मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नकोशी

न विन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नुकतीच झाली होती. मी शाळेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करुन घेत होतो. प्रत्येक जण आपली ओळख करुन देत होता. एका विद्यार्थीनीने आपले नाव  ‘ नकोशी’ असल्याचे सांगितले. हे नाव ऐकताच माझ्या मनावर एकप्रकारे आघातचं झाला. व दिवसभर माझ्या मनात विचार येवू लागला , व “का बरे तिचे नाव नकोशी ठेवले असेल  ?  इतर दूसरे चांगले नाव तिच्या पालकांना का नाही सुचले ?”               दुस‌‌-या दिवशी मी तिला बोलावून तिची कौटुंबीक माहिती जाणून घेतली. तिला दोन मोठ्या बहिणी होत्या ,  तिचा क्रमांक तिसरा होता. तिसरीही मुलगीच झाल्याने तिच्या घरातील काहींनी तिचे नामकरण संस्कार करण्याअगोदरच तिला ‘नकोशी’   म्हणुन हाक मारायला सुरुवात केली होती. तिच्या आई-वडिलांची परवानगी न घेता घरातील एका वडिलधा-याने तिचे नाव शाळेत प्रवेश देताना नकोशी असेच टाकले होते. मी विचार केला  ‘ आता हि लहान आहे म्ह्णून तिला या नावा मागचा हेतू कळत नाही मात्र हि मोठी झाल्यावर हिच्या मनावर किती आघात होईल ? आपण ...

बाबुजी धिरे चलना.....

बाबुजी धिरे चलना..... ‘ बाबुजी धिरे चलना , जरा सँभलना , बडे धोके है इस राह में’ हे गीत जरी प्रेमाच्या वाटेतील धोक्यांबद्दल असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांच्या बाबतीत ही सत्य ठरते.रस्ते अपघातांबद्दल आज कुणाला माहित नाही.प्रत्येक महिन्यात आपण आपल्या नातेवाईक , मित्र वा ओळखीच्या व्यक्तीच्या अपघाताबद्दल ऐकतो किंवा एखादया अपघाताचा प्रत्यक्ष साक्षिदार होतो.आज आपण एखादया महत्वाच्या कामासाठी जर बाहेर पडलो तर ते काम करून आपण परत घरी येवू का नाही हे सांगता येत नाही.कारण आज रस्त्यांवर चालणे अवघड झाले आहे . आज प्रत्येकाला रस्त्यावर पायी चालताना किंवा वाहन चालवताना भिती वाटत आहे.नेमक या मागील कारण काय आहे ? काही दिवसांपूर्वीची माझ्यासमोरच घडलेली घटना आहे.दोन अल्पवयीन मुलांनी मोटारसायकलची शर्यत लावली आणि रहदारीची वर्दळ असलेल्या रस्त्यावर तुफान वेगाने गाडया पळवण्यास सुरुवात केली.काही क्षणातच धडाम असा आवाज आला व लोकं आवाजाच्या दिशेने धावू लागली.या पैकी एकाच्या मोटारसायकलीने समोरून येणा-या शिक्षकाला धडक दिली होती.त्या बिचा-या शिक्षकाचा एक पाय या अपघातात जायबंदी होवून कायमचे अपंगत्व आले. शहर अ...

व्यथा ‘शेतमजुरांची’

व्यथा ‘शेतमजुरांची’ आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे . भारतातील ६० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा शेती संबंधीत व्यवसायावर अवलंबून आहे.गेल्या ३-४ वर्षात महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडयात भयंकर दुष्काळ होता.सतत नापिकीला कंटाळून महाराष्ट्रात २०१५ मध्ये जवळपास ३ , २२८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या.हा आकडा गेल्या १४ वर्षातील सर्वोच्च आकडा आहे.शेतक-यांच्या या आत्महत्येचा प्रश्न सतत चर्चिला जातो.मात्र ही चर्चा एकांगी आहे असे मला वाटते.शेतीवर फक्त शेतक-यांचेच पोट अवलंबून आहे असे नाही तर असा एक वर्ग आहे ज्याचा विचार कुठेच केला जात नाही.जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच शेतीचीही एक दुसरी बाजू आहे तो म्हणजे शेतमजुर.हा वर्ग या काळात कसा जगला ? या शेतमजुर वर्गापैकी किती लोकांनी आत्महत्या केल्या याचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.शेतमजुर हा असा वर्ग आहे जो कायम दुर्लक्षीत आहे.जिथे शेतक-यांचीच ही दयनीय अवस्था आहे तिथे आपले रोजचे पोट फक्त आणि फक्त शेतीत मजुरी करून मिळणा-या पैशावरच अवलंबून आहे तो शेतमजुर वर्ग सध्या कोणत्या अवस्थेत आहे याचाही विचार व्हायला हवा. शेतमजुर या अशा व्यक्ती आहेत ज्या इतरा...

