मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थव्यवस्थेला ग्रामिणचा आधार

जा गतिकीकरणामुळे मोठया प्रमाणात शहरीकरण वाढले. लोकांचे रोजगारासाठी गावाकडून शहराकडे मोठया प्रमाणात पलायन झाले. जागतिकीकरणामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाच्या या जागतीक महामारीत हिच ग्रामिण व्यवस्थाच देशाचा आर्थिक आधार बनली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआईई) ने २१ जुनला जाहिर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कोरोनामुळे ठप्प पडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या कामात गावं महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. याच संस्थेने ३ मेला आकडेवारी जाहिर करून म्हटले होते की, देशात बेरोजगारीचा दर २७.१ टक्के वाढला आहे. त्यावेळी असं वाटल होत की, देशाची ढासळती अर्थव्यवस्था सावरणे खूप कठिण होणार आहे. शेवटी अस काय झाल की, केवळ दिढ महिन्यात या संस्थेच्या अहवालाने नविन आशा पल्लवित झाल्या. ज्या गावांना देशाच्या आर्थिक मागासल्यापणाला जबाबदार धरले जायचे, त्याच गावांकडे अर्थव्यवस्थेचे तारणहार म्हणून बघितल जात आहे. सीएमआईई च्या आकडेवारीनुसार २१ जुनला देशातील बेरोजगारीचा दर घटुन तो लॉकडाऊनच्या पूर्वी एवढा ८.५ टक्के झाला आहे....

कोरोनाविरूद्ध लढाई आणि आकडयांचा खेळ

भा रतात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखाच्या पूढे गेली आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर तर दूसरीकडे देवेंद्र फडणविस यांनी महाराष्ट्र सरकार वर कोरोना चाचण्या कमी असल्याने रूग्णांची संख्या कमी दिसत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. दूसरीकडे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारं हे युद्ध योग्यरित्या लढत असल्याच चित्र निर्माण करताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच ब्राझीलच्या तुलनेत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाची आकडेवारी कमी असल्याने समाधान व्यक्त केल आहे. व्यवस्थापन आणि प्रचार या दोन्ही कला आहेत. पंतप्रधानांचे हे वक्तव्य सुद्धा याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. मोदींनी आपला मतदार संघ वाराणसीच्या एनजीओ प्रतिनिधिंशी व्हिडिओ कॉन्फरंस मार्फत संवाद साधत असताना म्हटले की, ब्राझील मध्ये कोरोना विषाणू मुळे ६८ हजार मृत्यू झाले आहेत. उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढेच आहे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. मात्र ईथे केवळ ८०० मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. साहजिकच पंतप्रधानांच्या मतानुसार उत्तरप्रदेश मधिल कोरोनाची कमी आकडेव...

सुजाण पितृत्व

पि त्याला आपल्या मुलाचा मित्र झाल पाहिजे अस शास्त्रात लिहिल आहे. ‘प्राप्ते षोडशेवर्ष पुत्रापि मित्रवत समाचारेत’ या श्लोकाचा अर्थ पुत्र १६ वर्षाचा होताच पित्याला आपल्या पुत्राला मित्राच्या रुपात बघितल पाहिजे असा होतो. यात मुलीचा मात्र उल्लेख नाही. अर्थात भारतीय संस्कृतीत एकीकडे मुलीला देवतेचे स्थान देवून तिला महान बनवले असताना दुसरीकडे मात्र तिला मुलाच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल जात ही सुद्धा परंपरेनेच चालत आलेली बाब आहे.         वर उल्लेखीत श्लोकात सांगितल्यापेक्षा उलट बाब असलेली आपल्याला दिसुन येईल. पुत्र आणि पित्यामध्ये संवादाचा अभाव बहुतांश कुटुंबात आहे. संवादाऐवजी मुलांसाठी पित्याची उपस्थिती ही भयाचे प्रतिक असते. वयात आलेला मुलगा घरात असेल तर त्याला पाहुन बाप घराबाहेर आणि बाप घरात असेल तर मुलगा बाहेर. पिता घरात असेल तर गंभीर शांतता. आई नजरेचा कटाक्ष टाकुन मुलांना शांत बसवते आणि पतीच्या सेवेला लागते. सुरूवातीपासून शहरी भागात राहणा-या आणि कामकाज करणा-या दांम्पत्याच्या कुटुंबात कदाचित दृश्य वेगळे राहत असेल मात्र ग्रामिण भागात आजही हिच स्थिती आहे. पित्याकडे कुटुंब प्...