मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तर कोरिया संकट आणि जागतिक राजकारण

उ त्तर कोरियाने अमेरिकेला बघून घेण्याची धमकी देताच सूट्टीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रीया दिली.ते म्हणाले की , उत्तर कोरियाने धमक्या देणे बंद करावे अन्यथा जगाने आत्तापर्यंत पाहिला नसेल एवढा बाँबहल्ला अमेरिका उत्तर कोरियावर करेल.त्यांच्या या विधानानंतर त्यांचे मंत्री टिलरसन यांनी लगेच सारवासारव केली.खरं पाहिल तर ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग यांनी जगाला गोंधळात टाकले आहे.अमेरीका आणि उत्तर कोरिया यांच्यात सतत वाकयुद्ध सूरू आहे.हे दोन्ही देश कधी युद्ध , कधी अणु बाँम्ब तर कधी आण्वीक क्षेपणास्त्र हल्ला करण्याची भाषा बोलत आहेत , जणू स्वयंपाकघरात भाजी काटली जात आहे.पण खरा प्रश्न हा आहे की , या दोन देशात खरच युद्ध होईल का ? जर अस झालच तर उत्तर कोरिया अमेरीकेसमोर कितपत टिकाव धरेल ? चीन , रशिया या सारख्या महाशक्तींची या युद्धात काय भूमीका असेल ? या सगळ्या बाबींवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख. संयुक्त कोरिया १९१० ते १९४५ पर्यंत जपानच्या अधिन होता.दुस-या जागतिक महायुद्धात जपान हारू लागल्यानंतर रशियाने जपानच्या विरोधात कोर...

काँग्रेसला स्वत:ला सावरण्याची गरज

काँग्रेससाठी ही सुखद गोष्ट आहे की , तिला गुजरात मध्ये हारता-हारता राज्यसभेची एक जागा मिळाली.खरं-तर ही जागा काँग्रेसने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत जिंकलेली असल्याने पक्षात उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे.मात्र हा उत्साह रसातळाला गेलेल्या काँग्रेसला वर उठण्यासाठीचा मार्ग बनू शकेल का ? मागील तीन वर्षात काँग्रेसची पंजाब वगळता सर्व आघाडीवर पिछेहाट झाली आहे.येत्या काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधिल विधानसभा निवडणूका होणार आहेत . या राज्यात काँगेसला यश मिळवता येईल का ? काँगेसचा भावी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल जात ते राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा स्विकारून काँग्रेससाठी अच्छे दिन आणतील का ?           काँग्रेसमध्ये स्वत:चा मतदार संघही नसलेल्या मात्र नेहरू आणि गांधी परिवाराशी केवळ जवळीकता असलेल्या नेत्यांच्या मर्जीनूसार काँग्रेसचे काम चालायचे.मोतीलाल व्होरा , अरूण सिंह , माखनलाल फोतेदार असे न जाणो कितीतरी.काँग्रेस मध्ये स्वत:चे स्वतंत्र अस्तीत्व असणा-नेत्यांची आजही कमी आहे.गुजरात मध्ये अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाती...

जायभायवाडीकरांना सलाम

नुकताच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.धारूर तालुक्यातील जायभायवाडी या छोटयाश्या गावाला राज्यातून विभागून दूसरा क्रमांक मिळाला.बालेवाडी , पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.पाणी फाऊंडेशनकडून १५ लाख आणि शासनाकडूनही १५ लाख असे ३० लाख रूपयांचे बक्षीस जायभायवाडीला मिळाले आहे.सगळे गाव एकजुट झाले तर गावाचा विकास कसा साधता येतो हे या वाडीने दाखवून दिले आहे.या यशामुळे केवळ धारूर तालुक्याचीच नाही तर बीड जिल्हयाची मान उंचावली आहे. गेल्या वर्षी अभिनेता आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर इतर तालुक्यांसोबत धारूर तालुक्याने सुद्धा सहभागी होण्याचे निश्चित केले.तालुक्यातील कोळ पिंपरी , व्हटकरवाडी , आम्ला या गावांनी या स्पर्धेत सुरवातीला आपला सहभाग नोंदविला होता.जायभायवाडी हे धारूर पासून १५ किमी अंतरावर असलेले छोटेशे पण निसर्गरम्य गाव.या वाडीची लोकसंख्या अवघी २१३ आणि माणस मात्र प्रचंड सकारात्मक.चारही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या या गावात प्रवेश करताच एक वेगळीच उर्जा जाणवते.वाडीतील बहुसंख्य लोका...