जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालय.उपचारापेक्षा प्रतिबंध हाच चांगला उपाय म्हणून जगातील सगळे लोक आपापल्या घरात बसले आहेत.अर्थात प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.कोरोना महामारी सोबत क्वारंटाईन हा शब्द जो काही काळापूर्वी आपल्याला माहित नव्हता तो सगळीकडे प्रचलित झाला आहे.नव्या पिढीसाठी क्वारंटाईन ही पद्धत नवखी असेल मात्र जगात हिचा वापर फार पूर्वी पासुन होत होता,अगदी आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा.आपल्या परंपरेत संक्रामक रोगांपासून वाचण्याचा योग्य आणि खात्रीशीर उपाय स्वत:ला दूस-यांच्या शारीरिक संपर्कापासून वेगळे ठेवणे हाच राहिला आहे.रोगी आणि निरोगी,दोघांना रोगापासून बचाव आणि आपले आरोग्यहिताच्या दृष्टीने एक उपाय म्हणून क्वारंटाईन मान्यताप्राप्त आहे.
विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजारो वर्षांपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रचलित सूतक हेच आत्ताचे क्वारंटाईन आहे.क्वारंटाईन हा मुळ लॅटीन भाषेतील शब्द आहे.तसंतर शब्दकोशांनुसार याचा शाब्दीक अर्थ चाळीस असा आहे पण व्यावहारिक अर्थ संक्रामक रोगाने ग्रासित वा अशा रोग्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या बाहेर फिरण्यावर,ईतर लोकांच्या संपर्कात येण्यावरिल प्रतिबंध हाच घेतला जातो.
शंभर वर्षांपूर्वी जल वाहतुक हाच लोकांच्या येण्या-जाण्याचा आणि व्यापाराचा प्रमुख मार्ग होता.ज्या जहाजांवर गंभीर रोगाने ग्रासलेल्या व्यक्ती किंवा त्यावर लादलेल्या मालामध्ये गंभीर रोगाचे रोगजंतु असण्याची सुचना मिळायची वा शंका असायची त्या जहाजाला ४० दिवसांपर्यंत बंदरात यायला मनाई केली जायची.समुद्रामध्ये नांगर टाकुन उभा असलेल्या अशा जहाजावरिल संक्रमित रोग्याची पूर्ण तपासणी आणि जहाजाला रोगजंतु मुक्त केल्यानंतरच बंदरात आणले जात असे.क्वारंटाईनच्या या ४० दिवसांच्या काळात त्या जहाजाला समुद्र तटापासून दूरच वेगळे रहावे लागे.
क्वारंटाईनची सुरूवात ब्रिटन मध्ये प्लेगची साथ पसरल्यानंतर झाली होती आणि आता याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.दोन देशांच्या जलसीमांवर क्वारंटाईन झाल्यानंतरच एक-दूस-याच्या जलसीमेत जहाजाला प्रवेश देण्याची तरतुद आहे.जहाजाचा कप्तान तपासणीच्या वेळी जहाजावरिल सर्व यात्री,कर्मचारी किंवा माल रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करतो.जर त्याने सत्य लपवले तर जहाजाच्या कप्तानाला कडक दंड देण्याची तरतुद आहे.ज्या जहाजावर संक्रमित रोगी किंवा माल असतो त्यावर क्वारंटाईनची अवधी संपेपर्यंत पिवळा झेंडा फडकवला जातो,जो ईतर जहाजांना स्वत:पासून दूर राहण्याचा आणि क्वारंटाईन मध्ये असल्याचा सूचक आहे.हवाईयात्रे संबंधीही असेच नियम आहेत.अनेक देशांमध्ये संक्रामक रोगांची लस घेतल्यानंतरच यात्रेकरूंना प्रवेश करण्याची परवानगी आहे.
