मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना: आव्हान दुहेरी आणि संधी मात्र कमी

को रोनाच्या महामारीपासून बचावासाठी केलेले लॉकडाऊन संपल्यानंतर देशात सर्वात गंभीर आर्थिक संकट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जीडीपी शून्याच्या खाली जाईल अशी भीती आहे.बेरोजगारीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान मोदी सरकारने २० लाख कोटींच्या मदतीचे पॅकेज घोषित केले. यानंतर अनेक जाणकार आणि विरोधी पक्षांनी यावर टिका केली. त्यांच अस म्हणन होत की,या पॅकेजमुळे प्रभावितांना तात्काळ दिलासा मिळणार नाही. ही रक्कम सरळ-सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे. मोदी सरकारने मात्र अस न करता दुसरा मार्ग निवडला आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्र सरकारने सुरवातीला सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. हे मोठे पॅकेज जाहिर करताना मात्र मोदींनी आपल्या अनुभवाचा अतिशय प्रभावीपणे उपयोग या संकटातुन बाहेर निघण्यासाठी केल्याच त्यांच्या निकटवर्तीयांच म्हणन आहे. ही दिर्घकाळ चालणारी लढाई असुन दूरदृष्टी ठेवून आखलेल्या या पॅकेजमुळे देश पुन्हा नविन भरारी घेईल अस त्यांचे निकटवर्तीय मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या काही बैठकांमध्ये...

कोरोना योद्धयांवरिल हल्ले चिंताजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केलेल्या आव्हानानुसार देशातील जनतेने २२ मार्चला स्वयंफुर्तपणे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला होता.याच दिवशी सायंकाळचे पाच वाजताच अगदी छोटया-छोटया वस्त्यांपासून मोठया शहरांपर्यंत देशात एक अद्भुत दृश्य पहायला मिळाले होते.संपूर्ण देश टाळया-थाळ्या आणि शंखांमधुन निघणा-या स्वरांनी निनादुन गेला होता.हे संगीत होत की,गोंगाट हे सांगण अवघड आहे मात्र यातुन देशाची अखंडता दिसुन आली.याच दिवसापासून देशात जागतीक महामारी कोविड-१९ विरूद्ध युद्ध छेडले गेले जे आजपर्यंतही सुरूच आहे.कोविड-१९ विरूद्धच्या या युद्धात पहिल्या पंक्तीत उभ्या असणा-या कोरोना वारियर्ससाठी हा शंखनाद त्या टिळया सारखा होता जो पत्नी,माता आणि बहिण युद्धावर जाणा-या वीर सैनिकाच्या मस्तकावर लावून निरोप देतात.फरक मात्र एवढा होता की,हे योद्धे केवळ शस्त्रहीन नव्हते तर कवचहीन सुद्धा होते.देशाला कोरोना विरूद्धच्या लढाईत जिंकुन दयायचच या आवेशात केवळ जनतेच्या प्रेरणेच पाठबळ घेवून हे खंदे सैनिक लढाईवर निघाले.  मात्र ही विडंबना आहे की,या टाळ्यांचा स्वर लुप्त झालाच नव्हता की आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याबरोब...

कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार?

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या महामारीने लाखो लोकांना संक्रमीत केले असून जवळपास दोन लाखांच्या वर लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.हा विषाणू नविन असल्याने कोरोनावर निश्चित औषध ही उपलब्ध नाही ना लस.प्रचलित औषधांच्या साहयाने लक्षण आधारित उपचार केल्याने अनेकजण या भयंकर आजारातून बरे झाले आहेत.संपूर्ण जग या महामारीने त्रस्त असल्याने जगाची नजर कोरोनाच्या लसीकडे लागली आहे.कोरोनावरिल लस कधी उपलब्ध होईल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.याचाच आढावा घेणारा हा लेख. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवस-रात्र युद्ध स्तरावर काम सुरू आहे.या वेळी जवळपास ३५-४० प्रयोगशाळांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू आहे.काही लसींची चाचणी प्राण्यांवर केली जात आहे तर काही लसींची सरळ-सरळ मानवावर.संपूर्ण जगाला कोरोना प्रतिरोधक बनवणे वा त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे हे खूप कठिण काम आहे.एक लस तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात मात्र सध्याच्या स्थितीची गंभीरता पाहून अनेक औषध कंपन्यांनी सरकारी संस्था,सामाजिक संस्था आणि औषध नियमन संस्थांची मदत घेवून आपला शेडय...