मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालविवाह रोखण्यातील अपयश

भारत जगातील असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक बालविवाह केले जातात. आज घडीला भारतात जवळपास २३ कोटींहून जास्त बालवधू आहेत. दुसरीकडे भारतात दरवर्षी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १५ लाख मुलींची लग्न होतात. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत तब्बल १५ हजारांहून अधिक बालविवाह झाले असल्याची धक्कादायक माहिती आहे. तर १८ वर्षांखालील तब्बल १५ हजार २५३ मुली माता बनल्याचीही माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे २००६ साली अस्तित्वात आलेला बालविवाह प्रतिबंध कायद्याची अद्यापही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसचं, केवळ १० टक्के बालविवाह रोखण्यातच राज्य सरकारला यश आलं आहे. ज्याची माहिती मिळाली, ते बालविवाह रोखले, परंतु गुप्तपणे झालेल्या बालविवाहांचे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कायदा असतानाही ही प्रथा बंद झाली नसल्याने कायद्यात दुरुस्तीची वेळ आली आहे, असे जाणकारांचे मत आहे. लोक इंस्टाग्राम वापरायला लागले पण त्यांचे विचार बदलले नाहीत हे यातून लक्षात येते. नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार, २०१९, २०२०, २०२१ या ती...

नाटू - नाटू... च यश

 जागतिक पातळीवर सन्मानाचा असा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. नुकत्याच झालेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. आरआरआर या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याआधी स्लमडॉग मिलेनिअरच्या वेळी अशीच चर्चा झाली होती. तेव्हा जय हो गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता. तो चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन डॅनी बॉयल ने केलं होतं. ‘नाटू’ शब्दाचा अर्थ अस्सल देशी आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे. हे गाणं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत आहे. यात एक कमकुवत लोक नाचता नाचता अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना आव्हान देतात आणि नमतं घ्यायला लावतात. याबाबत कुणाचंच दुमत नाहीय की, आरआरआरच्या यशाचं एक कारण सिनेमातील नाटू नाटू हे...

भारतातील बेरोजगारीतील वाढ चिंताजनक

वाढती बेरोजगारी ही भारतामधील एक प्रमुख समस्या आहे. गेली अनेक दशकं भारताला ही सामाजिक समस्या सतावतेय. हाताला काम मिळावे म्हणून देशातील तरूण वर्ग वणवण भटकतो आहे. पण सरकारी वा खासगी कुठल्याच क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीच उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांच्या या फौजांवर वैफल्यग्रस्त होण्याची वेळ आली आहे. देशात बेरोजगारीचा दर पुन्हा वाढलेल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. विशेष: सुशिक्षित तरुणांची यामध्ये संख्या मोठी असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. फेब्रुवारीमध्ये हा दर ७.४५ टक्के राहिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इन इंडियन इकॉनॉमीने सांगितले की, शहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर वाढला आहे. शहरांमधील बेरोजगारीचा दर जानेवारीत ८.५५ टक्क्यांवरून ७.९३ टक्क्यांवर घसरला आहे. ग्रामीण भागामध्ये तो वाढून ६.४८ टक्क्यांवरून ७.२३ टक्के झाला आहे. केंद्र सरकार मात्र बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनविन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाची औद्योग...

देशातील घरकामगारांना गुलामाची वागणूक

देशातील ९ १ लाखांपेक्षा अधिकच्या घरकामगारांना कामाच्या ठिकाणी गुलामाची वागणूक मिळत असल्या ची बाब एका संशोधनातून समोर आ ली आहे. आपल्या मागण्यांविषयी घरेलू कामगारांनी अलिकडेच नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर डोमेस्टिक वर्कर्सच्या बॅनरखाली २० हून अधिक राज्यांत आंदोलन केले होते. घरकाम करणाऱ्यांकडून घरातील धुणी, भांडी, कचरा, लादी, डस्टिंगपासून सगळी कामे केली जातात. मात्र या कामाचे पैसे न ठरल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा मोबदला मिळतो. अनेकदा हा मोबदला घरकामगार काय मागणी करतो, ज्याच्या घरी काम करायचे त्याचे बार्गेनिंग स्किल अशा गोष्टींवर अवलंबून असतो. घरकामगारांना मिळणारा पगार हा शहरांमधील सामाजिक आर्थिक स्तरानुसार ठरतो. बंगळुरूतील कंपनी बाबाजॉब.कॉमच्या स र्व्हे नुसार, भारतात काम करणाऱ्यांना घरकामगारांना दरमहा १० हजारांपेक्षा कमी रुपये मिळतात. अहमदाबादमध्ये यांना दरमहा ६५०० रुपये मिळतात. तर मुंबईतील घरांत काम करणाऱ्यांना ७५०० रुपयांपर्यंत मिळतात. कोलकात्यात हे सर्वात कमी ५००० रुपये आहे. छोट्या शहरांत हा पगार ३००० ते ४००० दरम्यान असतो.   मोठ्या शहरांमध्ये झारखंड, रांची, आसाम, ओडिशा या राज्...