काही दिवसांपूर्वी स्वछता सर्वेक्षणाचे निकाल जाहिर करण्यात आले आणि या सर्वेक्षणानूसार अनेक शहरांना स्वछ घोषित करण्यात आले.या मागिल भावनेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे.मात्र या योजनेत एक प्रकारची अनाकलनियता दिसून येते तिला अधोरेखित करणे गरजेचे आहे.इंदौरला तिस-यांदा स्वछतेत पहिले स्थान मिळाले आहे,हा नक्कीच योग्य निर्णय आहे कारण तेथील नागरिक स्वछतेच्या बाबतीत खरेच जागरूक आहेत.मात्र ज्या शहरात डंपिंग ग्राउंडचा कुठेच पत्ता नाही आणि त्या शहरांच्या प्रत्येक गल्लीचा कोना कच-याने भरलेला आहे अशा काही शहरांना स्वछ घोषित करण्यात आले आहे यामुळे या एकूण निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभा राहतात. खरं तर स्वछता हा सामाजिक विषय आहे.ही सरकारपेक्षा नागरिकांची जबाबदारी जास्त आहे.जिथला समाज जागरूक आहे तिथे आपोआप स्वछता राखली जाते.देशातील कित्येक गावात बघा तिथे शहरांसारखी अस्वछता पसरलेली नाही.तिथे स्वछता हा प्रतिष्ठेचा विषय समजला जातो.अशा प्रकारची गावे आज सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणावर आधारलेली नाहीत.सरकारी आर्थिक मदती विना आणि प्रकल्पाविना कुठे जर स्वछता कायम होत असेल तर ते ठिकाण आपल्यासाठी आ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.