विसाव्या शतकाच्या सूरूवातीला महात्मा गांधी पत्नी कस्तुरबा आणि दोन मुलांसोबत ४४ दिवस समुद्री वादळाला झेलत दक्षिण आफ्रिकेतील डरबनला पोहचले तेंव्हा त्यांना सुद्धा क्वारंटाईन अंतर्गत जहाजावरून खाली उतरू दिले गेले नव्हते.इंग्रजांनी भारतात प्लेगची साथ पसरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या महात्मा गांधीजींना क्वारंटाईन मध्ये टाकले.गांधीजींनी संक्रामक रोगाचा प्रतिबंध म्हणून वापरल्या जाणा-या या क्वारंटाईन पद्धतीचा स्विकार केला आणि मोठया धेर्याने एकांतवासात राहिले.अशा पद्धतीने दुस-यांदा गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत प्रवेश मिळु न देण्याचा इंग्रजाचा कट यशस्वी झाला.
पाश्चिमात्य संस्कृती नुसार हात मिळवून अभिवादन आणि स्वागत करण्याऐवजी हात जोडुन अभिवादन आणि स्वागत करण्याची आपली भारतीय संस्कृती स्विकारण्यासाठी संपूर्ण जग कोरोनाच्या या महामारीत विवश झाल आहे.हात-पाय धुवुनच पुजाविधी,जेवण करण्याची प्रक्रिया दैनंदिन जीवनात सर्वमान्य आहे.कोरोनाच्या या जागतीक संकटात भारतीय संस्कृतीची महत्ता संपूर्ण जगाच्या लक्षात पुन्हा एकदा आली आहे.
-सुरेश मंत्री
विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजारो वर्षांपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रचलित सूतक हेच आत्ताचे क्वारंटाईन आहे.क्वारंटाईन हा मुळ लॅटीन भाषेतील शब्द आहे.तसंतर शब्दकोशांनुसार याचा शाब्दीक अर्थ चाळीस असा आहे पण व्यावहारिक अर्थ संक्रामक रोगाने ग्रासित वा अशा रोग्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या बाहेर फिरण्यावर,ईतर लोकांच्या संपर्कात येण्यावरिल प्रतिबंध हाच घेतला जातो.
शंभर वर्षांपूर्वी जल वाहतुक हाच लोकांच्या येण्या-जाण्याचा आणि व्यापाराचा प्रमुख मार्ग होता.ज्या जहाजांवर गंभीर रोगाने ग्रासलेल्या व्यक्ती किंवा त्यावर लादलेल्या मालामध्ये गंभीर रोगाचे रोगजंतु असण्याची सुचना मिळायची वा शंका असायची त्या जहाजाला ४० दिवसांपर्यंत बंदरात यायला मनाई केली जायची.समुद्रामध्ये नांगर टाकुन उभा असलेल्या अशा जहाजावरिल संक्रमित रोग्याची पूर्ण तपासणी आणि जहाजाला रोगजंतु मुक्त केल्यानंतरच बंदरात आणले जात असे.क्वारंटाईनच्या या ४० दिवसांच्या काळात त्या जहाजाला समुद्र तटापासून दूरच वेगळे रहावे लागे.
क्वारंटाईनची सुरूवात ब्रिटन मध्ये प्लेगची साथ पसरल्यानंतर झाली होती आणि आता याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.दोन देशांच्या जलसीमांवर क्वारंटाईन झाल्यानंतरच एक-दूस-याच्या जलसीमेत जहाजाला प्रवेश देण्याची तरतुद आहे.जहाजाचा कप्तान तपासणीच्या वेळी जहाजावरिल सर्व यात्री,कर्मचारी किंवा माल रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करतो.जर त्याने सत्य लपवले तर जहाजाच्या कप्तानाला कडक दंड देण्याची तरतुद आहे.ज्या जहाजावर संक्रमित रोगी किंवा माल असतो त्यावर क्वारंटाईनची अवधी संपेपर्यंत पिवळा झेंडा फडकवला जातो,जो ईतर जहाजांना स्वत:पासून दूर राहण्याचा आणि क्वारंटाईन मध्ये असल्याचा सूचक आहे.हवाईयात्रे संबंधीही असेच नियम आहेत.अनेक देशांमध्ये संक्रामक रोगांची लस घेतल्यानंतरच यात्रेकरूंना प्रवेश करण्याची परवानगी आहे.
