मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पद्मावती विवाद

‘पद्मावती’ चित्रपटावरून सूरू असलेला वाद आता शिगेला पोहचला असून , चित्रपटातील कलावंतांना जीवे मारण्याच्या तसेच हात-पाय तोडण्याच्या धमक्या विविध संघटनांकडून मिळत आहेत.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने अभिनेत्री दीपिका पदुकोनला जीवंत जाळणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे तर हरयाणातील भाजपाच्या एका नेत्याने दीपिका पदुकोन व दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचे शिर कापणा-यास दहा कोटींचे बक्षिस देवू अशी घोषणा करीत अभिनेता रणवीर सिंगचे पाय तोडण्याची धमकी दिली आहे.दूसरीकडे या वादग्रस्त चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.अदयाप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कोणी याला राजपूतांचा अपमान म्हणत आहे तर कोणी हिंदूंचा.दूसरीकडे कोणी असा तर्क लावत आहेत की , हिंदू धर्म एवढा कमजोर नाही की , कोण्या एका चित्रपटामुळे तुटेल.या संबंधी एक बाब महत्वाची आह...

जीएसटीकर प्रणालीमध्ये पुन्हा बदल

नुकताच केंद्र सरकारने परत एकदा जीएसटीमधील काही चैनीच्या वस्तूंच्या २८ टक्के कर स्लॅबमध्ये बदल करून व्यापा-यांना दिलासा दिला आहे.यामुळे केंद्र सरकारला जवळपास वीस हजार कोटींचा वार्षिक तोटा सहन करावा लागणार आहे.जीएसटीची अवस्था नोटबंदी सारखी झाली आहे.नोटबंदी झाल्यानंतर जसे दररोज निर्णय बदलले जात होते असच काहीस जीएसटीच्या बाबतीत होत आहे.नोटबंदी फसल्याचा दावा करित विरोधकांमार्फत सरकारवर प्रचंड टिका करण्यात आल्याने जीएसटीच्या बाबतीत हे होवू नये म्हणून सरकारी यंत्रणा असा प्रचार करण्यात लागली आहे की , सरकारच्या जीएसटीच्या वसूली दरात कपात करण्याच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.खरं तर जीएसटीमुळे गुजरात मधील व्यापारी केंद्र सरकारवर खूप नाराज होते.गुजरात विधानसभा निवडणूका लक्षात घेवूनच भाजपाने हा घेतलेला निर्णय आहे.             प्रश्न हा आहे की , खरंच जीएसटी कर प्रणाली एवढी जाचक होती का ज्याची भयावहता कमी करण्यासाठी केंद्र सरकारला याची घोषणा करावी लागली.जर हे खर आहे तर हा प्रश्न प्रथम निर्माण होतो की , हा भारी भक्कम कर ...