मुख्य सामग्रीवर वगळा

लोकशाहीत मीडियाची भूमिका

 आधुनिक जगात लोकशाहीचा तीव्र गतीने विकास झाला आहे. मीडिया ही लोकशाहीची सशक्त संस्था आहे.रेडिओ,टि.व्ही,वर्तमानपत्र यासारख्या सर्व जनसंपर्क माध्यमांचा समावेश मीडियात होतो.कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक गतिविधिंचे प्रतिबिंब आपल्याला मीडियात दिसत असते.मीडिया हा लोकांचे विचार आणि दृष्टीकोनाला प्रभावित करत असतो.अनेक देशात झालेल्या सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांमध्ये मीडियाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी, मराठा यासारख्या वर्तमानपत्रांनी इंग्रजांविरूद्ध लोकजागृती करण्याचे काम केल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जेंव्हा आंदोलन केले होते तेंव्हा या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळवून देण्यात मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मीडियाच्या लोकशाहीतील या सशक्त आणि महत्वपूर्ण भूमिकेमुळेच ब्रिटनचे प्रसिद्ध राजकीय विचारवंत आमण्ड बर्क यांनी मीडियाला लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची उपाधी दिली.

लोकशाही देशात जिथे विचारांची अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य घटनेने प्रदान केले आहेत तिथे या  विचार स्वातंत्र्याचा अतिशय योग्य उपयोग पध्दतीने जर कुणाकडून उपयोग केला जात असेल तर तो मीडियाद्वारेच.मीडियाचे देशातील काना-कोप-यात घडणाऱ्या अगदी लहान-सहान घटनांवर लक्ष असते त्यामुळे मोठ-मोठे सत्ताधारीही मीडियाचा अवमान करण्याचे धाडस करित नाहीत.सदयस्थितीला मीडियाद्वारे देशातील फक्त सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळत नाही तर विदेशात घडणाऱ्या घटना आणि त्यामुळे बदलत्या सामाजिक मूल्यांची माहिती ताबडतोब मिळते.मीडिया हे लोकशाहीचे सशक्त माध्यम असल्याने लोक आपले विचार, इच्छा,विरोध, टिका सर्वकाही मीडियाद्वारेच व्यक्त करतात.दूस-या शब्दात सांगायचे झाल्यास मीडिया हे लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी लाभलेले एक सशक्त व्यासपीठ आहे.मीडिया हा समाजाचा आरसा आहे.
मीडिया लोकांच्या तक्रारींच्या आधारे शासनाच्या चुकीच्या धोरणांवर जबरदस्त प्रहार करण्याचे काम करित आला आहे. मीडियामुळेच शासन किंवा सत्ताधा-यांना लोकांची नेमकी नस पकडणे सोपे जाते.लोकशाहीत जनमताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे जनमत निर्माण करण्याची जबाबदारी मीडियाचीच आहे.सरकारची धोरणे किंवा शासकीय योजनांवर मत व्यक्त करून किंवा टिका करुन नेमकी वास्तविकता लोकांसमोर ठेवण्याची जबाबदारी मीडियाची आहे. सरकारची धोरणे जी सामान्य व्यक्तिच्या डोक्याबाहेरची आहेत ती अतीशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे काम मीडियाचे आहे.मीडिया हे शासन आणि जनता यामध्ये दुवा म्हणून काम करत आले आहे.मीडियामुळेच जगात घडणा-या अनेक घटनांची अद्यावत माहिती आपल्याला सोप्या भाषेत मिळते.मीडियामुळेच देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा, परिसंवाद किंवा वादविवादामध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
आज मीडिया जगातील कोणत्याही काना-कोप-यात घडणाऱ्या घटनेचे मोठयाप्रमाणावर कवरेज करित आहेत त्यामुळेच जगातील कोणताही हुकूमशहा किंवा सरकार जनतेपासून वास्तविकता लपवून ठेवू शकत नाही.मीडियामुळेच कोणतीही सरकार जनतेच्या अधिकारांची दडपशाही करु शकत नाही.आजच्या भ्रष्ट वातावरणात मीडियाची भूमिका आणि जबाबदारी निश्चितच लोकशाहीच्या इतर तीन स्तंभापेक्षा जास्त आहे.
भारतात मीडियाला मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रता आणि अधिकार प्राप्त आहेत त्यामुळे मीडियाला आपली जबाबदारी विसरून चालणार नाही.मीडियाला आपल्या अधिकारांचा उपयोग करताना याचे भान ठेवले पाहिजे की,त्यांच्याद्वारा प्रकाशित अथवा प्रसारित कोणत्याही बातमी किंवा लेखामुळे देशाची एकता, अखंडता, शांतता बाधित होणार नाही. मीडियाने कोणताही पूर्वग्रहदूषितपणा किंवा पक्षपात न करता जनतेसमोर वास्तविकता मांडली पाहिजे.हे निर्विवाद सत्य आहे की, मीडिया हे  लोकशाही आणि मानव अधिकारांचे रक्षण करण्याचे काम करते. एक जबाबदार मीडिया देशात कायदा सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते. साहजिकच लोकशाहीत मीडियाची स्वतंत्रता अबाधित असणे आवश्यक आहे.मीडियाला सुद्धा अधिक कुशलतेने देशाच्याप्रती असणारी आपली जबाबदारी लक्षात ठेवून देशाच्या विकासात आपले अमूल्य योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-सुरेश मंत्री, धारूर
मो.नं-9403650722

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...