म हागाईच्या आगीत जनता होरपळून निघत आहे मात्र यावर बोलायला ना प्रसारमाध्यमांना वेळ आहे ना लोकप्रतिनिधिंना. देशात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभराच्या पूढे गेले आहेत मात्र याची दखल कोण घेणार ? केवळ हेच नाही तर अन्नधान्य, भाजीपाला अशा सर्वच वस्तू सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आम्ही खायचे काय? हा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांकडे बोट दाखवून महागाईचे हे पाप आमचे नाहीच असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण महागाई कमी करण्याचा प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही. यापेक्षा प्रसारमाध्यमांना आणि लोकप्रतिनिधिंना आर्यन खानच्या प्रकरणात जास्त रस आहे. आपला विवेक हरवलेली जनता हा तमाशा मात्र उघड्या डोळ्याने बघत निमुटपणे महागाईची ही मार सहन करित आहे. घरगुती गॅसवरिल सबसिडी सरकारने गेल्या एक वर्षापासून बंद केली आहे. सामान्य नागरिकाला आता प्रती सिलेंडर ९५० रूपये खर्च करावे लागत आहेत. ग्रामिण भागात आता परत चुली पेटु लागल्या आहेत. खाद्यतेलाच्या भावात मागील काही दिवसात भरमसाठ वाढ झाली आहे. सीएनजी आणि इतर सर्व इंधनांचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.