एप्रिल २०१६ मध्ये जम्मू काश्मीरमधिल कटरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींची आठवण काढताना म्हणाले होते की, अटलजींनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कार्यकाळात खूप मोठे योगदान दिलेले असल्याने काश्मीर मधिल जनता अटजींवर खूप प्रेम करते आणि त्यांचा खूप सन्मान करते.या ठिकाणी पंतप्रधानांनी सगळ्यांना सोबत घेवून विकास साधण्याचा भरोसा देवून वाजपेयीजींचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन दिले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेकडे काश्मीरी जनतेने खूप अपेक्षेने बघितले होते.मात्र आता मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होवून ३ वर्षे होवून गेल्यानंतरही काश्मीरचा प्रश्न जैसे थे आहे,उलट काश्मीर अधिकच धगधगत आहे.काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा बलांवरील दहशतवादयांकडून होणा-या हल्ल्यात वाढ झाली आहे तर काश्मीरी तरुणांकडून सुरक्षा बलांवर मोठया प्रमाणावर दगडफेकीचे प्रकार होत आहेत.यामुळे मोदी सरकारला विचारावे लागेल की,पाकिस्तान दबावाखाली का येत नाहीय?पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी देणे सोडून आपल्यासोबत चर्चेसाठी पूढे का येत नाहीय? काश्मिरच्या प्रश्नावर कायम तोडगा काढण्य...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.