अ मेरिकेनंतर भारत जगातील दूसरा असा देश आहे जिथे मोठया प्रमाणावर रस्ते आहेत. अमेरिकेकडे ६७ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळ आहे तर भारताकडे जवळपास ५९ लाख किलोमीटर. भारतात मोठया प्रमाणावर महामार्ग तयार केले जात आहेत. हे महामार्ग तयार करण्यासाठी एकीकडे मोठया प्रमाणावर झाडांची कत्तल करून बळी दिला जात आहे तर यावर होणा-या अपघातांमुळे दरवर्षी दिड लाख लोकांचाही बळी जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वेळ ही जगाची सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. मग हा वेळ वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून जास्त वेगाकडे पाहिल जात आहे. ताशी शंभर पेक्षा जास्त वेगाने वाहने धावू लागली आहेत. रस्त्यांवरिल या वेडेपणापासून महानगरातील लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुक सेवेने काही प्रमाणात वाचविले होते, मात्र कोरोनामुळे या सेवांमध्ये अनियमितता आली. याच कारणांमुळे केवळ लॉकडाऊन नंतरच्या अवधित रस्ते अपघातात ६५ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. लोकांना आपला वेळ वाचवण्यासाठी वेग हवा आहे. हा वेग़ आणखीन वाढवण्यात ऑटोमोबाईल कंपन्या जुटल्या आहेत तर सरकारं द्रुतगती मार्ग बनवुन या कामात जणु त्यांची मदत करित आहेत. अर्थशास्त्रज्ञानांनाही अस वा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.