मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मढयावरच लोणी

को विड-१९ महामारीची दुसरी लाट सध्या देशात सुरू आहे. दिवसागणिक रूग्णसंख्येत वाढ होतच आहे. सोबत मोठया प्रमाणावर रेमडिसिविर इंजेक्शन्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणु लागला आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की, खरंच असा तुटवडा आहे की आणखीन काही ? खरंच रेमडिसिविर इंजेक्शन्स वा फैबी फ्लूच्या टॅबलेटस उपलब्ध होत नाहीत का? कोण म्हणत उपलब्ध होत नाही, फक्त आपल्याला याची किंमत चुकवावी लागेल. काही दिवसांपूर्वी माझ्या एका परिचितांचा फोन मला आला, त्यांना रेमडिसिविर इंजेक्शन पाहिजे होते. गयावया करून म्हणाले, काहीही करून उपलब्ध करून द्या. मी त्यांना समजावुन सांगितल की, नियमानूसार हे इंजेक्शन त्यांना संबंधित रूग्ण उपचार घेत असलेल्या कोविड हॉस्पीटलच देवु शकते. त्यांनी सांगितल- हॉस्पीटलवाल्यांनीच सांगितलय, बाहेरून जुगाड लावायला. काही घंटयांनंतर ते रेमडिसिविर इंजेक्शनच जुगाड बाहेरून लावण्यात यशस्वी झाले, म्हणाले- ब्लॅक मध्ये मिळालं.     हीच अवस्था ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत आहे. काही ठिकाणी दहा-दहा हजार रुपयांना एक-एक सिलेंडर मिळत असल्याच माझ्या ऐकण्यात आलय. पाहिजे असेल तर पैसे देवुन घेवुन जा आणि आपल्...

प्राणवायूचा तुटवडा

को रोना विषाणूच्या दुस-या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ३.१४ लाखाहून अधिक  रूग्ण आढळले तर २९०४ जणांचा बळी गेला. या महामारीला सुरूवात झाल्यापासून एखाद्या देशात इतक्या मोठया संख्येने नवीन रूग्ण सापडल्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून १,५९,३०,९६५ इतका झाला आहे तर मृतांचा आकडा १,८४,६५७ इतका झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी कोरोना रूग्णवाढीचा आलेख कायम राहिल्याने अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या वाढून २२,९१,४२८ इतकी झाली आहे. या वाढत्या रूग्णवाढीमुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. देशात सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने, राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे पण महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी गुरूवारी केली. यावरून हा प्रश्न खूप गंभीर असल्याचे लक्षात येते मात्र, देशातील उपलब्ध प्राणवायूच्या वितरणाचे योग्य नियोजन केले तर यावर स...

भारतीय स्त्रीयांचे मानसिक आरोग्य

  सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचे वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. नैराश्य , ऑटिझम , डायमेंशिया , बायोफ्लोर , डिप्रेशन , न्यूरोटीक , स्क्रिझोफेनिया असे न माहीत असलेले आजार जडतात. त्यामुळे या सर्व मानसिक आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे. ही जागरूकता काही अंशी घडत असली तरी स्त्रियांमधील मानसिक आजारांकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्याची महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची स्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे. आपल्याच लोकांकडून होणा-या अमानवीय वर्तनामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची फार मोठी हानी होत असलेले सध्याचे चित्र आहे.  ‘ जागतिक आरोग्य संघटने’च्या म्हणण्यानुसार भारतामध्ये दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर १२ पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येतेय. संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे हे नाकारून चालणार नाही. म...

आता तरी गांभीर्याने घ्या....

  दे शात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.मुंबईसारख्या एकट्या शहरातुन दररोज दहा हजारांच्या पूढे, महाराष्ट्रातुन ५७ हजार पेक्षा जास्त आणि भारतात  एक लाखाच्या पूढे दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या चार दिवसांत सर्वाधिक केसेस भारतात आढळत आहेत. जो अमेरिका दररोज आढळणा-या कोरोना केसेसच्या प्रकरणात एकेकाळी सर्वाधिक पूढे होता त्याला आता आपण खूप मागे टाकले आहे. दररोज वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूदरही त्याच प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी स्मशानात जागा शिल्लक नाही. अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ कोरोना बाधितांना डाग दिल्याची बातमी ताजी असतानाच काल अहमदनगर मध्ये तब्बल ४२ कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातुन आपण  कोरोनाची भयानकता लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रामुळे कोरोना विरुद्ध युद्धात भारत पिछाडीवर गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच केला आहे. आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भागही असेल कदाचित, आपण सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नियमांचे पालन केले नाही तर याची फार मोठी किंमत आपल्याला आणि पर्यायाने देशाला चुकवावी ...