मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धगधगते काश्मीर आणि मोदी सरकार

 एप्रिल २०१६ मध्ये जम्मू काश्मीरमधिल कटरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींची आठवण काढताना म्हणाले होते की, अटलजींनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कार्यकाळात खूप मोठे योगदान दिलेले असल्याने काश्मीर मधिल जनता अटजींवर खूप प्रेम करते आणि त्यांचा खूप सन्मान करते.या ठिकाणी पंतप्रधानांनी सगळ्यांना सोबत घेवून विकास साधण्याचा भरोसा देवून वाजपेयीजींचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन दिले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेकडे काश्मीरी जनतेने खूप अपेक्षेने बघितले होते.मात्र आता मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होवून ३ वर्षे होवून गेल्यानंतरही काश्मीरचा प्रश्न जैसे थे आहे,उलट काश्मीर अधिकच धगधगत आहे.काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा बलांवरील दहशतवादयांकडून होणा-या हल्ल्यात वाढ झाली आहे तर काश्मीरी तरुणांकडून सुरक्षा बलांवर मोठया प्रमाणावर दगडफेकीचे प्रकार होत आहेत.यामुळे मोदी सरकारला विचारावे लागेल की,पाकिस्तान दबावाखाली का येत नाहीय?पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी देणे सोडून आपल्यासोबत चर्चेसाठी पूढे का येत नाहीय? काश्मिरच्या प्रश्नावर कायम तोडगा काढण्य...

राजकारण्यांना पेंशन मग शासकिय कर्मचा-यांना का नाही ?

हि बाब खरी आहे की आज ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे ते समाज आणि देशहिताला बाधक आहे , पण केवळ या आधारावर राजकारणाला देशासाठी घातक मानने तर्कसंगत होणार नाही.राजकारणातून काही महत्वपूर्ण गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे देश विकासाला चालना मिळते आणि त्यामुळे राजकारण आणि समाजाच्या अंतर्संबंधाविषयी नव्याने विचार करण्यासाठी आपण विवश होतो.आजस्थितीला राजकारणात अनेक प्रकारची संकटे निर्माण होत आहेत.विशेषत: आज राजकारणात सामान्य गरिब माणसाला स्थान राहिलेले नाही. आज राजकिय नेत्यांत देशहिताऐवजी स्वार्थ सर्वोपरी झाला आहे.याचाच परिणाम म्हणून त्यांचे वेतन वाढवण्याचा मुद्दा असो किंवा पेंशनचा प्रश्न असो राजकिय नेते फार मोठया उत्साहाने यात सहभागी होतात.इतर प्रश्नावर वेळोवेळी विरोध करणारे राजकिय विरोधक ही या प्रश्नावर एकत्र आलेले आत्तापर्यंत दिसून आले आहे.माजी खासदार आणि आमदारांना दिल्या जाणा-या पेंशन आणि भत्यांवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभा टाकले आहेत. मी येथे उपस्थित केलेला प्रश्न अगदी बरोबर आहे.जेंव्हा सामान्य कर्मचारी ३०-३५ वर्षे शासकिय सेवा बजावतो तेंव्हा त्याला कुठे पेंशन मिळते.याउलट राजकिय नेत्या...

चला प्रतिष्ठा मोजूया

आपल्याला आश्चर्य वाटेल की, आजकाल मानहानी कुणाची,कशी आणि किती रूपयांची झाली आहे हे सर्व तराजूच्या साह्याने मोजता येवू लागल आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची मानहानी दहा कोटी रुपयांची झाली आहे की वीस कोटी रुपयांची याचा निर्णय आता तराजूच्या साह्याने तोलून केला जाईल.राजकीय नेत्यांच्या मानहानीच ठिक आहे,सामान्य नागरिकाच्या मानहानीची रक्कम कशी निश्चित केली जाईल?आपण सर्वांना आता सावध होऊन आप-आपली प्रतिष्ठा एखाद्या धर्मकाट्यावर जाऊन मोजून ठेवायला हवी जेणेकरून आपणही तात्काळ न्यायालयात दावा दाखल करू शकू की,माझी मानहानी झाली आहे.राजकीय नेत्यांमध्ये लागलेल्या मानहानीच्या स्पर्धेवरून हे लक्षात आले आहे की, जसा शेअरबाजाराचा सेंसेक्स असतो तसा मानहानीचाही सेंसेक्स असू शकतो. जशाप्रकारे आज वेगवेगळ्या पध्दतीचे मोबाईल अॅप बनत आहेत तसं मानहानी किती झाली आहे किंवा आपली प्रतिष्ठा नेमकी किती आहे हे मोजणारा मोबाईल अॅप बनायला हवा. चला आपण आता मूळ मुद्द्यावर येवू या.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५ मध्ये आम आदमी पार्टीच्या सहा नेत्यांविरुद्ध मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला होता. ही केस आजही...

