्यासाठी कष्ट करण्याची गरजच नाही कारण या पृथ्वीवर राहणा‌-या आपण मानवांनी अगोदरच सामुहिक आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे.एवढच नाही तर आपण चार अरब वयस्क,तीन अरब बालक आणि युवकांना सुद्धा मृत्युच्या दाढेकडे ओढत नेत आहोत जे या पापात कधीच भागिदार नव्हते. पर्यावरणाच्या अभ्यासातुन येणा-या जवळपास सर्व संशोधनांतुन असे दिसते की,धोक्याची घंटा सगळीकडुन वाजत आहे आणि आता सर्वांना याचा अंदाज आला आहे की,मानवाच्या स्वार्थ आणि अत्याचारामुळे पृथ्वीची सहनशक्ती आता संपली आहे.जीवनावश्यक हवा आणि पाणी विषारी होत आहे.भुगर्भातील खनिज संपत्तीचे साठे संपत चालले आहेत.जागतीक तापमानात ...

जीवनाचा खरा आनंद महिलांकडुन शिका

नुकतेच एक संशोधन आले आहे.जे पुरूष महिलांच्या सान्निध्यात राहतात त्यांच्यामधे तणाव आणि नैराश्य कमी निर्माण होते.एवढेच नाही तर ज्या महिला महिलांच्या सान्निध्यात अधिक राहतात त्यांची सुद्धा तणाव आणि नैराश्यासंबंधीची तक्रार कमी असते.याचा अर्थ महिलांच्या सान्निध्यात राहिल्याने तुम्ही स्वत:ला अनेक आजारांपासून वाचवू शकता.असा बिलकुल विचार करू नका की हा केवळ विचार आहे.हे एक वैज्ञानिक सत्य आहे. गोष्ट ही आहे की,पुरूषांचा मेंदु चौकोनी असतो.जो अनेक खान्यात विभागलेला असतो.एकात काम,दुस-यात आराम,तिस-यात प्रसिद्धी आणि चौथ्यात पैसा.मी इथं चार खाने लिहीली आहेत याचा अर्थ असा नाही की केवळ ही चार खानी असतात.असु शकत,शंभर खाने असतील.पुरूष वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करू शकतात.महिलांचा मेंदु मात्र गोलाकार असतो.थांबा,अस मी म्हणताच आपण मेंदुचा एक्स रे घेवून बसु नका की पाहु कुठे चौकोनी असतो आणि कुठे गोल?भौतीक स्वरूपात महिला आणि पुरूषांचा मेंदु एकसारखाच असतो मात्र महिलांचा मेंदु मी यासाठी गोल म्हणतोय कारण त्यांच्या मेंदुत वेगवेगळया खान्यांच्या सीमा असत नाहीत.एक महिला स्वयंपाक करता-करता मुलांचा गृ...

जग आर्थिक मंदीच्या खाईत

नुकतच केंद्र सरकारने आपल्या ५० लाख कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.६५ लाख पेंशन धारकांनाही याचा लाभ होईल.हा निर्णय जुलै २०१९ पासून लागु होईल.सरकारच्या तिजोरीवर या निर्णयामुळे १५,९०९ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या म्हण्यानुसार महागाई भत्त्यात एवढी वाढ एकाचवेळी कधीच करण्यात आली नव्हती.सरकार या कर्मचा-यांच्या हातात पैसा यासाठी देत आहे कारण बाजारपेठेत कमालीची मंदी आली आहे.कर्मचारी पैसा खर्च करतील त्यामुळे मागणी वाढेल.दिवाळी सणात चांगली उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.केवळ भारतच नाही तर जगातील ९० टक्के देश आर्थिक मंदीमुळे सध्या त्रस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे प्रबंध निर्देशक क्रिस्टालिना जियॉरजीवा यांनी म्हटले आहे की,जग आर्थिक मंदीच्या खाईत आहे.जगाची अर्थव्यवस्था वाढत आहे मात्र वाढण्याचा वेग कमी आहे.दोन वर्षांपूर्वी जगाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत होती मात्र आज ती मंदावत चालली आहे.२०१९-२० मध्ये आर्थिक विकासाचा दर मागील दहा वर्षातील सर्वात कमी दर असेल.अमेरिका आणि जर्मनी सारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे मा...

आजचा दिवस महत्वाचा.

