मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

NATIONAL लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारत बनणार आर्थिक महासत्ता

विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत. अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. माञ योग्य धोरणांमुळे भारताचा विकास दर भविष्यात ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीची व्याप्ती वाढवून, आर्थिक स्थिरतेचा आधारही वाढेल. जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणणार आहे. एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात.  अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ...

आळशी लोकांचा देश : भारत

आ ळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. एखादे काम केले नाही तर अनेकांना तुम्ही किती आळशी आहात असे म्हणताना ऐकले असेल. प्रत्येकाच्या घरात असा एकतरी आळशी धोंडा असतोच. मात्र अनेकांना जगातील सर्वात जास्त आळशी लोकं कोणत्या देशात आहेत असा प्रश्न पडतो. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात जगातील आळशी देशांबाबत भाष्य केले आहे. जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. या संशोधनात सर्वात आळशी देश आणि सर्वात सक्रीय देशांची नावे सांगितली आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांवर हे संशोधन केले आहे. भारतीय लोक सध्या अनेक बाबतीत प्रगतिपथावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात जगावर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची छाप पडत आहे. परंतु तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती होत नाही. प्रचंड लोकसंख्या हा देशावरचा बोजा ठरत आहे, प्रचंड मनुष्यबळ म्हणून त्याची गणती करणे अद्यापही भारताला शक्य झालेले नाही. भारत हा काही वर्षामध्येच सर्वाधिक तरुणांचा देश होणार असला तरी या तरुणांच्या ऊर्जेचा, क्रयशक्तीचा व...