लोकशाहीत मीडियाची भूमिका

  आधुनिक जगात लोकशाहीचा तीव्र गतीने विकास झाला आहे. मीडिया ही लोकशाहीची सशक्त संस्था आहे.रेडिओ,टि.व्ही,वर्तमानपत्र यासारख्या सर्व जनसंपर्क माध्यमांचा समावेश मीडियात होतो.कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक गतिविधिंचे प्रतिबिंब आपल्याला मीडियात दिसत असते.मीडिया हा लोकांचे विचार आणि दृष्टीकोनाला प्रभावित करत असतो.अनेक देशात झालेल्या सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांमध्ये मीडियाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी, मराठा यासारख्या वर्तमानपत्रांनी इंग्रजांविरूद्ध लोकजागृती करण्याचे काम केल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जेंव्हा आंदोलन केले होते तेंव्हा या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळवून देण्यात मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मीडियाच्या लोकशाहीतील या सशक्त आणि महत्वपूर्ण भूमिकेमुळेच ब्रिटनचे प्रसिद्ध राजकीय विचारवंत आमण्ड बर्क यांनी मीडियाला लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची उपाधी दिली. लोकशाही देशात जिथे विचारांची अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य घटनेने प्रदान केले आहेत तिथे ...

‘स्वप्न’ विकणा-या शाळा

शि क्षण विभागाने आता प्रत्येक शाळांना एक ठराविक संकेतांक दिला आहे. याला यू.डायस.क्रमांक असे म्हणतात. या क्रमांकाचा वापर शाळा अनेक ऑनलाईन कामे करण्यासाठी करतात. पूर्वी विद्यार्थ्याला शाळा बदलावयाची असेल तर तो पूर्वी शिकत असलेल्या शाळेचा टि.सी.नविन शाळेला दयावा लागे. आता यात थोडासा बदल झाला आहे. आता विद्यार्थ्याचे टि.सी मागणारे विनंती पत्र नविन शाळेकडून त्यांच्या यू.डायस.क्रमांकासह पूर्वीच्या शाळेला द्यावे लागते मगचं त्या विद्यार्थ्याचा टि.सी दिला जातो. एवढ्यावर त्याचा प्रवेश झाला असे नाही. जून्या शाळेमार्फत त्याचे नाव ऑनलाईन पद्धतीने फॉरवर्ड केल्याशिवाय त्याचा प्रवेश अधिकृत होत नाही. अशाच एका विद्यार्थ्याचे नाव फॉरवर्ड करताना एक गंमतीदार गोष्ट माझ्या समोर आली. संबंधीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पत्रावर नाव एका नामांकीत शैक्षणीक संस्थेचे होते तर ऑनलाईन मध्ये ते दुसरेच दिसत होते. म्हणजे दूकानावर मालकाचे नाव एक आणि खरा दूकानदार वेगळाचं. हि पालकांची शुद्ध फसवणूक झाली. शिक्षण एक व्यवसाय झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला. ग्रामिण भागात शिक्षणाच...

हरवत चाललेल्या मानवी संवेदना

                          म नात चीड आणणा-या नुकत्याच घडलेल्या काही घटना. मुंबईच्या जवळ उल्हासनगरमध्ये दोन लहान मुलांनी मिठाई चोरली म्हणून त्यांना नग्न करून त्यांचे मुंडन केले गेले. या मुलांना चपलाचा हार घातला गेला आणि याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. झारखंड मध्ये लहान मुलाच्या अपहरणाच्या संशयावरून आठ लोकांची खुलेआम हत्या करण्यात आली. काय चाललं आहे या आधुनिक जगात. स्पर्धेच्या या युगात आपला स्वार्थ वरचढ होत आहे,नाती मागे पडत चालली आहेत.या जीवघेण्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर विकास साधण्याच्या ईर्षेत आपण मानवतेच्या बाबतीत मात्र मागे पडत चाललो आहोत का?स्नेह,प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, भूतदया या संवेदना आपण हरवत चाललो आहोत का?  आपल्याला दररोज वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिन्यांवर माणुसकीला काळिमा फासणा-या अनेक बातम्या दिसतील.रोहतक मध्ये १० वर्षे वयाच्या मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने बलात्कार केला त्यामुळे ती गर्भवती राहिली.अशा प्रकारच्या बातम्या कानावर पडल्या की दु:ख तर होतेच पण चीड सुद्धा तेवढीच निर्माण...