मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना: बेरोजगारी आणि उपासमारीचे आव्हान

भा रत आता द्विधा अवस्थेत आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रीयेअंतर्गत रेल्वे, मेट्रो, हवाई वाहतूक, कार्यालये, बाजार आणि कंपन्या सर्व काही सुरू झाले आहेत तर दूसरीकडे कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वत: भारताची महामारीपासून महत्तम महामारीकडे घोडदौड सुरू आहे. या घोडदौडीत त्याने जगातील अधिकतर देशांवर मात केली आहे. एक काय तो अमेरिका पूढे आहे. ब्राझील आणि भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा ४१ लाखांच्या जवळपास बरोबरीत पहुंचला, नंतर मात्र भारताची बुलेट ट्रेन एवढी सुसाट धावू लागली की, ब्राझील खूप मागे पडला. रूग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला तर भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. सध्या भारतात दररोज कोरोनाने संक्रमित होणा-या रूग्णांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे. यात शंका नाही की या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं जीव तोडून प्रयत्न करित आहेत. दररोज १० लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आत्तापर्यंत जवळपास ५ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे मात्र १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात तपासणीचा वेग असाच राहिला तर सर्वांची तपासणी करण्यात वर्षे लागतील...

काँग्रेसला मजबुत नेतृत्वाची गरज

काँ ग्रेसच्या महत्वपूर्ण २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक विशेष संयुक्त पत्र लिहून पक्ष संघटनेच्या विविध समित्यांच्या निवडणूका घेऊन निवडणूकीद्वारे पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची मागणी केल्याची अभूतपूर्व घटना मागच्या सप्ताहात घडली. यावर राहुल गांधी यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या २३ जणांच्या मागणीला बंडखोरी ठरवून या नेत्यांचे पक्षातुन खच्चीकरण करून त्यांचे राजकारण अप्रत्यक्षरित्या संपविल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. मागील दोन लोकसभा निवडणूकींचा निकाल पाहिला असता काँग्रेसची मोठया प्रमाणात घसरण झाली आहे. काँग्रेस मध्ये पक्ष नेतृत्वाची सुत्रे काही अपवाद सोडता नेहमी गांधी घराण्याच्या भोवती फिरत आली आहेत. काँग्रेसला नवसंजिवनी द्यायची असेल तर आत्ता मात्र मजबुत नेतृत्वाची गरज आहे. प्रादेशिक पक्षांचे तसं बर आहे. यांच्यात अध्यक्षाला घेवून भांडणे होत नाहीत. ज्याचा पक्ष तोच अध्यक्ष. पक्ष सुद्धा तो बनवतो ज्याच्याकडे वोट बँक आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्वावरून भांडण झाल तर हा वाद कौटुंबिकच असतो तोही तेंव्हा जेंव्हा  राजकिय वारसा सांभाळण्याचा प्रश्न निर्म...