मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना विरूद्ध युद्धात सोशल मीडियाचे आव्हान

को रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग राखणे खूप महत्वाचे झाले आहे.अशा काळात आपण घरामध्ये बंद असताना सोशल मीडिया हा समाजाशी जुडण्याचा एकमेव आधार झाला आहे.भारतात कोरोनाविरूद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सुरूवातीला अनेक महाभागांनी सोशल मीडिया मार्फत समाजात अफवा,सामाजिक व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने याची दखल वेळीच घेतल्याने या महाभागांच्या आसुरी आनंदावर जणू पाणी फेरले गेले.सर्वांकडे सध्या खूप फावला वेळ असल्याने सोशल मीडियावर खूप लिहिल जात आहे.कोणी कोरोनावर कविता केल्या,कोणी लॉकडाऊन मधिल आपले अनुभव शेअर केले तर कोणी यापूर्वी जगात आलेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी लिहिल.अशातच आता नविन ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे तो म्हणजे विविध प्रकारचे चॅलेंज देण्याचा.कुणा महिलेकडे साडी चॅलेंज आहे तर कुणाकडे जोडी चॅलेंज.मग यात पुरूषही कसे मागे राहतिल बरे.त्यांच्यातल कोणी दाढी चॅलेंज देत आहे तर कोणी गॉगल चॅलेंज.दिवसभर सोशल मीडियावर असच काहीस सुरू असत.अर्थात यामागे कुणाला हानी पोहचविण्याचा उद्देश नसून केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे.मात्र कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात सोशल मीडि...

आपली परंपरा आणि क्वारंटाईन

जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालय.उपचारापेक्षा प्रतिबंध हाच चांगला उपाय म्हणून जगातील सगळे लोक आपापल्या घरात बसले आहेत.अर्थात प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.कोरोना महामारी सोबत क्वारंटाईन हा शब्द जो काही काळापूर्वी आपल्याला माहित नव्हता तो सगळीकडे प्रचलित झाला आहे.नव्या पिढीसाठी क्वारंटाईन ही पद्धत नवखी असेल मात्र जगात हिचा वापर फार पूर्वी पासुन होत होता,अगदी आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा.आपल्या परंपरेत संक्रामक रोगांपासून वाचण्याचा योग्य आणि खात्रीशीर उपाय स्वत:ला दूस-यांच्या शारीरिक संपर्कापासून वेगळे ठेवणे हाच राहिला आहे.रोगी आणि निरोगी,दोघांना रोगापासून बचाव आणि आपले आरोग्यहिताच्या दृष्टीने एक उपाय म्हणून क्वारंटाईन मान्यताप्राप्त आहे. विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजार...