मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विचारांचे भावविश्व : विचार मंथन

विचारमंथन हा लेखसंग्रह आहे. यामध्ये विविध विषयांवरचे एकूण ३४ लेख असून पुस्तकास प्रा.डॉ. श्रीमती शैलजा बरुरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. मुखपृष्ठ उमेश डोंगे यांचे आहे. या पुस्तकाची अनुक्रमणिका चाळल्यानंतर वाचकांच्या सर्वप्रथम लक्षात येते की, विविध विषयावरील लेखांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लेखकाने आपल्या मनोगतामध्ये शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करत असताना नवीन प्रवेशित विद्यार्थिनीचे नाव "नकोशी" आहे हे पाहिल्यानंतर तिच्या जन्माची आणि तिच्या नकोशा असण्याची कथा सर्वप्रथम उजेडात आणली. शिक्षण विभागाने हा लेख प्रकाशित होताच, या मुलीच्या नाव बदलाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आणि त्या विद्यार्थिनीचे नाव बदलण्यात आले. एक शिक्षक, एक स्तंभ लेखक एका विद्यार्थिनीला तिच्या नकोशा असणाऱ्या अस्तित्वाला शिक्षण विभागाच्या आणि जीवनाच्या केंद्रस्थानी आणतो. मला वाटतं लेखन, साहित्य मग ते कोणत्याही प्रकारच असो, स्तंभ लेखन, ललित अथवा वैचारिक किंवा कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांचा उद्देश माणूसपण जिवंत ठेवून माणसाला जगण्यासाठी आधार देणे, कधी कधी उभारी देणं हाच साहित्याचा हेतू असतो.  भारतात...

आजचा दिशाहीन भारतीय युवक

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे होवून गेली असताना या कालावधीत आज आपल्या देशाने जो विकास साधला आहे त्यात खरे योगदान कोणाचे आहे हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. राजकारणी नेते, प्रशासनातील कर्मचारी, शिक्षक, मजूर, वरिष्ठ नागरिक की आणखीन कोण ? नक्कीच यापैकी कोणीच नाही. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा हा वर उल्लेख नसलेल्या देशातील तरूण वर्गाचा आहे. कोणत्याही देशाची खरी संपत्ती व बलस्थान हे त्या देशातील युवक आहेत. देशातील युवकांच्या दर्जावरून त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे ठरत असते. सुदैवाने लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुस-या क्रमांकावर असलेल्या या आपल्या देशात एकूण लोकसंख्येच्या २० टक्के बालक, २० टक्के वृद्ध व ६० टक्के लोकसंख्या युवक वर्गाची म्हणजेच २४ ते ४० वर्षे वयोगटाची आहे, म्हणूनच भारताला तरूणांचा देश असे संबोधले जाते. हा युवक वर्ग नेहमीच शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक रूपाने सदैव सक्रीय असतो आणि असायलाही हवा. देशाच्या विकासात महत्वाचे योगदान असणा-या या युवक वर्गाची आजची स्थिती मात्र खूप चिंताजनक आहे. भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे व...