मुख्य सामग्रीवर वगळा

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल

सैन्य, नौदल आणि वायूसेना असे भारतीय लष्कराचे तीन भाग पडतात. लष्कराचे हे तीनही भाग अत्यंत शूर आणि बलवान सैनिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनले आहेत. यापैकी कोणत्याही दलात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत कठोर निवड चाचणी आदींचा सामना करावा लागतो. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांत महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत एकेक निर्णय घेत आता देशाचे सैन्य दल घातक युद्धकौशल्य असणाऱ्या महिलांना आणखी एक आव्हान खुणावणार आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुडा या विशेष कमांडो पथकात महिला कमांडोंचा लवकरच समावेश केला जाणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणा-या कमांडोंना कठोर प्रशिक्षण दिले जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना अतिशय कठोर समजल्या जाणाऱ्या चाचण्यांतून यशस्वीपणे जावे लागणार आहे. भारतीय नौदलातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुरगामी निर्णय आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून जगातील सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या या घातक कमांडो फोर्सचा लौकिक या निर्णयामुळे वाढणार आहे.

आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो म्हणजे मार्कोस होण्याची संधी मिळेल. आजवरच्या इतिहासात भारतीय नौदलात अशी थेट नियुक्ती केव्हाच करण्यात आली नाही. या महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल. पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणा-या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोस प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल. मरीन कमांडो भारतीय नौदलातील स्पेशल फोर्स कमांडो आहेत. नौदलातील मार्कोसना अनेक विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षित केले जाते. हे कमांडो समुद्र, हवेत आणि जमिनीवर विशेष मोहिमा राबवू शकतात. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळावर हल्ले करतात आणि विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स सारख्या गुप्त मोहिमा पार पाडतात. मार्कोस हे सागरी क्षेत्रातील दहशतवाद्यांशी लढून त्यांना चोख प्रत्युत्तर देतात. सध्या काही मार्कोस दहशतवादविरोधी भूमिकेत काश्मीरमधील वुलर लेक परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

या कमांडोंनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुकाबला करताना हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो जगातील युद्धकौशल्यातील मानाचे पान समजले जाते. विविध देशांच्या कमांडो प्रशिक्षणात त्याचा सातत्याने गौरवाने उल्लेख केला जातो. अमेरिकेच्या मरिन कमांडो आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही कमांडो युनिटखालोखाल भारताच्या मार्कोसचे नाव घेतले जाते. या मार्कोस दलात आता महिला कमांडो सामील होणार आहेत. मात्र या दलात समाविष्ट होण्यासाठी अत्यंत कठोर अशा चाचण्यांतून जावे लागणार आहे. सर्वच कमांडोंना या चाचण्या अत्यावश्यक असतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अवघे २० टक्के असते. मार्कोसने आतापर्यंत श्रीलंकेतील लिट्टेविरोधी मोहीम, जम्मू काश्मीरमधील अतिरेकीविरोधी मोहिमा, हिंद महासागरातील समुद्री चाचेविरोधी मोहिमा, लेहमधील तैनाती आदी मोहिमा हाताळल्या आहेत. त्यातील ताज हॉटेल कारवाई मोहीम सर्वाधिक प्रकाशझोतात आली. नौदलाच्या पाठोपाठ हवाई दलाच्या गरुड या कमांडो दलातही महिला कमांडोंच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबतच्या निर्णयावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. महिलांना आता जमीन, पाणी, हवेतही देशसेवा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नौसेना यासाठी मोठी पावलं उचलत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरचं ही ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे. नौदलाने विशेष ऑपरेशन्सपासून ते फ्लाइंग आणि युद्धनौकापर्यंत सर्व शाखांमध्ये महिलांसाठी दरवाजे खुले केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी समान संधी असलेल्या तटस्थ दलात नौदलाचे रूपांतर पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे. तिन्ही सैन्यदलांमध्ये महिला आधीच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. भारतीय नौदल ओडिशातील आय.एन.एस. चिल्का प्रशिक्षण केंद्रात महिलांसह अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देत आहे. नौदलाच्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत ३,००० प्रशिक्षणार्थींचा समावेश असून यामध्ये ३४१ महिला देखील सहभागी आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे कमांडो होणे हे देशातील महिला सक्षमीकरणासाठी एक नवे पाऊल ठरेल. या निर्णयामुळे भारतीय महिलांना नोकरी आणि व्यक्तीमत्व विकासाची तसेच जीवनमान उंचावण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय लष्करी इतिहासातील हा खरोखरच गौरवशाली क्षण आहे. 

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...