मुख्य सामग्रीवर वगळा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पद्मावती विवाद


‘पद्मावती’ चित्रपटावरून सूरू असलेला वाद आता शिगेला पोहचला असून,चित्रपटातील कलावंतांना जीवे मारण्याच्या तसेच हात-पाय तोडण्याच्या धमक्या विविध संघटनांकडून मिळत आहेत.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने अभिनेत्री दीपिका पदुकोनला जीवंत जाळणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे तर हरयाणातील भाजपाच्या एका नेत्याने दीपिका पदुकोन व दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचे शिर कापणा-यास दहा कोटींचे बक्षिस देवू अशी घोषणा करीत अभिनेता रणवीर सिंगचे पाय तोडण्याची धमकी दिली आहे.दूसरीकडे या वादग्रस्त चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.अदयाप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
कोणी याला राजपूतांचा अपमान म्हणत आहे तर कोणी हिंदूंचा.दूसरीकडे कोणी असा तर्क लावत आहेत की,हिंदू धर्म एवढा कमजोर नाही की,कोण्या एका चित्रपटामुळे तुटेल.या संबंधी एक बाब महत्वाची आहे ती म्हणजे या सगळ्या गोष्टी ते लोक बोलत आहेत ज्यांनी अदयापपर्यंत हा चित्रपट बघितलेला नाही कारण हा चित्रपट सध्या प्रदर्शितच झालेला नाही.या चित्रपटात काय आहे आणि काय नाही हा वेगळा विषय आहे,मात्र विना चित्रपट पाहता काही मत व्यक्त करणे हे फक्त घाईचेच नाही तर चूकीचे सुद्धा आहे.खरंतर माझा विषय हा त्या लोकांशी संबंधित आहे जे या चित्रपटाचा विरोध करणा-या लोकांना हा तर्क देवून रोखत आहेत की राणी पद्मावती ही केवळ कथा आहे.शक्यता आहे की,आपण म्हणाल की आपल्या घटनेने अभिव्यक्ती स्वतंत्रता दिली आहे आणि कोणालाही आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.निश्चितच कोणत्याही विषयावर अभिव्यक्ती स्वत्रंतेच्या आधारावर प्रत्येक व्यक्ती आपले मत व्यक्त करू शकतो मात्र इतिहासाच्या बाबतीतही अस करण्याची सवलत असावी का?लोकशाही,मानवतावादी मूलतत्वांची आदर्श मार्गदर्शिका असलेल्या आपल्या घटनेत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करताना इतरांच्या अभिव्यक्तीची जोपासना करत,त्यांचे अधिकार,श्रद्धा अबाधित राखत तुम्ही तुमच्या अधिकारांचा उपभोग घेवू शकता,ही प्रगल्भ जाणीव करून देण्यात आलेली आहे हे विसरून चालणार नाही.
इतिहासाचा अर्थ असा आहे की,जे खरंच घडलेले आहे आणि त्यात पुन्हा बदल होवू शकत नाही.इतिहासाच्या अभ्यासानेच कोणत्याही देशाच्या वा समाजाच्या भूतकाळाला समजण्यासाठी मदत मिळत असते.या माध्यमातूनच आपल्याला कळते की,कोणताही देश वा समाज आपल्या दिर्घ कालावधीत कशा प्रकारे विकसित झाला,त्यांचे शौर्य कसे होते,त्यांची जीवनशैली कशी होती इत्यादी.इतिहास हा सत्यावर आधारित असतो आणि या सत्याला लिहिणा-यांचा एक कथाकार म्हणून निश्चितच सन्मान झाला आहिजे पण इतिहासाला नाकारून त्याला केवळ एक कथा म्हणने चूकीचे आहे.आज जे लोक कोण्या एका विदेशी इतिहासकाराचा आधार घेवून म्हणत आहेत की,राणी पद्मीनी कोण्या एका कविच्या कल्पनेतून अवतरलेली कल्पना आहे त्यांनी एकदा चित्तोडच्या किल्ल्याला भेट दिली पाहिजे आणि तेथील जौहर कुंड बघितला पाहिजे.त्यांनी तेथील महिलांशी बोलल पाहिजे ज्या आजही राणी पद्मीनी आणि त्यांच्यासोबत जौहर करणा-या महिलांच्या शौर्याचा गुणगान आपल्या मुलांकडे करताना थकत नाहीत.
