मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सरकारी शाळांबाबत सरकारचीच अनास्था

                मा गील आठवड्यात हरियाणा मधील १०५७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप प्रयत्न करूनही या शाळांची पटसंख्या २५ च्या पुढे जात नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आलं आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात येईल अस शिक्षण विभागाने म्हटल आहे.                        कोरोना महामारीच्या आपत्कालिन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करुन महाराष्ट्रातील १० पटसंख्येखालील ४,६९० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०२० मध्ये घेतला होता. यापैकी १,७१४ शाळा कोकणातील आहेत. राज्याच्या तुलनेत ही टक्केवारी ३६ टक्क्यांहुन जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेश मध्ये थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ३५ हजार शाळा अशाच प्रकारे समायोजित करण्यात आल्या आहेत हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.  उत्तराखंड मध्ये जवळपास सातशे सरकारी शाळांना कुलुप लावण्यात आले. इथेही तोच राग शिक्षण विभागाने आवळला होता जो आत्ता हरियाणा मध्ये...

क्रिडा क्षेत्र कोरोनाच्या सावटाखाली

        भा रतासोबत संपूर्ण जगात कोविड-१९ महामारीला सुरुवात होवुन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान या महामारीने संपूर्ण क्रिडा क्षेत्राला सुद्धा ठप्प केले होते. या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर खेळाडू परत मैदानात उतरले होते मात्र जगात काही ठिकाणी या महामारीची दुसरी आणि काही ठिकाणी तीसरी लाट सुरू झाल्यामुळे परत एकदा याचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर होत आहे. काही स्पर्धा परत एकदा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धांमधुन खेळाडूंना माघार घ्यावी लागत आहे. याच ताज उदाहरण मुष्टियोद्धाचे आहे. मागील आठवड्यात स्पेनच्या कैस्टेलियोन मध्ये झालेल्या ३५ व्या बोक्साम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या तीन मुष्टियोद्ध्यांना अंतिम फेरीत पोहचल्यानंतरही कोरोनामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले होते. अॉल्मपिकसाठी क्वालीफाय केलेला आशिष कुमारचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यासोबत एका रुममध्ये राहणारे मोहम्मद हुसामुद्दीन आणि सुमित सांगवानला सुद्धा अंतिम फेरीतुन माघार घ्यावी लागली. असं मानलं जात की, या खेळाडूंच सुवर्ण पदक जिंकण पक्क होत. केवळ मुष्टियोद्धेच नाही तर...

सिनेमा बदलतोय

    न विन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या सतत होणाऱ्या घोषणांतुन हे स्पष्ट आहे की, कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या या कठिण काळातही भारतीय चित्रपट समुदायातील लोक सक्रिय राहिले. टाळेबंदीमुळे संपूर्ण जग ठप्प पडले असताना मिळालेल्या फावल्या वेळात भावी काळातील तयारीचे नियोजन त्यांनी केले. याच कारणाने सिनेमागृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू झाल्यामुळे, कोरोनावरील लस आल्यामुळे आणि थोडाफार प्रमाणात चित्रपटांचे शुटिंग सुरु झाल्यामुळे उत्साहित झालेल्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्या नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या तारखांच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महामारीमुळे कोरड्या झालेल्या मनोरंजनाच्या मैदानात या घोषणांच्या पावसामुळे दर्शकांसाठी लवकरच चित्रपटांचे पीक बहरेल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ओटीटीच्या रुपाने नवीन बटाईदार सुद्धा उपस्थित असेल. मागिल वर्षी पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतरही चित्रपट बाजारात हालचाल झाली नाही. चित्रपटगृहे तर सुरु झाली मात्र दर्शक व चित्रपटांची तंगी राहिली. आता मात्र स्थिती सामान्य होताना दिसत आहे. मागिल महिन्यातच चित्रपट ...

आता मशिनच ऐकते सर्व दु:ख

  आ जच्या युगात विचारांच्या देवाणघेवाणीचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून इंटरनेटकडे पाहिले जाते. मात्र जसं-जस याचा उपयोग वाढत आहे संचार क्षेत्रातील मानवीयतेची जागा तंत्रज्ञान घेवू लागले आहे. मानवी चेहरा गायब आहे. ही स्थिति समस्येचे समाधान करण्याऐवजी तिला आणखीनच वाढवत आहे. मग त्या सोशल नेटवर्किंग साइट्स असो वा सेवा देणा-या ऑनलाईन कंपन्या, यातील अधिकाधिकच्या बाबतीत एकतर आपल्याला जास्त काही माहित नाही, ना आपल्या समस्या, वेदना आणि आनंद आपल्या आवाजात यांच्यापर्यंत पोहचवु शकतो. जे काही सांगायच आहे लिहुन सांगा. यानंतर या कंपन्यांच्या एखाद्या जबाबदार व्यक्तीला योग्य वाटल तर त्यांच्या सोईनुसार त्यांचा एखादा कर्मचारी आपल्याशी संपर्कही करेल. ऑक्टोंबर २०२० पर्यंत फेसबुकचे २.४५ सक्रीय ग्राहक होते. यात जगात सर्वाधिक लोकसंख्या असणा-या चीन आणि भारताच्या नागरिकांचाही समावेश आहे. आपल्याला काय आवडते, काय नाही आवडत, आपण काय खरेदी करतो, कुठे फिरायला जातो यासारखी माहितीच नाही तर आपल्या घरातील सदस्यांचे, मित्रांचे फोटो आणि व्हिडिओ सर्व काही फेसबुक आणि ट्विटर सारख्या साइटसकडे आहे. दूसरीकडे एका संस्थागत तंत्र...

ही वाट दूर जाते

अ मेरिकेनंतर भारत जगातील दूसरा असा देश आहे जिथे मोठया प्रमाणावर रस्ते आहेत. अमेरिकेकडे ६७ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळ आहे तर भारताकडे जवळपास ५९ लाख किलोमीटर. भारतात मोठया प्रमाणावर महामार्ग तयार केले जात आहेत. हे महामार्ग तयार करण्यासाठी एकीकडे मोठया प्रमाणावर झाडांची कत्तल करून बळी दिला जात आहे तर यावर होणा-या अपघातांमुळे दरवर्षी दिड लाख लोकांचाही बळी जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वेळ ही जगाची सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. मग हा वेळ वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून जास्त वेगाकडे पाहिल जात आहे. ताशी शंभर पेक्षा जास्त वेगाने वाहने धावू लागली आहेत. रस्त्यांवरिल या वेडेपणापासून महानगरातील लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुक सेवेने काही प्रमाणात वाचविले होते, मात्र कोरोनामुळे या सेवांमध्ये अनियमितता आली. याच कारणांमुळे केवळ लॉकडाऊन नंतरच्या अवधित रस्ते अपघातात ६५ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. लोकांना आपला वेळ वाचवण्यासाठी वेग हवा आहे. हा वेग़ आणखीन वाढवण्यात ऑटोमोबाईल कंपन्या जुटल्या आहेत तर सरकारं द्रुतगती मार्ग बनवुन या कामात जणु त्यांची मदत करित आहेत. अर्थशास्त्रज्ञानांनाही अस वा...

एकाचवेळी निवडणूका सोईच्या

सं विधान दिवसाच्या निमित्ताने देशातील सर्व निवडणूका एकाच वेळी घेण्याची मागणी परत एकदा करण्यात आली. म्हणजे लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका वेगवेगळ्या वेळी घेण्यात येवू नयेत. या सर्व निवडणूका एकाचवेळी एकाच निश्चित तारखेला घेण्यात याव्यात. ही मागणी भाजपाच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या घोषणापत्रातही होती मात्र यावर आत्तापर्यंतही अंमल करण्यात आला नाही. या मुद्दयावर विचारविनिमय करण्यासाठी भाजप सरकारने २०१४ मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र जवळपास सर्व महत्वपूर्ण राजकिय पक्षांनी या बैठकीत सहभाग घेतला नव्हता. कम्युनिस्ट पक्षाने या बैठकीत भाग तर घेतला मात्र त्याने या प्रस्तावाचा विरोध केला होता. देशातील पहिल्या चार निवडणूका १९५१-५२, १९५७, १९६२ आणि १९६७ याच तत्वावर झाल्या होत्या. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी झाल्या होत्या. फक्त केरळ आणि ओरिसामध्ये १९६०-६१ मध्ये परत मध्यावधी निवडणूक झाली होती. १९६७ नंतर मात्र देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी कधीच घेण्यात आल्या नाहीत. या नंतरच्या सर्व लोकसभा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकल्या न...

कोरोनाला हलके घेवू नका.

      भा रतातील कोरोनाचा वेग अॉक्टोंबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत मंदावला, रुग्ण संख्या घटु लागली आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जवळपास सर्व काही सुरु झाल आहे. या वातावरणात अनेकजण मात्र जणुकाही कोरोना संपला या अविर्भावात वागत आहेत. तोंडाला मास्क नाही, सॅनीटायजरचा वापर नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर नाहीच नाही. दूसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकांना कोरोनाच कसलच गांभीर्य नाही. कोरोना सारखा आजार झाल्यानंतर स्वतः सोबत कुटुंबाची काय दुरावस्था होते हे जे यातुन गेले आहेत त्यांना विचारा, नव्हे मलाच विचारा. कोरोनामुळे मी माझ्या वडिलांना कायमचा गमावून बसलो एवढच नाही तर स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकलो नाही याहुन मोठे काय दु:ख असेल?  तो दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. ९ अॉक्टोंबरला संध्याकाळी गावाकडून डॉक्टर असलेल्या चुलत भावाचा फोन आला. त्याने वडिलांना श्वास घेण्यात अडचण येत असुन तात्काळ अॉक्सिजनची गरज असल्याच सांगितल. मी तात्काळ गावाकडे धाव घेतली आणि वडिलांना स्वाराती मध्ये घेवून आलो. त्यांचा एक्सरे काढला असता न्युमोन...