मुख्य सामग्रीवर वगळा

हरवत चाललेलं बालपण


युष्य हे कौटुंबीक अडचणींपासून रहदारीच्या कोंडीपर्यंत तणावाने भरलेले आहे. मग जीवनातील तणाव मूक्त काळ कोणता बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटल जात पण खरंच हे बालपण आज सुखाच राहिल आहे का आपण विकासासोबत काय-काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार केला तर आपण मुलांच्या वाट्याच बालपण हिरावून घेतल आहे आणि त्यांच्या बालपणाला यांत्रिक बालपण बनवून ठेवल आहे. जरा आठवून पहा जेंव्हा आपण आणि माझ्या सारखी मुल जगाच्या चिंतेपासून मूक्त होवून सकाळी आणि संध्याकाळी आपापल्या गल्लीत गट बनवून कधी लपंडाव खेळताना आपल्या सहका-यांना शोधायचो तर कधी विटी-दांडू खेळायचो. आठवा ते पावसाच येण आणि कागदाची नाव बनवून त्या वाहत्या पाण्यात सोडण, ती नाव जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा पाठलाग करणं. आठवा ते कागदाची पतंग बनवणं आणि ती जोरदार वा-यात उडवणं. खरंच आपल बालपण किती मजेदार आणि आनंदायी होत. एक काळ होता जेंव्हा बालपण खेळण्या-खेळण्यात निघून जायच. बालपणात सोबती होत्या त्या खेळणी. आजही या बालपणीच्या आठवणी ताज्या आहेत आणि हा काळ आठवला तर परत पुन्हा-पुन्हा बालपण आयुष्यात यावेसे वाटते. आता मात्र गल्लीतील हा बालकांचा गलका कुठतरी हरवलाय.

बालपण हे हसण्या-बागडण्याचतणावापासून संपूर्णत: मूक्त असल पाहिजे अशा काळात आपण मुलांच्या हाती काय देत आहोत ज्या वयात आजोबाकाकामामा यांच्या खांद्यावर बसून खेळायला हवं अशा वयात दफ्तराच न पेलणार ओझ त्यांच्याच खांद्यावर आपण लादत आहोत. खरं तर पूर्वी स्वछंदपणे जगण्यासाठी ६ वर्षांचा काळ बालकाला मिळायचा आता हा काळ फक्त ३ वर्षांचा झाला आहे. ३ वर्षे पूर्ण होताच कधी जगाच्या जिवघेण्या स्पर्धेत आपल मुल टिकल पाहिजे म्हणून तर कधी दूस-यांच अनुकरण करून आपण त्याला शाळेत पाठवू लागलो आहोत. खरंच त्याच बालपण हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का ?

लहान-लहान निष्पाप मुलांनी खचाखच भरलेली स्कुल बस मी रोज सकाळी बघतो, अगदी जशी काय बकरी कोंबलीत. स्कुल बसच्या त्या जाळीतून जेंव्हा ते बाहेर बघतात तेंव्हा असं वाटत की जणू त्यांना कैद केल गेल आहे आणि हे कैदी या तुरुंगातून बाहेर बघतायत. ते रस्त्यावर असणा-या एखादया पिल्लासोबत खेळत असतात मात्र त्यांना समोरून येणारी स्कुल बस खुणावत असते. दूसरीकडे बालकांवर आता त्याच्या पालकांच्या अपेक्षांचे ओझे आहे. वर्गात त्याने सर्वात जास्त गुण मिळवले पाहिजेत म्हणून बरेचशे पालक त्यांना दम देत असतात. त्यामुळे त्यांना ते सतत अभ्यासात व्यस्त असावेत असे वाटते. जर त्याने मैदानावर जावून खेळण्याचा हट्ट केला तर त्याला जावू दिलं जात नाही. एक तर त्यांच मातीत अंग भरलेलं आपल्याला आवडत नाही किंवा तो ज्यांच्या सोबत खेळत असतो त्यापैकी कुणाच्यातरी पालकासोबत यांच जमत नसतं. मुलांसोबत मैदानावर खेळल्याने मुलांत सामाजिकतेची भावना निर्माण होते. मिळून मिसळून राहणे, शिस्त, बंधुता व समाजात कसे रहायचे या गोष्टी खेळामुळे निर्माण होतात. सोबत शारीरिक विकास ही होतो. आज जो सामाजिक स्तर ढासळत चालला आहे, नैतीक मुल्यांचा जो –हास होत चालला आहे, व्यक्तीगत स्वार्थाची भावना वाढिस होवू लागली आहे याचे हे ही एक कारण आहे की आपण मुलांना त्यांच्या स्वाभाविक खेळांपासून दूर करत चाललो आहोत.

