बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा गेल्या बुधवारी २६ जुलैला राजीनामा दिला.बिहारमधिल आरजेडी , जेडीयू व काँग्रेसची सत्तेतील २० महिन्यांची महाआघाडी तुटली.लागोलग दूस-याच दिवशी म्हणजे गुरूवारी २७ जुलैला नीतीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकिय नाटयामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले.भाजपाचे सुशिल मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.नीतीश यांनी शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमतही सिद्ध केले.बिहारमधील हे राजकिय नाटय अगोदरच ठरलेले होते , मात्र हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की , हे सर्व नैसर्गिकरित्या घडत आहे.जनतेला अस वाटाव की , नीतीश यांनी भ्रष्टाचाराच्या विरूद्ध बिगुल वाजवले आहे.ईकडे नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला नाही की , तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढाई मध्ये सहभागी झाल्याबद्दल नीतीश कुमारांचे अभिनंदन केले.देशातील जनता निश्चितच एवढी राजकिय मुर्ख नाही . हा नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्यातील पूर्वनियोजीत कट होता हे आता जनतेच्या समोर आले आहे.भाजपालाही फक्त नीतीश य...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.