मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता मशिनच ऐकते सर्व दु:ख

  आ जच्या युगात विचारांच्या देवाणघेवाणीचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून इंटरनेटकडे पाहिले जाते. मात्र जसं-जस याचा उपयोग वाढत आहे संचार क्षेत्रातील मानवीयतेची जागा तंत्रज्ञान घेवू लागले आहे. मानवी चेहरा गायब आहे. ही स्थिति समस्येचे समाधान करण्याऐवजी तिला आणखीनच वाढवत आहे. मग त्या सोशल नेटवर्किंग साइट्स असो वा सेवा देणा-या ऑनलाईन कंपन्या, यातील अधिकाधिकच्या बाबतीत एकतर आपल्याला जास्त काही माहित नाही, ना आपल्या समस्या, वेदना आणि आनंद आपल्या आवाजात यांच्यापर्यंत पोहचवु शकतो. जे काही सांगायच आहे लिहुन सांगा. यानंतर या कंपन्यांच्या एखाद्या जबाबदार व्यक्तीला योग्य वाटल तर त्यांच्या सोईनुसार त्यांचा एखादा कर्मचारी आपल्याशी संपर्कही करेल. ऑक्टोंबर २०२० पर्यंत फेसबुकचे २.४५ सक्रीय ग्राहक होते. यात जगात सर्वाधिक लोकसंख्या असणा-या चीन आणि भारताच्या नागरिकांचाही समावेश आहे. आपल्याला काय आवडते, काय नाही आवडत, आपण काय खरेदी करतो, कुठे फिरायला जातो यासारखी माहितीच नाही तर आपल्या घरातील सदस्यांचे, मित्रांचे फोटो आणि व्हिडिओ सर्व काही फेसबुक आणि ट्विटर सारख्या साइटसकडे आहे. दूसरीकडे एका संस्थागत तंत्र...