मुख्य सामग्रीवर वगळा

बाहेर सगळेच वाघ असतात पण घरात .......

संकट कधीच सांगून येत नाही.ज्या गोष्टींबाबत कधी आपल्या पूर्वजांनीही कधी विचार केला नसेल त्याही अचानक संकटात येतात. जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत त्याप्रमाणे संकटेही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही.सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जग हे नानाविध संकटांनी आणि त्यांचा सामना करणा-या शूर-विरांनी भरलेले आहे.नुकतेच काहीं दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेवून त्यात ज्याप्रकारे लोकशाही संकटात असल्याची आशंका व्यक्त केली त्यामुळे मला सुद्धा नैतीक बळ मिळाले आहे की, मी सुद्धा माझ्या वैवाहिक जीवनातील संकटांबाबत काही गोष्टी आपल्यासमोर ठेवू ईच्छीतो. या जगात मी काही एकटा पति नाही जो या संकटाला झेलत असेल. जवळपास सर्व प्रकारचे पति या संकटाला झेलत रोजचे जीवन जगत,मरत व्यतीत करीत आहेत.माझे हे वैयक्तीक मत आहे की, वैवाहिक जीवनातील अडचणी संकटापेक्षा वेगळ्या नाहीत. या संकटाची तलवार सतत डोक्यावर लटकत असते.पति होण्याच्या नात्याने या संकटाला मी रोज कसे तोंड देतो हे माझे मलाच माहित.
पहिल्यांदा मलाही वाटत होते की,वैवाहिक जीवनात आनंद ही आनंदआहे.या जीवनात प्रेम ही प्रेम आहे, प्रेमाशिवाय काही नाही. जीवनात चोविस तास वसंतही वसंत आहे.सुरूवातीला पत्नीच्या हट्टात माझ्याप्रती मला सन्मान दिसत होता. तिच्या या हट्टांना पूर्ण करण्यासाठी मी जीवनात जेवढी तत्परता दाखवली तेवढी शालेय जीवनात उत्तीर्ण होण्यासाठी कधी दाखविली नसेल. मात्र काळ जस-जसा लोटत गेला तस-तसे सर्व काही बदलत गेल. स्वत:च स्वातंत्र्य धोक्यात असल्याची जाणिव होवू लागली. रंग बेरंग होवू लागला. कधी-कधी अस वाटते की,कोणत्या संकटात येवून फसलो मात्र आता काहीच होवू शकत नाही न. एकवेळेस आपण समाजात जावून लोकशाही धोक्यात असल्यामुळे या विरोधात आवाज उठवू शकतो मात्र आपली पत्नी वा वैवाहिक जीवनाच्या विरोधात बोलण्याची हिंमत बांधू शकत नाही. अहो, जग काही म्हणेल अथवा आपल्यावर हसेल याअगोदर आपली पत्नी वा कुटुंबीयांनी आपले तीन तेरा वाजवलेच समजा.
मी असे बरेच मोठे-मोठे लोक बघितले आहेत जे मंचावरून मोठी-मोठी क्रांतीकारी भाषणे देतात आणि घरात गेले की,पत्नीपूढे गरीब गाय होवून बसतात माना त्यांना काही माहीतच नाही, समाज वा देशात काय चालले आहे. आपल्या वैवाहिक जीवनाची लोकशाही धोक्यात असल्याबाबत ते कधी ब्र सुद्धा काढणार नाहीत मात्र घराबाहेर पडले की देशाची लोकशाही धोक्यात असल्याबाबत संपूर्ण देशात हाहाकार माजवून देतील. यामुळेच तर मी देशाच्या लोकशाहीची चिंतासोडून आपल्या वैवाहिक जीवनाची लोकशाही अबाधित ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष देत असतो. तसा मी भारताच्या लोकशाहीच्या बाबतीत निश्चिंत आहे. आपल्या देशाची लोकशाही कधीच धोक्यात येवू शकत नाही. आता तर देशात ५६ इंच छातीची सरकार आहे,जी देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. या सरकारने पाकिस्तान आणि चीनची कशी पूंगी वाजवली हे तर आपण बघितले असेलच. अमेरिका आपल्या लोकशाहीने प्रभावित झाली आहे तर नुकतेच इस्त्राईलचे पंतप्रधान आपल्या लोकशाहीची भरभरून प्रंशसा करून आपल्या मायदेशी परतले आहेत.
आपली लोकशाही किती भक्कम आहे याची चूणूक पंतप्रधान मोदींच्या विदेश दौ-यांवरून दिसून येत आहे. संपूर्ण जगात भारताच्या लोकशाहीची चर्चा आहे आणि ईथे काही लोकांना भारताची लोकशाही धोक्यात असल्याची जाणिव होत आहे. आश्चर्यच आहे! मी तर म्हणतो, आपल्या वैवाहिक जीवनाच्या स्वातंत्र्याला वाचवणे महत्वपूर्ण आहे कारण यावरच माझा-आपला जीवनाचा आनंद टिकून आहे.ही लोकशाही वाचली तर असे माना देश, समाज आणि दूनियेत सर्व काही व्यवस्थित आहे. देश आणि सरकारच्या बाबतीत नाराजी ठेवली जावू शकते मात्र आपल्या पत्नीच्या बाबतीत नाराजी व्यक्त करणे म्हणजे आपल्या पायावर स्वत:च धोंडा मारून घेणे किंवा विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल. याला विनोद समजू नका. मी शंभर टक्के खरे बोलतो आहे. आपल्या वैवाहिक जीवनाच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवा. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपली सरकार आणि सेना सक्षम आहे. निश्चिंत रहा.
-सुरेश मंत्री,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...