मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१८ वर्षापर्यंतच्या मुलांना मिळावे मोफत आणि सक्तीचे शिक्षण

बाल मजुरी विरोधात काम करणारे कैलाश सत्यार्थी यांच्या बाल संस्थेमार्फत दिल्ली मध्ये आयोजित शिक्षणाच्या राष्ट्रीय संमेलनात कधी काळी खाणीत बाल मजुरी करणारी ब्रिटनच्या प्रतिष्ठित डायना पुरस्काराने सन्मानित १३ वर्षांची चंपा बोलत होती.ती आता ८ वी मध्ये शिकते.चंपाने सांगितले की,‘मलाही शाळा सोडावी लागली होती,कारण शिक्षण ही माझ्या कुटुंबाची प्राथमिकता नव्हती.मी माझ्या गावातील खाणीत काम करायचे.बाल मजुरीच्या दलदलीतून मुक्त करून मला एका सरकारी शाळेत प्रवेश दिला गेला.ज्यामुळे मी आज ईथे आहे.माझे हे मानने आहे की शिक्षण हे एकमेव हत्यार आहे जे माझ्यासारख्या बाल मजुरांची रक्षा करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते.त्यामुळे माझी ईच्छा आहे की,सर्व मुले शाळेत शिकावित.’या संमेलनात अनेक खासदार,अधिकारी,न्यायाधिश,पोलिस अधिकारी आणि बाल अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.चंपा आता राष्ट्रीय बाल पंचायतची उपाध्यक्ष आहे.छोटया चंपाने आपल्या अनुभवातुन जी गोष्ट समोर ठेवली तिचा खोल नीतितार्थ आहे. या नीतितार्थला समजण्यापूर्वी जरा ही आकडेवारी पाहू या.भारत सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या एका अहवालानुसार देशात...

सामुहिक आत्महत्येच्या दिशेने

मागिल काही काळात लोकप्रिय झालेल्या चित्रपट मालिका अवेंजर्सचा खलनायक थैनोस विश्वाला वाचवण्यासाठी पृथ्वीवरिल अर्ध्या मानव जातीला नष्ट करतो.थैनोस असे मानतो की,मानवाने पर्यावरण आणि संसाधनांचा नाश करून संपुर्ण विश्वाला धोका निर्माण केला आहे त्यामुळे मानव जातीला समुळ नष्ट केले पाहिजे.या चित्रपटाचे नायक थैनोस विरुद्ध महायुद्ध लढतात आणि शेवटी यशस्वी होतात.मात्र वास्तवात जे होत आहे ते याच्या एकदम उलट आहे.कोण्या थैनोसला आपल्याला नष्ट करण्यासाठी कष्ट करण्याची गरजच नाही कारण या पृथ्वीवर राहणा‌-या आपण मानवांनी अगोदरच सामुहिक आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे.एवढच नाही तर आपण चार अरब वयस्क,तीन अरब बालक आणि युवकांना सुद्धा मृत्युच्या दाढेकडे ओढत नेत आहोत जे या पापात कधीच भागिदार नव्हते. पर्यावरणाच्या अभ्यासातुन येणा-या जवळपास सर्व संशोधनांतुन असे दिसते की,धोक्याची घंटा सगळीकडुन वाजत आहे आणि आता सर्वांना याचा अंदाज आला आहे की,मानवाच्या स्वार्थ आणि अत्याचारामुळे पृथ्वीची सहनशक्ती आता संपली आहे.जीवनावश्यक हवा आणि पाणी विषारी होत आहे.भुगर्भातील खनिज संपत्तीचे साठे संपत चालले आहेत.जागतीक तापमानात ...