मुख्य सामग्रीवर वगळा

भारत बनणार आर्थिक महासत्ता

विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत. अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. माञ योग्य धोरणांमुळे भारताचा विकास दर भविष्यात ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीची व्याप्ती वाढवून, आर्थिक स्थिरतेचा आधारही वाढेल. जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणणार आहे. एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात. 

अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. खरं तर भारत ही जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. लष्करी सामर्थ्यात हा चौथ्या क्रमांकाचा शक्तिशाली देश आहे. भारतीय लष्करी क्षेत्रात झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे, ज्यामुळे केवळ संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतच वाढ होत नाही, तर परकीय गुंतवणूकही वाढते. आज भारताचे सैन्य कोणत्याही शक्तीला आव्हान देण्यास सक्षम आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असलेला देश आहे, जो विकासाला वेगाने पुढे नेण्यास सक्षम आहे. अचूक आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातत्याने मजबूत होत आहे. जगात चौथ्या क्रमांकावर उभा असलेला भारत अवकाश क्षेत्रात आपली ताकद दाखवत आहे. येत्या काळात तोच देश वेगाने महासत्ता बनणार आहे, ज्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असेल. तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होण्याचा विचारही करू शकत नाही. इस्रोने रॉकेटद्वारे १०४ उपग्रह अवकाशात पाठवून जगाचे लक्ष वेधून घेतले होते, हा भारताच्या तंत्रज्ञानाचा चमत्कार होता. आज इस्रो जगातील सर्वात स्वस्त उपग्रह बनवण्यासाठी ओळखली जाते. केवळ विकसनशीलच नाही तर विकसित देशही आपले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोसोबत करार करण्यास उत्सुक आहेत. २०२४ मध्ये भारत गगन यान या स्वदेशी बनावटीच्या अवकाश यानाद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठविणार आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि प्रशिक्षित कामगारांची वाढती संख्या यामुळे भारताला उत्पादन केंद्र बनता आले आहे. भारताचा वाढता आर्थिक विकास दरही जगाचे लक्ष वेधून घेत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत विदेशी गुंतवणुकीचा वेग वाढत आहे. वर्ष २०२१-२०२२ मध्ये ८४ सहस्र ८३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक (एफ्.डी.आय.) भारतात झाली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने भारतात योग्य प्रदेश आणि व्यवसायाला साहाय्यभूत ठरणारे सरकारचे धोरण यांमुळे देशात व्यवसाय करणे सोपे झाले आहे. वसुलीला उत्तेजन देणा-या योजना आणि विदेशी गुंतवणुकीला चालना देणारे उपक्रम यांमुळे गुंतवणूकदारांचा भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. उत्पादनापासून ते माहिती तंत्रज्ञानापर्यंत, रासायनिक उद्योगापासून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापर्यंत, कृषी क्षेत्रापासून ते सेवा क्षेत्रापर्यंत भारत जगाच्या नकाशावर आपले अस्तित्व निर्माण करीत आहे.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्रोफेसर नुरिएल रुबीनी या सुप्रसिद्ध अर्थतज्ञांनी भारताबाबत ही भविष्यवाणी केली आहे. नुरिएल रुबिनी यांनी यापूर्वी २००८ मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा अचूक अंदाज वर्तवला होता. या मंदीनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हापासून नुरिएल रुबिनीला "डॉ. डूम" म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. त्यांचा अर्थशास्त्रातील अभ्यास व्यापक असून, ते भविष्यातील अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज मांडतात. युरोपीय देश आणि भारताची तुलना करायची झाल्यास भारताची लोकसंख्या आणि चांगला जीडीपी याबाबतीत युरोपीय देश भारताची प्रगती नाकारू शकत नाहीत. भारतातील लोकसंख्येचा विचार करता ३५ वर्षाखालील सर्वाधिक लोकांचा समावेश अतिकार्यक्षम गटात होतो. या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण व त्यांच्या हाताला मिळणारे काम हीच बाब भारताला महासत्ता होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीमधील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, देशात उद्योग वाढीसाठी अनुकुल वातावरण ठेवले पाहिजे. सरकारी यंत्रणांमध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. यात जीडीपीत आणखीन स्थैर्य आणण्यासाठी भारताला आणखीन काही वर्षे काम करावे लागेल. यासाठी आर्थिक नियंत्रण आणि योग्य नीती राबवण्याची गरज आहे

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...