मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

AGRICULTURAL लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भरड धान्य : काळाची आवश्यकता

संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील ७० हून अधिक राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्वीकारला गेला. शाश्वत शेतीमध्ये भरड धान्याची महत्त्वाची भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपरफूड म्हणून त्याचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात त्यामुळे मदत होईल. भरड धान्ये सुमारे १३१ देशांमध्ये घेतली जातात. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे ६० कोटी लोकांचे हे पारंपरिक अन्न आहे. आशियातील ८० % पेक्षा जास्त भरड धान्याचे उत्पादन भारतात होते. १७० लाख टनांहून अधिक उत्पादनासह भारत भरड धान्याचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे.                                                                              ज्वारी , बाजरी , नाचणी , भगर , राळ ,...

भारताने दुध उत्पादनातील अव्वलस्थान टिकवणे गरजेचे

सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील (एफएओएसटीएटी) उत्पादनविषयक माहितीनुसार २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात २४ टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. २०१४-१५ ते २०२१-२२ अशा मागील ८ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील प्रदान करतो. २०२१-२२ मध्ये देशातील दुधाचे उत्पादन सुमारे ६.२ टक्के च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने २०९.९६ दशलक्ष टन झाले आहे. २०१४-१५ मध्ये ते केवळ १४६.३१ दशलक्ष टन होते. न्यूझीलंड, नेदरलंड, बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, थायलंड असे मोठे स्पर्धक दूध उत्पादनात असताना त्यांना मागे टाकून अव्वल स्थान अबाधित राखणे तशी सोपी गोष्ट नाही. महासत्ताक होण्याच्या दिशेने भारताचे हे ए...

शेती व्यवसायाचे बदलते चित्र

  काळाच्या ओघात शेती व्यवसायाचे स्वरुपही बदलत आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्रच होते. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना ड्रोनशी संबंधित मोठी घोषणा केली होती. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच रोजच्या आयुष्यात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. शेती व्यवसायात प्रगती व्हावी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा हाच   केंद्र सरकराचा उद्देश राहिलेला आहे. त्यानुसारच आता कृषी क्षेत्रामध्ये बदल होत आहे.  ड्रोनच्या माध्यमातून शेतीकामे   तर पार पडावीच शिवाय कृषी पदवीधारकांना या माध्यमातून कामही मिळावे असा दुहेरी उद्देश साधत ड्रोनसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर तर वाढणार आहेच पण हातपंपाने फवारणी करताना होणाऱ्या दुर्घटनाही टळल्या जाणार आहेत. त्याअनुशंगानेच कृषी यांत्रिकिकरण उपअभियनातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी ५ लाखापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. तर विविध संस्थांनाही अनुदान देऊन ड्रोनचा शेती व्यवसायात वापर वाढवला जाणार आहे. याच अनुशंगाने गेल...

'सर्जा-राजा'च्या सणावर दुष्काळाचे सावट

 श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात.पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते.संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं.अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा'.यावर्षी मात्र महाराष्ट्रात सरासरीच्या ४० टक्केच पाऊस झाल्याने मराठवाडा,खानदेश आणि विदर्भात भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे या भागात आज हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्याची चिन्हे आहेत तर कोल्हापूर, सांगली जिल्हयात आलेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत.या शेतक-यांच्या डोळ्यात आज आपल्या जिवापाड जपलेल्या बैलजोडीची आठवण येवून अश्रु आल्याशिवाय राहणार नाहीत.             पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.पोळ्याला त्यांना नदी,ओढय़ात नेऊन धुण्यात येते.न...