भारतीय चित्रपट आणि समाज-जागृती

भारतीय चित्रपट आणि समाज-जागृती चित्रपट आधुनिक युगातील महत्वपूर्ण देण आहे.ई.सन.१९७०नंतर भारतीय समाजात चित्रपटांचा अधिक प्रसार झाला. हिंदी चित्रपटांबरोबर अनेक प्रादेशिक चित्रपट निर्माण होत आहेत.चित्रपट हे नाटक व तमाशाचे आधुनिक रूप आहे ज्याने आपल्या नविन रुपाने मानवाचे जीवन व समाजाला सर्वांगाने प्रभावित केले आहे.यात साहित्य व कला यांचा सुंदर मिलाप करून मानवाचे जीवन जीवंत रुपाने चित्रीत केले जाते.देशात चित्रपट उदयोगात मोठी वाढ झाली असून हा जीवनाचा आवश्यक घटक बनला आहे. चित्रपटांचा समाजावर व्यापक प्रभाव पडतो. चित्रपट हे न केवळ मनोरंजनाचे एक सोपे व स्वस्त साधन आहे तर यात सामाजाचे वास्तविक चित्र उभे केले जाते.देशस्थिती व समाजिक वातावरण यांचे हुबेहुब चित्र डोळ्यांसमोर उभे करून एका यशस्वी आलोचकाची भुमिका चित्रपट निभावतात.जीवनाचा असा एकही अंग नाही ज्याची वास्तव वाटेल अशी उभारणी पडदयावर केली जात नाही.समाजातील अनेक वाईट गोष्टींवर याद्वारे प्रकाश टाकला जातो व सामाजिक संदेश देवून समाजागृती करण्याचे काम केले जाते. जसे स्त्री अत्याचार , व्यसनाधिनता , अंधश्रद्धा , शोषण , बेरोजगारी , भ्रष्टाचार ...

भारतीय सेनेत पारदर्शकतेची आवश्यकता

भारतीय सेनेत पारदर्शकतेची आवश्यकता भारतीय सेना जगातील सर्वाधिक शिस्तबध्द सेन्या मधिल एक समजली जाते , परंतू दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की , गेल्या काहीं दिवसांपासून सोशल मीडिया वर भारतीय जवानांद्वारा जे काही व्हीडिओ शेअर केले जात आहेत त्यामुळे भारतीय सेनेच्या टिकाकारांना एक आयती संधी प्राप्त झाली आहे . जम्मू-काश्मिर मध्ये तैनात सिमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादुर यादव याने जवानांना मिळ्णा-या गुणवत्तेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उठवले तर लांस नायक यज्ञ प्रताप सिंह ने आरोप लावला की , सेनेतील अधिकारी जवानांचे शोषण करतात.सीआरपीएफ मधील जवान जीत सिंह याने सुविधांची कमतरता आणि सेना आणि निम लष्करी दलात भेदभाव होत असल्याचा व्हिडिओ फेसबुक आणि युटयुब वर पोष्ट केला.अर्थात गृह मंत्रालयाने नुकत्याच पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या रिपोर्ट मध्ये तेज बहादुर यादव च्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून सिमा सुरक्षा दलाकडे पुरेसा राशन पुरवठा होत असल्याचे म्हटले आहे.  तरीही भारतीय सेना आणि सरकारला या गोष्टीला सहजतेने घेण्याऐवजी अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.या व्हि...

हरवत चाललेलं बालपण

आ युष्य हे कौटुंबीक अडचणींपासून रहदारीच्या कोंडीपर्यंत तणावाने भरलेले आहे. मग जीवनातील तणाव मूक्त काळ कोणता ?  बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटल जात पण खरंच हे बालपण आज सुखाच राहिल आहे का ?  आपण विकासासोबत काय-काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार केला तर आपण मुलांच्या वाट्याच बालपण हिरावून घेतल आहे आणि त्यांच्या बालपणाला यांत्रिक बालपण बनवून ठेवल आहे. जरा आठवून पहा जेंव्हा आपण आणि माझ्या सारखी मुल जगाच्या चिंतेपासून मूक्त होवून सकाळी आणि संध्याकाळी आपापल्या गल्लीत गट बनवून कधी लपंडाव खेळताना आपल्या सहका-यांना शोधायचो तर कधी विटी-दांडू खेळायचो. आठवा ते पावसाच येण आणि कागदाची नाव बनवून त्या वाहत्या पाण्यात सोडण , ती नाव जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा पाठलाग करणं. आठवा ते कागदाची पतंग बनवणं आणि ती जोरदार वा-यात उडवणं. खरंच आपल बालपण किती मजेदार आणि आनंदायी होत. एक काळ होता जेंव्हा बालपण खेळण्या-खेळण्यात निघून जायच. बालपणात सोबती होत्या त्या खेळणी. आजही या बालपणीच्या आठवणी ताज्या आहेत आणि हा काळ आठवला तर परत पुन्हा-पुन्हा बालपण आयुष्यात यावेसे वाटते. आता मात्र गल्लीतील हा बालकांच...