बा लपण आयुष्यातील सर्वात सुंदर काळ. बालपण ही माणसाला मिळालेली ईश्वराची सर्वात अमूल्य देणगी आहे असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीची न काही जबाबदारी न काही चिंता. फक्त खेळण-बागडण, दंगा मस्ती करणं आणि अभ्यास. मात्र अशा प्रकारचे बालपण प्रत्येकाच्याच वाट्याला येत असं नाही. एखाद्या हॉटेल मध्ये, घरामध्ये, दुकानात किंवा विटभट्टीवर एखादा बालक ज्याच्या हातात पुस्तके असण्याऐवजी झाडू, फडके किंवा अवजारे असलेली दिसतात. जर कोणी १४ वर्षे वयाखालील बालक उपजिविकेसाठी काम करित असेल तर त्याला बालमजूर असे म्हणतात. आज जगात २१.५ कोटी बालमजूर आहेत. गेल्या दोन दशकांत जगभरात १६ कोटी बालमजूर वाढले आहेत. यात सुमारे ३९.४ टक्के (६.३ कोटी) मुली आणि ६०.६ टक्के (९.७ कोटी) मुले असून कोरोनामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि युनिसेफच्या ‘चाइल्ड लेबर: ग्लोबल एस्टीमेट्स २०२०, ट्रेंड्स आणि रोड फॉरवर्ड’ या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की २० वर्षांत प्रथमच बालमजूरी कमी करण्यात अपयश आले आहे. गेल्या चार वर्षांत बालमजूरांमध्ये ८४ लाखांची ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.