                        आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.सोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही बोलणार आहेत.जेंव्हापासून भारताने काश्मीरमधुन कलम ३७० हटवले आहे तेंव्हापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.जगाचे लक्ष काश्मीर मुद्दयाकडे वळवण्यासाठी आणि या प्रश्नावर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थी करावी म्हणून पाकिस्तानने सर्व आघाडयांवर प्रयत्न करून पाहिले मात्र त्याला तोंडघशी पडावे लागले आहे.भारताने हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हा मुद्दा ईथे मांडण्यास विरोध दर्शवला आहे तर दूसरीकडे पाकिस्तानने हा मुद्दा मांडण्याचे साफ संकेत दिले आहेत.पाकिस्तान काश्मीर मुद्दयाबाबतीत संयुक्त राष्ट्र महासभेच्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल तर भारताचा भर नेहमीप्रमाणे दहशतदावाचा मुद्दा सर्वोपरी करण्यावर असेल.पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेवून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा नेहमी प्रयत्न करत आला आहे.कलम ३७० हटवल्यानंतर तर पाकव्याप्त काश्मीर मधुन मोठया प्...

सावधान!आपण कॅमेराच्या नजरेखाली आहात..

लोकांना वाटते की,देशात सकारात्मक बदल कोणी नेता वा अधिकारी घडवून आणेल.मात्र वास्तविकता ही आहे की,ही क्रांती व्हिडिओ आणि कॅमेरा घडवून आणेल.कॅमेरा हे एक अद्भुत माध्यम आहे.याचा दृक आणि श्राव्य दोन्ही माध्यम म्हणून हवा तसा वापर करता येतो,म्हणजे याला डोळेही आहेत आणि वाचाही.आता हेच बघा ना,नेता असो वा अधिकारी,पोलिस असो वा पत्रकार,सज्ज्न असो वा दुर्जन सगळे कॅमेराच्या नजरेखाली आहेत.आपण सोशल मीडियावर काय करत आहात,कसे नाचत आहात,आपलं करिअर बनवण्यासाठी किती जणांपुढे नतमस्तक होत आहात,फिरायला कुठे गेला आहात अथवा अमक्या कडून पाचशे रुपयांची लाच घेतली सर्व काही पुराव्यासह ऑनलाईन आहे ते केवळ या कॅमेराच्या जादुमुळे. अगोदर वर्तमानपत्र अथवा चॅनलवाले पत्रकार होते,आता सामान्य जनताही पत्रकार आहे.हातात मोबाईल फोन घेवून लोक आता कुणाचाही समाचार घेतात,मग त्यातुन नविन मोटार वाहतुक नियमानूसार दंड आकारणारे पोलिसही सुटले नाहीत.सर्व जण कॅमे-यामुळे स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची अनुभूती करतायत.हेच काय पोलिस सुद्धा आता हातात बंदुक अथवा लाठी घेण्याऐवजी कॅमेराचा आधार घेत आहेत.राजकिय सभा असो वा मिरवणुक त्यावर ड्रोन कॅमेराच...

भारतीय युवकांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण

म नुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा अशा स्थिती निर्माण होतात जेंव्हा तो हतबल होवून जातो , परिस्थितीशी दोन हात करू शकत नाही. जेंव्हा त्याला कोणताच मार्ग दिसत नाही तेंव्हा एकच मार्ग त्याच्या पूढे शिल्लक राहतो तो म्हणजे आत्महत्येचा. आत्महत्या हा आत्मघाती निर्णय आहे. आत्महत्या कोणीही करू शकतो. उच्च शिक्षित , अभिनेता , राजकिय नेता , वैज्ञानिक , महिला , युवक वा सामान्य माणुस. आत्महत्येचे प्रमाण सुशिक्षित लोकात कमी आहे किंवा ते आत्महत्या करत नाहीत असा गैरसमज लोकात आहे. भारतात अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यात आपल्या आयुष्यात यशस्वी असलेल्या लोकांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशी उदाहरणे जेंव्हा समोर येतात तेंव्हा सामान्य माणुस हा विचारही करू शकत नाही की , संबंधीत व्यक्ती अशा प्रकारचा निर्णयही घेवू शकते. देशात कित्येक आयपीएस , आएएस , राजकिय नेते , उद्योगपती आणि चित्रपट नायक-नायिकांनी नैराश्यात येवून आत्महत्या केल्या आहेत. मागे राष्ट्रसंत भैय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. आत्महत्या करण्यापासून व्यक्ती स्वत:ला वेळीच रोखू शकतो मात्र त्याची व...