पराक्रमाचा हिमालय उभा करणा-या राणी पद्मीनी अर्थात पद्मावतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करणारे हेच लोक आहेत जे मागे म्हणत होते की,भगवान श्रीराम मात्र केवळ एक कल्पना आहेत आणि ते केवळ रामायण आणि श्रीरामचरित्रमानस सारख्या काव्यग्रंथांचा केवळ पात्र आहेत.जरा विचार करा की,हा हल्ला कोण्या राजपूत वा क्षत्रिय घराण्यावर नाही तर त्या गौरवशाली सनातन परंपरेच्या इतिहासाला नष्ट करण्याचा कुत्सित प्रयत्न आहे ज्यात समर्पण ही आहे,प्रेमासोबत त्याग ही आहे,धाडसासोबत करुणाही आहे,आत्मसन्मानासोबत कर्तव्यबोधही आहे,ज्यात वीरतेसोबत धैर्यही आहे,चातुर्यासोबत नैतिकताही आहे,ज्यात कर्मठतेसोबत दूरदृष्टीताही आहे,ज्यात शालिनतेसोबत प्रेरणाही आहे,ज्यात निष्पक्षपातीपणासोबत स्पष्टताही आहे,ज्यात सत्कर्मासोबत समजदारपणाही आहे.
आज चर्चेचा विषय हा नसला पाहिजे की,भारतीय इतिहासाचे हे शत्रू जे लिहीत आहेत,जे बोलत आहेत ते वाचावे अथवा ऐकावे की नाही.आज चर्चा यावर झाली नाही पाहिजे की,असे लोक जे करत आहेत याचा स्विकार केला पाहिजे की नाही.चर्चा या गोष्टीवर नाही झाली पाहिजे की,केवळ एक चित्रपट बनवल्याने कोणी समुदाय विशेष धोक्यात येतो की नाही.चर्चा या गोष्टीवर झाली पाहिजे की,इतिहासासोबत छेडछाड स्वीकाहार्य केली पाहिजे की नाही.या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी राणी पद्मावती या ऐतिहासिक चरित्रावर आधारित कथानकात वाटेल तसे बदल केल्याचा आरोप होत आहे.खरंतर इतिहासाचा अभ्यास न करता त्याचे धंदेवाईक सादरिकरण करण्याचा पराक्रम त्यांनी या अगोदरच केला आहे.यापूर्वी बाजीराव-मस्तानी या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण त्यांनी केले होते.मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद असलेले पहिले बाजीराव पेशवे रणधुरंधर म्हणून ओळखले जातात.या सेनानीची पत्नी एका नृत्यांगनेसोबत दरबारात नृत्य करेल का?त्यांची पत्नी काशीबाई या एका पायाने अधू होत्या,मग त्या असे नृत्य कसे काय करू शकणार?
जिथपर्यंत पद्मावती चित्रपटाचा विषय आहे,जर यात असं काही आहे ज्यामुळे भारतीय इतिहासाच्या स्वाभिमानावर कलंक लागेल तर निश्चितच हा चित्रपट बनवणा-या व्यक्तीला शिक्षा मिळाली पाहिजे मात्र काय खरे आणि काय खोटे हे समजण्यासाठी चित्रपट तर प्रदर्शित होवू द्या.असही होवू शकत की,जो राजपूत स्त्रीयांचा स्वाभिमान मेवाडच्या गल्ल्यांपर्यंत सिमीत राहिला आहे त्याची गौरवगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहचेल.आणखीन एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाला घेवून जे कथित राजपूत प्रतिनिधी आंदोलने करित आहेत त्यांना हे समजल पाहिजे की,राणी पद्मावती या केवळ राजपूत समाजाच्या स्वाभिमानाच्या प्रतीक नाहीत तर त्या भारताच्या स्वाभिमानाच्या प्रतीक आहेत.आज जाती,धर्म आणि संप्रदायाच्या नावावर आपण या महान व्यक्तींना वाटून घेतले आहे.कमीत-कमी देशाच्या शौर्याला आणि स्वाभिमानालातरी जातीच्या नावावर कोणीच वाटून घेवू नका.
-सुरेश मंत्री.

      

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...