मुख्य सामग्रीवर वगळा

राजकारण्यांना पेंशन मग शासकिय कर्मचा-यांना का नाही ?

हि बाब खरी आहे की आज ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे ते समाज आणि देशहिताला बाधक आहे,पण केवळ या आधारावर राजकारणाला देशासाठी घातक मानने तर्कसंगत होणार नाही.राजकारणातून काही महत्वपूर्ण गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे देश विकासाला चालना मिळते आणि त्यामुळे राजकारण आणि समाजाच्या अंतर्संबंधाविषयी नव्याने विचार करण्यासाठी आपण विवश होतो.आजस्थितीला राजकारणात अनेक प्रकारची संकटे निर्माण होत आहेत.विशेषत: आज राजकारणात सामान्य गरिब माणसाला स्थान राहिलेले नाही. आज राजकिय नेत्यांत देशहिताऐवजी स्वार्थ सर्वोपरी झाला आहे.याचाच परिणाम म्हणून त्यांचे वेतन वाढवण्याचा मुद्दा असो किंवा पेंशनचा प्रश्न असो राजकिय नेते फार मोठया उत्साहाने यात सहभागी होतात.इतर प्रश्नावर वेळोवेळी विरोध करणारे राजकिय विरोधक ही या प्रश्नावर एकत्र आलेले आत्तापर्यंत दिसून आले आहे.माजी खासदार आणि आमदारांना दिल्या जाणा-या पेंशन आणि भत्यांवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभा टाकले आहेत.
मी येथे उपस्थित केलेला प्रश्न अगदी बरोबर आहे.जेंव्हा सामान्य कर्मचारी ३०-३५ वर्षे शासकिय सेवा बजावतो तेंव्हा त्याला कुठे पेंशन मिळते.याउलट राजकिय नेत्यांना अगदी थोडया कालवधीसाठी सेवा बजावल्यानंतरही पेंशन का दयावी?आता तर शासकिय नोक-यात जुनी पेंशन योजनाच बंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकिय आणि निमशासकिय कर्मचा-यांना आता नविन अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे.विशेषत: या नविन योजनेअंतर्गत येणा-या अनेक विभागातील कर्मचा‌-यांची अदयापही या योजनेअंतर्गत वेतनातून कपात सुरू करण्यात आलेली नाही.साहजिकच या कर्मचा-यांचे निवृतीनंतरचे भविष्य अंधकारमय आहे. अशा परिस्थितीत राजकिय नेत्यांना पेंशन देनेच लज्जास्पद आहे. राज्यात सध्याचे भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर ऑगस्ट २०१६ मध्ये आमदारांना दरमहा मिळणा-या रू.७५०००/- वेतनात भरघोस वाढ करून ते १.२५ लाख ते १.५० लाख रुपये तर कॅबीनेट मंत्र्यांना मिळणारे वेतन दरमहा १.५ लाख रूपये ते २ लाख रूपये करण्यात आले.हे वेतन महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मिळणा-या वेतनाएवढे आहे. त्याचप्रमाणे माजी आमदारांना एका टर्मचे रू.५०,०००/- निवृत्ती वेतन मिळते.यात टर्मनुसार प्रत्येक वेळी तेवढीच वाढ होईल.मागे लोक प्रहरी नावाच्या सामाजिक संस्थेने  माजी खासदार आणि आमदारांना आजीवन दिली जाणारी पेंशन आणि अन्य भत्ते रद्द करण्याची मागणी करणारी एक याचिकाच सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
मजेची बाब अशी की,जर कोणी राजकिय नेता एक दिवसही लोकप्रतिनिधी पदावर राहिला तर त्याला आजीवन पेंशन मिळते.या सामाजिक संस्थेने या व्यवस्थेला सामान्य नागरिकावरिल ओझ मानून असे म्हटले होते की,८० टक्के लोकप्रतिनिधी हे कोटयाधिश आहेत त्यामुळे त्यांना पेंशनची काहीच गरजच नाही. सरकारी कर्मच्या-यांना दिली जाणारी पेंशन ही सरकार आणि कर्मचा‌-यांच्या योगदानातून जमा झालेल्या फंडातून देली जाते याउलट  लोकप्रतिनिधींना दिली जाणारी पेंशन ही संचीत निधीतून दिली जाते यात त्यांचे काहीच योगदान असत नाही.खरंतर १९७६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माजी लोकप्रतिनिधींना दिली जाणारी पेंशन योग्यच असल्याचे म्हटले होते मात्र या नव्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,माजी लोकप्रतिनिधींना दिली जाणारी पेंशन आणि भत्ते योग्य असले पाहिजेत मात्र त्यात मनमानी नको.
हे एक कटुसत्य आहे की,आजकालच्या राजकिय नेत्यांची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत आहे.त्यांचा काही-ना-काही व्यवसाय आहे वा ते एखादया उदयोगाचे मालक आहेत.ही लोक समाजसेवेसाठी नाही तर सत्ता आणि वर्चस्व स्थापित करण्याच्या लालसेने राजकारणात येतात.पूर्वी राजकारण हे समाजसेवेचे एक सशक्त माध्यम होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ राजकारण्यात देशासाठी काहीतरी करण्याची भावना होती.यामुळेच तत्कालिन राजकारणी राजकारणाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यावर विशेष लक्ष देत असत.हळू-हळू राजकारणातील मूल्यांचा –हास होत गेला आणि हे सत्र आत्ताही सूरुच आहे.आत्ताच्या राजकिय नेत्यांच्या वर्तनावरून असे दिसून येते की,आपल्या स्वार्थासाठी ते कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार आहेत.त्यांच्यासाठी वैयक्तीक स्वार्थच सर्वोपरि आहे.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की,सध्याच्या राजकारणात समाजसेवा या शब्दाची काय प्रासंगिकता आहे.आज राजकारण हा एक व्यवसाय बनला आहे ज्यात समाजसेवेचा मुखवटा लावून जनतेसाठी केलेल्या कामाची किंमत जनतेकडूनच वसूल केली जात आहे,.हेच कारण आहे की,राजकारणात आज सामान्य प्रामाणिक नागरिकाला स्थान मिळण अवघड झाले आहे.एकीकडे शासकिय कर्मचा-यांना त्यांची हक्काची जुनी पेंशन मिळवून देणे गरजेचे आहे.दूसरीकडे मूल्यविहीन झालेल्या या राजकारणात आमदार आणि खासदारांच्या पेंशनवर पुर्नविचार व्हावा म्हणून दबाव बनवणे हेच वास्तविक दृष्टया राजकारणाला वैयक्तीक स्वार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरेल.

 -सुरेश मंत्री,धारूर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...