एकदा एका सहकाऱ्यासोबत सहज गप्पा रंगल्या होत्या. विषय होता – खरा मित्र कोण? मी त्याला विचारले, "तुझा सर्वात विश्वासू मित्र कोण आहे?" तो आत्मविश्वासाने म्हणाला, "अनेक आहेत." मी हसतच म्हणालो, "बरं, त्यापैकी चार जणांची नावे सांग." काही क्षणांत संपेल असे वाटणारे ते उत्तर बराच वेळ येईनाच. अखेर त्याने कसाबसा एकच मित्राचे नाव घेतले. तेही जणू संकोचाने. त्या क्षणी मला जाणवले—मित्रांची संख्या सांगणे सोपे असते; पण मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, अशी व्यक्ती शोधणे मात्र फार कठीण असते. पुढे त्यानेच मला विचारले, "मग खरा मित्र कोण असतो?" मी शांतपणे उत्तर दिले, "संकटाच्या वेळी सर्वप्रथम ज्याची आठवण येते, तोच खरा मित्र." हे उत्तर ऐकून तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित मी त्याच्या मनातीलच एखाद्या न बोललेल्या सत्याला शब्द दिले होते. आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे. एका क्लिकवर हजारो माणसे जोडली जातात; पण मनांमधील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या संपर्क यादीत शेकडो नावे आहेत, समाजमाध्य...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.