विसाव्या शतकाच्या सूरूवातीला महात्मा गांधी पत्नी कस्तुरबा आणि दोन मुलांसोबत ४४ दिवस समुद्री वादळाला झेलत दक्षिण आफ्रिकेतील डरबनला पोहचले तेंव्हा त्यांना सुद्धा क्वारंटाईन अंतर्गत जहाजावरून खाली उतरू दिले गेले नव्हते.इंग्रजांनी भारतात प्लेगची साथ पसरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या महात्मा गांधीजींना क्वारंटाईन मध्ये टाकले.गांधीजींनी संक्रामक रोगाचा प्रतिबंध म्हणून वापरल्या जाणा-या या क्वारंटाईन पद्धतीचा स्विकार केला आणि मोठया धेर्याने एकांतवासात राहिले.अशा पद्धतीने दुस-यांदा गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत प्रवेश मिळु न देण्याचा इंग्रजाचा कट यशस्वी झाला.
भारतीय जीवन शैलीत बाळाचा जन्म झाल्यानंतर सूतक लागु करून नवजात बालक आणि त्याच्या आईला एक महिन्यापर्यंत क्वारंटाईन मध्ये ठेवण्याची प्रथा आजही प्रचलित आहे जेणेकरून नवजात बाळ आणि त्याची आईला संक्रामक रोगांपासून वाचवता येईल.या काळात नवजात बाळाला औषधीयुक्त पाण्याने स्नान घालुन शुद्धीकरण केले जाते.या संपूर्ण क्वारंटाईन महिन्यात माता आणि बाळाचे जेवण आणि सर्वकाही वेगळे केले जाते.अशाच पद्धतीने मृत्यू नंतर १० ते १२ दिवस सूतक पाळण्याची आपली परंपरा आहे.मृतकाच्या शवात रोगजंतु असु शकतात.त्यामुळे अंतिम क्रिया करणा-या व्यक्तीने १२ दिवस घरातील वेगळ्या खोलीत राहणे,ज्या कुटुंबात मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाशी १२ दिवस कमीत-कमी संपर्क ठेवणे,त्याच्या कुटुंबीयांनी समाजात या कालावधीत न मिसळणे म्हणजेच सूतक आवश्यक मानले जाते.या काळात मृतकाच्या घरात धार्मिक पूजा करणे वर्जित असते.,तसेच त्यांच मंदिरात,सार्वजनिक उत्सवात,लग्नात जाणेसुद्धा वर्जित असते.ज्या घरात मृत्यू सूतक असते त्या घरातील अन्न-पाणी लोक ग्रहण करत नाहीत.यामागे संक्रामक रोगापासून बचाव हेच शास्त्रीय कारण आहे.गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला स्व्तंत्र ठेवणे आणि त्याची सेवा-श्रुषा करणा-या व्यक्तीला अन्य लोकांपासून दूर राहण्याची ताकीद देणे याचे पालन करणे भारतीय जीवनशैलीत अनिवार्य आहे.आजारी व्यक्तीचे कपडे आणि अंथरून बदलत राहणे आवश्यक आहे.तसेच पुजाविधी करताना धुतलेले स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे.
पाश्चिमात्य संस्कृती नुसार हात मिळवून अभिवादन आणि स्वागत करण्याऐवजी हात जोडुन अभिवादन आणि स्वागत करण्याची आपली भारतीय संस्कृती स्विकारण्यासाठी संपूर्ण जग कोरोनाच्या या महामारीत विवश झाल आहे.हात-पाय धुवुनच पुजाविधी,जेवण करण्याची प्रक्रिया दैनंदिन जीवनात सर्वमान्य आहे.कोरोनाच्या या जागतीक संकटात भारतीय संस्कृतीची महत्ता संपूर्ण जगाच्या लक्षात पुन्हा एकदा आली आहे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा