मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बनणार आर्थिक महासत्ता

विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत. अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. माञ योग्य धोरणांमुळे भारताचा विकास दर भविष्यात ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीची व्याप्ती वाढवून, आर्थिक स्थिरतेचा आधारही वाढेल. जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणणार आहे. एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात.  अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ...

असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या आर्थिक व सामाजिक समस्या

भारतात फक्त १० टक्क्यांपेक्षा कमी कामगार हे संघटीत क्षेत्रात काम करतात तर ९०  टक्क्यांपेक्षा अधिक कामगार हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांची संख्या ४० कोटींपेक्षा अधिक आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. १९९५ च्या नॅशनल अकांउटस स्टॅटिटिक्स रिपोर्ट नुसार देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्न हे असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून मिळते. अस्थिरता हे असंघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. असंघटित कामगारांकरिता कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यासाठी विविध मंडळांची स्थापना महाराष्ट्रात झाली खरी, परंतु असंघटित कामगारांपकी कितीजणांना या मंडळांमुळे सामाजिक सुरक्षा लाभली वा कल्याणकारी उपक्रमांचा लाभ पोहोचला हा संशोधनाचा विषय आहे. असंघटित क्षेत्रात कामगारांना किमान वेतन, बोनस, सामाजिक सुरक्षा मिळत नाही. त्यात महिलांना असंघटित क्षेत्रात अधिक काम करावे लागते. शेतमजूर, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, असे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. घरकामगार म्हणून काम करणा-या ८० टक्के महिलाच आहेत. कमी पगारावर काम करण्यास स्त्रिया...

भारताने दुध उत्पादनातील अव्वलस्थान टिकवणे गरजेचे

सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील (एफएओएसटीएटी) उत्पादनविषयक माहितीनुसार २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात २४ टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. २०१४-१५ ते २०२१-२२ अशा मागील ८ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील प्रदान करतो. २०२१-२२ मध्ये देशातील दुधाचे उत्पादन सुमारे ६.२ टक्के च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने २०९.९६ दशलक्ष टन झाले आहे. २०१४-१५ मध्ये ते केवळ १४६.३१ दशलक्ष टन होते. न्यूझीलंड, नेदरलंड, बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, थायलंड असे मोठे स्पर्धक दूध उत्पादनात असताना त्यांना मागे टाकून अव्वल स्थान अबाधित राखणे तशी सोपी गोष्ट नाही. महासत्ताक होण्याच्या दिशेने भारताचे हे ए...

नैसर्गिक आपत्तींपासून वाचवणारे उपग्रह : निसार

भारतीय अंतराळ कर्यक्रमाची क्षमता वाढवणे, अवकाश विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण माहिती संच वाढवणे, ग्राउंड स्टेशन नेटवर्कची व्याप्ती वाढवणे, संयुक्त प्रयोगांद्वारे उत्पादने आणि सेवा सुधारणे आणि तज्ञांच्या उपलब्धतेसाठी मंच तयार करणे या उद्दिष्टांसह सरकार परदेशी अवकाश संशोधन संस्थांसोबत सहयोगी प्रकल्प राबवत आहे. याअंतर्गत बहुतेक पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त उपग्रह मोहिम हाती घेतली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारताची इस्रो यांनी संयुक्तरित्या निसार या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे. यानिमित्ताने नासाबरोबर संयुक्त उपग्रह निर्मिती, वापर आणि अभ्यास करण्याची संधी इस्त्रोला नव्याने मिळाली आहे. या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. विशि...

एसटीचे सारथ्य 'ती' करताना लवकरच दिसणार..

लालपरी हा महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लालपरीची सुरुवात झाल्यापासून लोकांच्या गरजांप्रमाणे तिच्या मध्ये अनेक बदल होत गेले. महामंडळाच्या ताफ्यात नवनवीन व अत्याधुनिक बसेस दाखल होत आहेत. आरामदायी प्रवासाची सेवा देण्याच्या दिशेने देखील महामंडळाची पाऊले पुढे पडत आहेत. पूर्वी बसमध्ये चालक आणि वाहक दोघेही पुरुषच असत. परंतु, मध्यंतरीच्या काळात महिलांना वाहक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. आता बसेसमध्ये महिला वाहक प्रवाशांचे तिकीट काढताना दिसून येतात. महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. मात्र, आता हे चित्र बदलणार आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक- वाहक म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. राज्यातील २१ विभागांत २०६ पैकी १६० चालक महिलांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून लवकरच या महिला चालक एसटीचे स्टेअरिंग आपल्या हातात घेणार आहेत. यामध्ये आदिवासी भागातील काही महिलांचा देखील समावेश आहे. कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी बस चालक म्हणून प्रशि...