मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

अस्वस्थ करणारे प्रश्न, जागृत करणारे विचार : ‘कुठे आहे लोकशाही?’

मराठी साहित्यात समाजप्रबोधनाची परंपरा संत साहित्यापासून ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेपर्यंत अखंडपणे प्रवाहित होत आलेली आहे. या परंपरेचा वारसा जपत तरुण लेखक बुद्धभूषण कांबळे यांनी लिहिलेला “कुठे आहे लोकशाही?” हा ललित लेखसंग्रह समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारा, विचारांना चालना देणारा आणि वाचकाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो. पुस्तकाचा केंद्रबिंदू लोकशाही असला तरी त्यामध्ये केवळ राजकीय लोकशाहीचा विचार नाही; तर सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांच्या लोकशाहीचाही शोध घेतला आहे.  पुस्तकाचे मुखपृष्ठ  सरदार जाधव यांनी रेखाटले असून ते अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. प्रस्तावना किर्तनकार व साहित्यिक माधव डाके यांची असून महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांचा अभिप्राय लाभला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक भरत सातपुते यांची पाठराखण आहे.  या लेख संग्रहात लेखकाने समाजातील विविध समस्या, मानवी नातेसंबंध, शिक्षण, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, पर्यावरण, बेरोजगारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे नाते, मतदानाचे महत्त्व, स्...