मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ही वाट दूर जाते

अ मेरिकेनंतर भारत जगातील दूसरा असा देश आहे जिथे मोठया प्रमाणावर रस्ते आहेत. अमेरिकेकडे ६७ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळ आहे तर भारताकडे जवळपास ५९ लाख किलोमीटर. भारतात मोठया प्रमाणावर महामार्ग तयार केले जात आहेत. हे महामार्ग तयार करण्यासाठी एकीकडे मोठया प्रमाणावर झाडांची कत्तल करून बळी दिला जात आहे तर यावर होणा-या अपघातांमुळे दरवर्षी दिड लाख लोकांचाही बळी जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वेळ ही जगाची सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. मग हा वेळ वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून जास्त वेगाकडे पाहिल जात आहे. ताशी शंभर पेक्षा जास्त वेगाने वाहने धावू लागली आहेत. रस्त्यांवरिल या वेडेपणापासून महानगरातील लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुक सेवेने काही प्रमाणात वाचविले होते, मात्र कोरोनामुळे या सेवांमध्ये अनियमितता आली. याच कारणांमुळे केवळ लॉकडाऊन नंतरच्या अवधित रस्ते अपघातात ६५ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. लोकांना आपला वेळ वाचवण्यासाठी वेग हवा आहे. हा वेग़ आणखीन वाढवण्यात ऑटोमोबाईल कंपन्या जुटल्या आहेत तर सरकारं द्रुतगती मार्ग बनवुन या कामात जणु त्यांची मदत करित आहेत. अर्थशास्त्रज्ञानांनाही अस वा...

एकाचवेळी निवडणूका सोईच्या

सं विधान दिवसाच्या निमित्ताने देशातील सर्व निवडणूका एकाच वेळी घेण्याची मागणी परत एकदा करण्यात आली. म्हणजे लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका वेगवेगळ्या वेळी घेण्यात येवू नयेत. या सर्व निवडणूका एकाचवेळी एकाच निश्चित तारखेला घेण्यात याव्यात. ही मागणी भाजपाच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या घोषणापत्रातही होती मात्र यावर आत्तापर्यंतही अंमल करण्यात आला नाही. या मुद्दयावर विचारविनिमय करण्यासाठी भाजप सरकारने २०१४ मध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र जवळपास सर्व महत्वपूर्ण राजकिय पक्षांनी या बैठकीत सहभाग घेतला नव्हता. कम्युनिस्ट पक्षाने या बैठकीत भाग तर घेतला मात्र त्याने या प्रस्तावाचा विरोध केला होता. देशातील पहिल्या चार निवडणूका १९५१-५२, १९५७, १९६२ आणि १९६७ याच तत्वावर झाल्या होत्या. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी झाल्या होत्या. फक्त केरळ आणि ओरिसामध्ये १९६०-६१ मध्ये परत मध्यावधी निवडणूक झाली होती. १९६७ नंतर मात्र देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी कधीच घेण्यात आल्या नाहीत. या नंतरच्या सर्व लोकसभा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकल्या न...