मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केवळ शाळेमुळे मुलं घडतात ?

म ला   हे बघून आश्चर्य वाटते की , लोक कस सहजरित्या आपल्या निष्पाप मुलांचे बालपण , त्यांची संवेदनशिलता आणि जिज्ञासा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मुलांना मशिन बनवण्यासाठी , एका व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी किती उत्सुक आहोत. अशा व्यस्थेचा भाग तयार करून देण्यासाठी आपल्या सरकारने जागो-जागी कारखाने तर खोलून ठेवलेच आहेत , ज्यांना हुकूमशाही आणि भांडवलशाही प्रवृत्तीचे लोक मोठया तत्परतेने चालवित आहेत. अशा कारखाण्यांत व्यवस्था जशाच तशी ठेवण्यासाठी आपले डोळे बंद करून चालणारी मोठी खेप तयार केली जात आहे. मी ठोसपणे सांगू शकतो की , सध्याची ही शिक्षण व्यवस्था कधीच असा समाज तयार करू शकत नाही ज्याच्यात मानवता , रचनात्मकता आणि प्रगतीशिलता असेल आणि मला असे वाटते की , आपण या समस्येला सध्या तोंड देत आहोत. आपण निष्पाप बालकांच्या को-या मनावर कट्टरता , अवैज्ञानिकता आणि असा अभ्यासक्रम लादत आहोत ज्याचा त्यांच्या भविष्याशी काही एक देणे-घेणे नाही. त्यांची ईच्छा आणि परवानगीशिवाय आपण असा अभ्यासक्रम छापत चाललो आहोत. भूछत्रा सारख्या जागो-जागी उगवलेल्या या शाळांमध्ये बालकांकडून त्यांचे स्...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पद्मावती विवाद

‘पद्मावती’ चित्रपटावरून सूरू असलेला वाद आता शिगेला पोहचला असून , चित्रपटातील कलावंतांना जीवे मारण्याच्या तसेच हात-पाय तोडण्याच्या धमक्या विविध संघटनांकडून मिळत आहेत.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने अभिनेत्री दीपिका पदुकोनला जीवंत जाळणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे तर हरयाणातील भाजपाच्या एका नेत्याने दीपिका पदुकोन व दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचे शिर कापणा-यास दहा कोटींचे बक्षिस देवू अशी घोषणा करीत अभिनेता रणवीर सिंगचे पाय तोडण्याची धमकी दिली आहे.दूसरीकडे या वादग्रस्त चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.अदयाप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कोणी याला राजपूतांचा अपमान म्हणत आहे तर कोणी हिंदूंचा.दूसरीकडे कोणी असा तर्क लावत आहेत की , हिंदू धर्म एवढा कमजोर नाही की , कोण्या एका चित्रपटामुळे तुटेल.या संबंधी एक बाब महत्वाची आह...

जीएसटीकर प्रणालीमध्ये पुन्हा बदल

नुकताच केंद्र सरकारने परत एकदा जीएसटीमधील काही चैनीच्या वस्तूंच्या २८ टक्के कर स्लॅबमध्ये बदल करून व्यापा-यांना दिलासा दिला आहे.यामुळे केंद्र सरकारला जवळपास वीस हजार कोटींचा वार्षिक तोटा सहन करावा लागणार आहे.जीएसटीची अवस्था नोटबंदी सारखी झाली आहे.नोटबंदी झाल्यानंतर जसे दररोज निर्णय बदलले जात होते असच काहीस जीएसटीच्या बाबतीत होत आहे.नोटबंदी फसल्याचा दावा करित विरोधकांमार्फत सरकारवर प्रचंड टिका करण्यात आल्याने जीएसटीच्या बाबतीत हे होवू नये म्हणून सरकारी यंत्रणा असा प्रचार करण्यात लागली आहे की , सरकारच्या जीएसटीच्या वसूली दरात कपात करण्याच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.खरं तर जीएसटीमुळे गुजरात मधील व्यापारी केंद्र सरकारवर खूप नाराज होते.गुजरात विधानसभा निवडणूका लक्षात घेवूनच भाजपाने हा घेतलेला निर्णय आहे.             प्रश्न हा आहे की , खरंच जीएसटी कर प्रणाली एवढी जाचक होती का ज्याची भयावहता कमी करण्यासाठी केंद्र सरकारला याची घोषणा करावी लागली.जर हे खर आहे तर हा प्रश्न प्रथम निर्माण होतो की , हा भारी भक्कम कर ...

महाराष्ट्रातील सत्तेचा खेळ

 आपले सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने राज ठाकरे खूप अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे भाजपा सुद्धा बैचेन आहे की त्यांना ही संधी का मिळाली नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, शिवसेना आणि भाजप यातील संबंध दिवसेंदिवस खूप खराब होत असल्याने खूप आनंदी आहेत मात्र हे पक्ष स्वतः घाबरलेले आहेत त्यांना भीती वाटत आहे की, शिवसेनेला प्रतिउत्तर देण्यासाठी कदाचित भाजप त्यांचे नगरसेवक फोडणार तर नाही ना? सत्ता मिळवण्याच्या या स्पर्धेत आपले कोण आणि परके कोण काही समजायला मार्ग नाही, सर्व काही अविश्वसनीय होत चालले आहे.आता एक प्रश्न निर्माण होतो की, जे लोक आपल्या पक्ष आणि नेत्यांच्या प्रती प्रामाणिक नाहीत लोक त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवतात? राजकारणात पक्षांतर करणे ही काही नविन गोष्ट नाही आणि कोणताही पक्ष यापासून वाचलेला नाही माञ ज्या पक्षाचा नेता पक्षांतर करतो तो पक्ष टिका व्यक्त करित असतो तर हा नेता ज्या पक्षात जातो तिथे त्याच्यासाठी पायघड्या आंथरल्या जातात. राज ठाकरे आज दु:ख व्यक्त करित आहेत. त्यांनी सांगितल की, मी त्यांना काय कमी केल? राज ठाकरे हे विसरताहेत की, कधी काळी त्यांन...

दीपावली साजरी करताना !

आपल्या   देशातील दीपावली हा अतिशय महत्वाचा सण. हा सण जणू एका पॅकेजच्या स्वरूपात येतो. धनत्रयोदशी , लक्ष्मी   पुजनआणि भाऊबीज या सणांसोबत संपूर्ण महिना एखाद्या उत्सवाच्या स्वरूपातच निघून जातो. या सणाचे पौराणिक आणि सामाजिक महत्व आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे मात्र या गोष्टीचे दु:ख होते की ,  कित्येक वेळा सणांचे नकारात्मक चित्रण आपण आपल्या मनात करून बसतो. न केवळ आपण नकारात्मक चित्रण करून बसतो तर याला आपल्या जीवनात अंगिकारून दूस-यांचे नूकसान करण्यात प्रमुख भागिदारही बनतो. दीपावलीच्या वेळी जे सण येतात त्यांची नकारात्मक व्याख्या आणि चूकीच्या परंपरा आपल्यासाठी कशा प्रकारे हानीकारक असतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. वस्तूंची खरेदी करताना - या सणाच्या वेळी सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे धनत्रयोदशी. या वेळी लोक नव्या वस्तूंची खूप मोठया प्रमाणावर खरेदी करतात. बाजारपेठ ही भरलेली असते ,  वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू खरेदी केल्या जातात.  अनेक ऑनलाईन संकेतस्थाळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातात. एकूण ग्राहकांना खरेदी करण्यासाठी जबरदस्त पद्धतीने प...