म हाभारताच्या कथेमध्ये जादूच्या तलावाच्या शेजारी बेशुद्ध पडलेल्या आपल्या चार भावांकडे पाहत असलेल्या युधिष्ठिराला यक्षाने विचारले होते की , सर्वात मोठे आश्चर्य काय आहे? युधिष्ठिराने उत्तर दिले की , प्रत्येक माणसाला हे माहित असते की , त्याचा मृत्यू हा निश्चित आहे मात्र तरीही प्रत्येक जण असा जगतो जस त्याचा मृत्यू हा कधीच येणार नाही. आपल्या जन्मासोबतच मृत्यूसुद्धा निश्चित झालेला असतो. जीवन आपल्या मृत्यूला पूढे ढकलत असते. आपण वाढदिवसाला शुभेच्छा देतो मात्र गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते की , वाढदिवसाच्या शुभेच्छा कशासाठी ? आयुष्य तर एका वर्षांनी घटले आहे. भगवान गौतम बुद्धांना सुद्धा बालपणीच ज्ञात झाले होते की , म्हातारपण येते त्यासोबत आजारपण येते आणि मृत्यू सुद्धा होतो.मृत्यू पासून कितीही दूर पळा तो कोणालाही टळलेला नाही. एका इराकी कथेनूसार बगदाद मध्ये एक व्यक्ती घराबाहेर पडली आणि त्याला वाटेतील एका चौकात आपला मृत्यू उभा असलेला दिसला. तो पळत घरी परत आला आणि आपल्या मालकाला म्हणाला की , माझा मृत्यू मी चौकात उभा असलेला पाहिला आहे. आपण मला आपला घोडा दयावा जेणेकरून मला समाराला ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.