मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोरोना: आव्हान दुहेरी आणि संधी मात्र कमी

को रोनाच्या महामारीपासून बचावासाठी केलेले लॉकडाऊन संपल्यानंतर देशात सर्वात गंभीर आर्थिक संकट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जीडीपी शून्याच्या खाली जाईल अशी भीती आहे.बेरोजगारीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान मोदी सरकारने २० लाख कोटींच्या मदतीचे पॅकेज घोषित केले. यानंतर अनेक जाणकार आणि विरोधी पक्षांनी यावर टिका केली. त्यांच अस म्हणन होत की,या पॅकेजमुळे प्रभावितांना तात्काळ दिलासा मिळणार नाही. ही रक्कम सरळ-सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे. मोदी सरकारने मात्र अस न करता दुसरा मार्ग निवडला आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्र सरकारने सुरवातीला सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. हे मोठे पॅकेज जाहिर करताना मात्र मोदींनी आपल्या अनुभवाचा अतिशय प्रभावीपणे उपयोग या संकटातुन बाहेर निघण्यासाठी केल्याच त्यांच्या निकटवर्तीयांच म्हणन आहे. ही दिर्घकाळ चालणारी लढाई असुन दूरदृष्टी ठेवून आखलेल्या या पॅकेजमुळे देश पुन्हा नविन भरारी घेईल अस त्यांचे निकटवर्तीय मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या काही बैठकांमध्ये...

कोरोना योद्धयांवरिल हल्ले चिंताजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केलेल्या आव्हानानुसार देशातील जनतेने २२ मार्चला स्वयंफुर्तपणे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला होता.याच दिवशी सायंकाळचे पाच वाजताच अगदी छोटया-छोटया वस्त्यांपासून मोठया शहरांपर्यंत देशात एक अद्भुत दृश्य पहायला मिळाले होते.संपूर्ण देश टाळया-थाळ्या आणि शंखांमधुन निघणा-या स्वरांनी निनादुन गेला होता.हे संगीत होत की,गोंगाट हे सांगण अवघड आहे मात्र यातुन देशाची अखंडता दिसुन आली.याच दिवसापासून देशात जागतीक महामारी कोविड-१९ विरूद्ध युद्ध छेडले गेले जे आजपर्यंतही सुरूच आहे.कोविड-१९ विरूद्धच्या या युद्धात पहिल्या पंक्तीत उभ्या असणा-या कोरोना वारियर्ससाठी हा शंखनाद त्या टिळया सारखा होता जो पत्नी,माता आणि बहिण युद्धावर जाणा-या वीर सैनिकाच्या मस्तकावर लावून निरोप देतात.फरक मात्र एवढा होता की,हे योद्धे केवळ शस्त्रहीन नव्हते तर कवचहीन सुद्धा होते.देशाला कोरोना विरूद्धच्या लढाईत जिंकुन दयायचच या आवेशात केवळ जनतेच्या प्रेरणेच पाठबळ घेवून हे खंदे सैनिक लढाईवर निघाले.  मात्र ही विडंबना आहे की,या टाळ्यांचा स्वर लुप्त झालाच नव्हता की आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याबरोब...

कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार?

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या महामारीने लाखो लोकांना संक्रमीत केले असून जवळपास दोन लाखांच्या वर लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.हा विषाणू नविन असल्याने कोरोनावर निश्चित औषध ही उपलब्ध नाही ना लस.प्रचलित औषधांच्या साहयाने लक्षण आधारित उपचार केल्याने अनेकजण या भयंकर आजारातून बरे झाले आहेत.संपूर्ण जग या महामारीने त्रस्त असल्याने जगाची नजर कोरोनाच्या लसीकडे लागली आहे.कोरोनावरिल लस कधी उपलब्ध होईल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.याचाच आढावा घेणारा हा लेख. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवस-रात्र युद्ध स्तरावर काम सुरू आहे.या वेळी जवळपास ३५-४० प्रयोगशाळांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू आहे.काही लसींची चाचणी प्राण्यांवर केली जात आहे तर काही लसींची सरळ-सरळ मानवावर.संपूर्ण जगाला कोरोना प्रतिरोधक बनवणे वा त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे हे खूप कठिण काम आहे.एक लस तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात मात्र सध्याच्या स्थितीची गंभीरता पाहून अनेक औषध कंपन्यांनी सरकारी संस्था,सामाजिक संस्था आणि औषध नियमन संस्थांची मदत घेवून आपला शेडय...

