मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर्वसामान्यांना दिलासा हवा

म हागाईच्या आगीत जनता होरपळून निघत आहे मात्र यावर बोलायला ना प्रसारमाध्यमांना वेळ आहे ना लोकप्रतिनिधिंना. देशात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभराच्या पूढे गेले आहेत मात्र याची दखल कोण घेणार ? केवळ हेच नाही तर अन्नधान्य, भाजीपाला अशा सर्वच वस्तू सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आम्ही खायचे काय? हा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांकडे बोट दाखवून महागाईचे हे पाप आमचे नाहीच असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण महागाई कमी करण्याचा प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही. यापेक्षा प्रसारमाध्यमांना आणि लोकप्रतिनिधिंना आर्यन खानच्या प्रकरणात जास्त रस आहे. आपला विवेक हरवलेली जनता हा तमाशा मात्र उघड्या डोळ्याने बघत निमुटपणे महागाईची ही मार सहन करित आहे. घरगुती गॅसवरिल सबसिडी सरकारने गेल्या एक वर्षापासून बंद केली आहे. सामान्य नागरिकाला आता प्रती सिलेंडर ९५० रूपये खर्च करावे लागत आहेत. ग्रामिण भागात आता परत चुली पेटु लागल्या आहेत. खाद्यतेलाच्या भावात मागील काही दिवसात भरमसाठ वाढ झाली आहे. सीएनजी आणि इतर सर्व इंधनांचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने...

सावधान ! शाळकरी मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढतेय

  कें द्रीय  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण- २०१९ ची राष्ट्रीय तथ्य जाहीर केली आहेत. हा अहवाल आपले डोळे उघडणारा आहे. आता अगदी लहान शाळकरी मुलं सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. केवळ हा अहवालच नाही तर अनेक अभ्यास , शोध आणि सर्वेक्षणातून आलेली आकडेवारी आपली चिंता वाढवणारी आहे. तंबाखू व तत्सम मादक पदार्थांचे व्यसन केवळ युवक वर्ग करतात हा आपला भ्रम आपण आता दूर केला पाहिजे. हे सर्वेक्षण २०१९ मध्ये धूम्रपान देखरेख आणि तंबाखू नियंत्रणाबाबत करण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने   केलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत.   ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेने तंबाखूच्या वापराचे वय , अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या प्रदर्शनाचे वय ,  तंबाखूच्या जाहिराती इ.चा सुद्धा अंदाज लावला आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत १३ ते १५ वर्षांच्या तरुणांचाही समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण भारतातील ९८७ शाळांमधील एकूण ९७ हजार ३०२ विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. आरोग्य आणि ...

एअर इंडियाच्या पंखांना टाटांचे बळ

त ब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे गेली आहे. टाटाने या कंपनीच्या विक्रीसंदर्भातला लिलाव जिंकला. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली जिंकली. यापूर्वी एअर इंडिया ही पुन्हा टाटा समुहाकडे जाणार या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं परंतु अखेर यावर शिक्कामोर्तब झाल आहे. एअर इंडिया ही कंपनी पूर्वी टाटाच्याच मालकीची होती. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने ही कंपनी अखत्यारित केली होती. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक ...