मुख्य सामग्रीवर वगळा

आळशी लोकांचा देश : भारत

ळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. एखादे काम केले नाही तर अनेकांना तुम्ही किती आळशी आहात असे म्हणताना ऐकले असेल. प्रत्येकाच्या घरात असा एकतरी आळशी धोंडा असतोच. मात्र अनेकांना जगातील सर्वात जास्त आळशी लोकं कोणत्या देशात आहेत असा प्रश्न पडतो. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात जगातील आळशी देशांबाबत भाष्य केले आहे. जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. या संशोधनात सर्वात आळशी देश आणि सर्वात सक्रीय देशांची नावे सांगितली आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांवर हे संशोधन केले आहे.

भारतीय लोक सध्या अनेक बाबतीत प्रगतिपथावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात जगावर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची छाप पडत आहे. परंतु तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती होत नाही. प्रचंड लोकसंख्या हा देशावरचा बोजा ठरत आहे, प्रचंड मनुष्यबळ म्हणून त्याची गणती करणे अद्यापही भारताला शक्य झालेले नाही. भारत हा काही वर्षामध्येच सर्वाधिक तरुणांचा देश होणार असला तरी या तरुणांच्या ऊर्जेचा, क्रयशक्तीचा वापर योग्य प्रकारे करून घेतला जाणार का, याविषयीच्या प्रश्नचिन्हामुळे अद्याप आपण अमूक वर्षातच महासत्ता बनू असे भाकीत ठामपणे वर्तवू शकत नाही. यामागे आळस हे त्याचे प्रमुख कारण आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जारी ४६ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ३९ व्या स्थानावर आहे. साधारणपणे एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात सरासरी किमान १०,००० पावले चालणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अहवालानुसार, भारतातील लोक एका दिवसात सरासरी फक्त ४२९७ पावले चालतात. या संशोधनात असेही समोर आले आहे की, भारतीय पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिला दिवसभरात कमी चालतात. भारतीय पुरुष एका दिवसात ४६०६ पावले चालतात, तर भारतीय महिला एका दिवसात केवळ ३६८४ पावले चालतात. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे नाहीत, शिवाय चालणे-फिरणेही कमी असल्यामुळे भारतीय महिलांमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत लठ्ठपणाचे प्रमाण २३२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. त्याउलट पुरुष अद्यापही ब-यापैकी चालत असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शारीरिक हालचाली कमी झाल्या असल्या तरी त्यांच्यातील लठ्ठपणाचे प्रमाण ६७ टक्क्यांनी वाढले आहे. महिलांच्या तुलनेत ते इतर अनेक प्रकारांनी शारीरिकदृष्टय़ा अधिक कष्टाची कामे करतात किंवा सक्रिय असतात. या संदर्भात विविध आहारतज्ज्ञही चालण्याचे महत्त्व मान्य करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्या महिला त्रासामुळे अधिक कमी चालतात. ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी जास्तीत जास्त चालावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, भारतात हे चित्र उलट असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.  जवळच्या ठिकाणी जायचे असले तरीही भारतीय लोक कारचा वापर करतात. तोंडाने ‘वॉकिंग डिस्टन्स’ असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते तिथपर्यंत चालत जात नाहीत, असे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इंधनावर अकारण खर्च करणा-या देशांमध्येही भारतीय आघाडीवर असल्याचे हा निष्कर्ष सांगतो. आज भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगभरात भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मोदींच्या फिटनेसह त्यांच्याप्रमाणे फॅशन करणा-यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. नागरिकांनी फिट रहावे यासाठी ते नियमित योगा करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना सर्वात क्रियाशील राजकारणी असे देखील संबोधले जाते. मात्र, सर्वात क्रियाशील पंतप्रधानांच्या देशातील नागरिक आळसावलेले असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

 इंडोनेशिया हा देश निसर्ग सौंदर्याने नटलेला असला तरी जगातील सर्वात आळशी देश आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार इंडोनेशियातील लोक दररोज सरासरी ३५१३ पावले चालतात. त्याचबरोबर या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेतील लोक दररोज साधारण ४७७४ पावले चालतात. संशोधनानुसार हाँगकाँग हा जगातील सर्वात सक्रिय देश आहे. या देशातील लोक दररोज सरासरी ६८८० पावले चालतात. त्याच वेळी, चीन, युक्रेन, जपानमधील लोक देखील सरासरी ६००० पावले चालतात. गरीब देशातील लोक श्रीमंत देशांच्या तुलनेत अधिक सक्रीय असतात. रिपोर्टनुसार शारीरिक सक्रियता आजही अनेक देशात खूप गरजेची आहे. या संशोधनासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये बसवलेल्या स्टेप काउंटरची मदत घेतली. आपण किती पावले चालतो हे पाहण्यासाठी ‘आर्गस‘ नावाचे अॅप वापरण्यात आले. ह्या अॅप च्या द्वारे आपली दिवसभरातील शारीरिक हालचाल किती होते आहे याची नोंद ठेवणे शक्य होते. या अॅप द्वारे शास्त्रज्ञांकडे ही माहिती उपलब्ध झाली. ही माहिती निरनिराळ्या देशांमधील लोकांशी निगडीत होती. ह्या माहितीच्या द्वारे काही गोष्टी शास्त्रज्ञांना अगदी प्रकर्षाने जाणाविल्या. शास्त्रज्ञांनी या माहितीच्या आधारे असे निदान काढले की जगभरामध्ये लोक सरासरी ४,९६१ पावले दररोज चालतात. अर्थात हा आकडा सर्व लोकांना लागू नव्हता. गावोगावी, देशो देशी ही संख्या वेगळी होती. लोक रहात असलेले प्रदेश, तिथली जीवनशैली, त्यांचा एकंदर फिटनेस या वर ही संख्या अवलंबून होती. हा अभ्यास मानवी विकासावर केलेल्या सर्व संशोधनांपेक्षा १००० पट मोठा आहे. बैठे काम आणि वाहनांचा अति वापर यामुळे श्रीमंत देशांमधील नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत. केवळ सकाळी तासभर फिरले की, शरीर आकारबद्ध राहते हा सुद्धा गैरसमज आहे. आरोग्य चांगले राहणे आणि शरीर सुदृढ राहणे यासाठी दिवसभर सक्रियता राखली गेली पाहिजे. दिवसाची झोप टाळून लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे या गोष्टी केल्यास वजनातील वाढही आटोक्यात राहते. म्हणूनच चिनी लोक भारतीय लोकांच्या तुलनेत सडपातळ आणि अधिक आरोग्यसंपन्न असतात.

-सुरेश मंत्री

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...