को रोनाच्या महामारीपासून बचावासाठी केलेले लॉकडाऊन संपल्यानंतर देशात सर्वात गंभीर आर्थिक संकट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जीडीपी शून्याच्या खाली जाईल अशी भीती आहे.बेरोजगारीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान मोदी सरकारने २० लाख कोटींच्या मदतीचे पॅकेज घोषित केले. यानंतर अनेक जाणकार आणि विरोधी पक्षांनी यावर टिका केली. त्यांच अस म्हणन होत की,या पॅकेजमुळे प्रभावितांना तात्काळ दिलासा मिळणार नाही. ही रक्कम सरळ-सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे. मोदी सरकारने मात्र अस न करता दुसरा मार्ग निवडला आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्र सरकारने सुरवातीला सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. हे मोठे पॅकेज जाहिर करताना मात्र मोदींनी आपल्या अनुभवाचा अतिशय प्रभावीपणे उपयोग या संकटातुन बाहेर निघण्यासाठी केल्याच त्यांच्या निकटवर्तीयांच म्हणन आहे. ही दिर्घकाळ चालणारी लढाई असुन दूरदृष्टी ठेवून आखलेल्या या पॅकेजमुळे देश पुन्हा नविन भरारी घेईल अस त्यांचे निकटवर्तीय मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या काही बैठकांमध्ये...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.