मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारी शाळांबाबत सरकारचीच अनास्था

                मा गील आठवड्यात हरियाणा मधील १०५७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप प्रयत्न करूनही या शाळांची पटसंख्या २५ च्या पुढे जात नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आलं आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात येईल अस शिक्षण विभागाने म्हटल आहे.                        कोरोना महामारीच्या आपत्कालिन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करुन महाराष्ट्रातील १० पटसंख्येखालील ४,६९० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०२० मध्ये घेतला होता. यापैकी १,७१४ शाळा कोकणातील आहेत. राज्याच्या तुलनेत ही टक्केवारी ३६ टक्क्यांहुन जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेश मध्ये थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ३५ हजार शाळा अशाच प्रकारे समायोजित करण्यात आल्या आहेत हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.  उत्तराखंड मध्ये जवळपास सातशे सरकारी शाळांना कुलुप लावण्यात आले. इथेही तोच राग शिक्षण विभागाने आवळला होता जो आत्ता हरियाणा मध्ये...

क्रिडा क्षेत्र कोरोनाच्या सावटाखाली

        भा रतासोबत संपूर्ण जगात कोविड-१९ महामारीला सुरुवात होवुन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान या महामारीने संपूर्ण क्रिडा क्षेत्राला सुद्धा ठप्प केले होते. या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर खेळाडू परत मैदानात उतरले होते मात्र जगात काही ठिकाणी या महामारीची दुसरी आणि काही ठिकाणी तीसरी लाट सुरू झाल्यामुळे परत एकदा याचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर होत आहे. काही स्पर्धा परत एकदा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धांमधुन खेळाडूंना माघार घ्यावी लागत आहे. याच ताज उदाहरण मुष्टियोद्धाचे आहे. मागील आठवड्यात स्पेनच्या कैस्टेलियोन मध्ये झालेल्या ३५ व्या बोक्साम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या तीन मुष्टियोद्ध्यांना अंतिम फेरीत पोहचल्यानंतरही कोरोनामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले होते. अॉल्मपिकसाठी क्वालीफाय केलेला आशिष कुमारचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यासोबत एका रुममध्ये राहणारे मोहम्मद हुसामुद्दीन आणि सुमित सांगवानला सुद्धा अंतिम फेरीतुन माघार घ्यावी लागली. असं मानलं जात की, या खेळाडूंच सुवर्ण पदक जिंकण पक्क होत. केवळ मुष्टियोद्धेच नाही तर...

सिनेमा बदलतोय

    न विन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या सतत होणाऱ्या घोषणांतुन हे स्पष्ट आहे की, कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या या कठिण काळातही भारतीय चित्रपट समुदायातील लोक सक्रिय राहिले. टाळेबंदीमुळे संपूर्ण जग ठप्प पडले असताना मिळालेल्या फावल्या वेळात भावी काळातील तयारीचे नियोजन त्यांनी केले. याच कारणाने सिनेमागृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू झाल्यामुळे, कोरोनावरील लस आल्यामुळे आणि थोडाफार प्रमाणात चित्रपटांचे शुटिंग सुरु झाल्यामुळे उत्साहित झालेल्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्या नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या तारखांच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महामारीमुळे कोरड्या झालेल्या मनोरंजनाच्या मैदानात या घोषणांच्या पावसामुळे दर्शकांसाठी लवकरच चित्रपटांचे पीक बहरेल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ओटीटीच्या रुपाने नवीन बटाईदार सुद्धा उपस्थित असेल. मागिल वर्षी पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतरही चित्रपट बाजारात हालचाल झाली नाही. चित्रपटगृहे तर सुरु झाली मात्र दर्शक व चित्रपटांची तंगी राहिली. आता मात्र स्थिती सामान्य होताना दिसत आहे. मागिल महिन्यातच चित्रपट ...