कोरोना विरूद्ध युद्धात सोशल मीडियाचे आव्हान

को रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग राखणे खूप महत्वाचे झाले आहे.अशा काळात आपण घरामध्ये बंद असताना सोशल मीडिया हा समाजाशी जुडण्याचा एकमेव आधार झाला आहे.भारतात कोरोनाविरूद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सुरूवातीला अनेक महाभागांनी सोशल मीडिया मार्फत समाजात अफवा,सामाजिक व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने याची दखल वेळीच घेतल्याने या महाभागांच्या आसुरी आनंदावर जणू पाणी फेरले गेले.सर्वांकडे सध्या खूप फावला वेळ असल्याने सोशल मीडियावर खूप लिहिल जात आहे.कोणी कोरोनावर कविता केल्या,कोणी लॉकडाऊन मधिल आपले अनुभव शेअर केले तर कोणी यापूर्वी जगात आलेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी लिहिल.अशातच आता नविन ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे तो म्हणजे विविध प्रकारचे चॅलेंज देण्याचा.कुणा महिलेकडे साडी चॅलेंज आहे तर कुणाकडे जोडी चॅलेंज.मग यात पुरूषही कसे मागे राहतिल बरे.त्यांच्यातल कोणी दाढी चॅलेंज देत आहे तर कोणी गॉगल चॅलेंज.दिवसभर सोशल मीडियावर असच काहीस सुरू असत.अर्थात यामागे कुणाला हानी पोहचविण्याचा उद्देश नसून केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे.मात्र कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात सोशल मीडि...

आपली परंपरा आणि क्वारंटाईन

जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालय.उपचारापेक्षा प्रतिबंध हाच चांगला उपाय म्हणून जगातील सगळे लोक आपापल्या घरात बसले आहेत.अर्थात प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.कोरोना महामारी सोबत क्वारंटाईन हा शब्द जो काही काळापूर्वी आपल्याला माहित नव्हता तो सगळीकडे प्रचलित झाला आहे.नव्या पिढीसाठी क्वारंटाईन ही पद्धत नवखी असेल मात्र जगात हिचा वापर फार पूर्वी पासुन होत होता,अगदी आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा.आपल्या परंपरेत संक्रामक रोगांपासून वाचण्याचा योग्य आणि खात्रीशीर उपाय स्वत:ला दूस-यांच्या शारीरिक संपर्कापासून वेगळे ठेवणे हाच राहिला आहे.रोगी आणि निरोगी,दोघांना रोगापासून बचाव आणि आपले आरोग्यहिताच्या दृष्टीने एक उपाय म्हणून क्वारंटाईन मान्यताप्राप्त आहे. विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजार...

कोरोनाचे जगासमोर आव्हान

जग काही काळासाठी ठप्प होणार आहे का?जगातील अनेक देशांना जगाशी असलेला संपर्क तोडावा लागेल का?जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आजाराला जागतिक महामारी घोषित केले आहे.या अगोदर स्वाईनफ्ल्युला महामारी घोषित करण्यात आले होते.या विषाणुच्या संसर्गाने अनेक देशातील नागरिक बाधित झाले असुन नजिकच्या काळात याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडणार आहे.या आजाराचा फटका शेअर बाजार,अनेक व्यवसाय,सार्वजनिक उत्सवांना बसला असून या विषाणुने जगासमोर मोठे आव्हान उभा केले आहे. कोरोनामुळे चीनपेक्षा इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.ईथे १२,४६२ लोक कोरोनाने संक्रमित आढळले आहेत,८२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.संपूर्ण ईटलीमध्ये टाळेबंदी सारखी अवस्था झाली आहे.६ कोटी लोकांना एप्रिल पर्यंत घराबाहेर निघण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यांना घरातच रहावे लागेल.औषध आणि किराणा दुकाने सोडुन इटलीमध्ये सर्वकाही बंद आहे.जगाची आठवी अर्थव्यवस्था असणा-या इटलीतील दोन महत्वाची शहरं सेंट्रल मिलान आणि पीसा शहरांची स्थिती बघितली तर याचा अंदाज येतो की, ६ कोटी लोकांवर प्रतिबंध लागल्यानंतर तेथील रस्त्यांवर काय परिणाम झाला आहे.तेथील शाळा,महाविद्यालयं,...

राष्ट्रीय प्रश्नांपासून पाठ फिरवणारे प्रादेशिक पक्ष

मागिल काही दिवसात दिल्ली आणि काही अन्य विधानसभा निवडणूकांचे निकाल जर बघितले तर हे प्रश्न निर्माण होतात की,काँग्रेसचे स्थान प्रादेशिक पक्षांनी घेतले आहे?भाजपाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष अधिक सक्षम आहेत का आणि त्यांना निवडणूकीच्या मुद्दयांची अधिक चांगली माहिती आहे?लोकांनी आता काँग्रेसची साथ सोडली आहे?गांधी परिवाराची जादू आता संपली आहे?काँग्रेसने कधीच प्रादेशिक पक्षांना किंमत दिली नाही.एक काळ असा होता ज्यावेळी काँग्रेसला संपूर्ण देशात मोठा जनाधार होता.आता याच काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.काँग्रेसचे स्थान आता भाजपाने घेतले आहे का?नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सुरूवातीलाच काँग्रेसने जणू आपला पराभव स्विकारला होता.तिला तिथे सलग दूस-यांदा एकही जागा जिंकता आली नाही.भाजपाने मात्र शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.भाजपा कुठे जिंकत आहे तर कुठे तिला मोठया पराभवाला सामोरे जावे लागत आहे.मात्र ती देशातील अधिकाधिक राज्यात लढताना दिसत आहे.भारतीय राजकारणात झालेला हा खूप मोठा बदल आहे. राजकारणाच्या रणांगणात अनेक रथी-महारथी आले आहेत,जे रस्त्यावर येवून लोकांसाठ...