मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण सगळेच प्रेमाचे हत्यारे

अ नुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रेम संबंधाची परिणीती लग्नामध्ये झाली या गोष्टीला जास्त दिवस झाले नाहीत..त्यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात त्यावेळी मोठया उत्साहाने होत होती. त्यांची पहिली भेट ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची चर्चा सगळ्या न्यूज चॅनल , वर्तमानपत्रे  आणि सोशल मीडियावर घडवून आणली जात होती.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लग्नाच्या स्वागत सभारंभाला हजेरी लावून या नवविवाहित दांपत्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या जोडीचा एक-एक फोटो प्रेमाच्या यशस्वीतीचे उदाहरण म्हणून बघीतले जावू लागले. मात्र याच्या काही दिवसानंतर आणि वैलंटाइंस दिवसाच्या अगोदर अंकित नावाच्या तरूणाची दूस‌-या धर्माच्या मुलीसोबत प्रेम करण्याचा गुन्हा केल्यामुळे खुलेआम हत्येची बातमी येते तिही देशाची राजधानी दिल्लीत घडलेली.एकीकडे आपला समाज प्रेमाचा आनंद साजरा करतो तर दूसरीकडे याच प्रेमाला सहन करू शकत नाही हा किती विरोधाभास आहे. याचा अर्थ असा की , प्रेम चित्रपटात , सेलीब्रेटीजचे किंवा इतर कुणाचे असेल तर ते चांगले वाटते मात्र आपल्या कुटुंबात त्याने आपले पाय पसरू नयेत. आपल्या घराचा उ...

बाहेर सगळेच वाघ असतात पण घरात .......

सं कट कधीच सांगून येत नाही.ज्या गोष्टींबाबत कधी आपल्या पूर्वजांनीही कधी विचार केला नसेल त्याही अचानक संकटात येतात. जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत त्याप्रमाणे संकटेही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही.सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जग हे नानाविध संकटांनी आणि त्यांचा सामना करणा-या शूर-विरांनी भरलेले आहे.नुकतेच काहीं दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेवून त्यात ज्याप्रकारे लोकशाही संकटात असल्याची आशंका व्यक्त केली त्यामुळे मला सुद्धा नैतीक बळ मिळाले आहे की , मी सुद्धा माझ्या वैवाहिक जीवनातील संकटांबाबत काही गोष्टी आपल्यासमोर ठेवू ईच्छीतो. या जगात मी काही एकटा पति नाही जो या संकटाला झेलत असेल. जवळपास सर्व प्रकारचे पति या संकटाला झेलत रोजचे जीवन जगत , मरत व्यतीत करीत आहेत.माझे हे वैयक्तीक मत आहे की , वैवाहिक जीवनातील अडचणी संकटापेक्षा वेगळ्या नाहीत. या संकटाची तलवार सतत डोक्यावर लटकत असते.पति होण्याच्या नात्याने या संकटाला मी रोज कसे तोंड देतो हे माझे मलाच माहित. पहिल्यांदा मलाही वाटत होते की , वैवाहिक जीवनात आनंद ही आनंदआहे....