मग या मुलांनी खेळ कुठे व कोणते खेळायचे ? तर कॉम्प्युटर वर व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईलवर. इंटरनेट, टि.व्ही, मोबाईल, मुळे मूलं निसर्गाचा आनंद घेवू शकत नाहीत. ती निसर्गापासून दूर जावून आभासी मनोरंजनाच्या जगात जगतात. कार्टून सिरियल्स आणि हिंसक व्हिडिओ गेम्स मुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, तणावएकटेपणा आणि हिंसक प्रवृती निर्माण होते. एकत-हेने मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासात अडथळा निर्माण होतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता आजी-आजोबांच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळत नाहीत. त्या त्यांना चारित्र्य संपन्न बनवत असतही मुलं देशाच भवितव्य बनत. आता आई-वडिल दोन्ही कामावर जातात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे बघायला वेळ नसतो. त्यामुळे मोबाईल व त्यावरिल इंटरनेटचा वापर करित-करित ही मुलं अ‍ॅक्शन चित्रपट, अश्लिल गाणे ते पॉर्न व्हिडिओज पर्यंत पोहचतात.

                           मुलांपासून प्रेम आणि मैत्रीची भावना आपण हिरावून घेतली आहे त्या ऐवजी आपण त्यांना देत आहोत दूस-यांशी स्पर्धा करणारे, तणाव आणि काहीही करायची भावना निर्माण करणारे टि.व्ही.शोज आणि स्पर्धा. मग या स्पर्धांसाठी दिवस-रात्र एक केली जाते. प्रत्येकाला वाटते की, आपले मूल हे जिंकायला हवं परंतू कोणीतरी एकच जिंकणार असतं. अशात जी मुलं हारतात त्यांना वाटते की, आपले संपूर्ण विश्वच संपले आहे. एवढ्याशा वयात अशा प्रकारची निराशा धोकादायक ठरू शकते. या उलट जे मुल जिंकत त्याच्यावर त्याच्या पालकांचे अभिमानाचे आणि अपेक्षांचे ओझे असतेच. याची परिणिती पूढे संघर्ष आणि शोषणात होते. खरंच लहान मुलात स्पर्धा असावी का एवढ्याशा वयात जिंकणे आणि हारणे यात भेदभाव का ? पालकांचा वैयक्तीक स्वार्थ, प्रतिस्पर्धा आणि तणावाच्या या खेळात मुलांचा आत्मविश्वास तुटतो आणि हारणा-या मुलात न्युनगंडाची भावना निर्माण होते. पालकांनी जर अशा स्पर्धेत भाग घेवू दिलाच तर त्यांचे यात भाग घेणे हेच महत्वाचे आहे. जिंकणे किंवा हारणे या पेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे की, काही तरी वेगळे करणे, महत्वाचे शिकणे, नविन लोकांना भेटणे व भिती दूर करणे कारण स्पर्धा या साठीच असतात. हे जर सर्व घडल तर ते हारूनही जिंकतात. मुलांचा पराजय ही स्विकारायला हवा. बालकांवर मेडल्स, ट्रॉफी आणि प्रमाणपत्राचा ताण कशासाठी ?

              मुलं ही फुलं आहेत त्यांना प्रसन्न ठेवलं पाहिजेया फुलांना जपणं महत्वाच आहे. आपण प्रामाणिकपणे आपल्या आसपासच्या कुटुंबातील वातावरणावर नजर टाकून आपल बालपण आणि आजच्या बालकांचे बालपण याची तुलना केली तर माझे म्हणने तुमच्या सहज लक्षात येईल. किती विरोधा भास आहे कीबालमजूरी करणारी किंवा कच-यातून प्लास्टिकच्या वस्तू गोळा करणारी बालके आजच्या भाकरीची सोय करण्यात गुंतली आहेत तर दूसरीकडे शाळेत जाणारी बालके भविष्याच्या भाकरीची सोय करण्यात. ज्या देशात बालपणीच एवढ झगडाव लागत असेल त्या देशाच भवितव्य काय असेल ? गरज आहे ती मुलांना ‘स्व’ च्या भावनेतून काढून ती समाजाला आपले कुटुंब समजेल आणि ‘वसुधैव कुटुम्बकम’ ची भावना वाढीस लागेल आणि ती या देशाचा जवाबदार नागरिक बनतील. एका कविने म्हटले आहे,

                   कागदाची ‘नाव’ होती.....

                   पाण्याचा ‘किनारा’ होता...

                   मित्रांचा ‘सहारा’ होता.....

                   खेळण्याची ‘मस्ती’ होती...

                   मन हे ‘वेडे’ होते....

                   ‘कल्पनेच्या’ दूनियेत जगत होतो...

                   कुठे आलो या ‘समजुतदारीच्या’ जगात....

                   या पेक्षा ते भोळे ‘बालपणचं’ सुंदर होते...

         -सुरेश मंत्री.

                              
       


                  

टिप्पण्या

  1. सर, तुमचेच बालपण खूप चांगले होते असे मला वाटते. तुमच्या बालपणीचे खेळ खूप चांगले होते.आपण या लेखातून प्रत्येकाला त्याच्या बालपणात घेऊन जातात. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...