आपल्या देशातील
दीपावली हा अतिशय महत्वाचा सण. हा सण जणू एका पॅकेजच्या स्वरूपात येतो. धनत्रयोदशी,
लक्ष्मी पुजनआणि भाऊबीज या सणांसोबत
संपूर्ण महिना एखाद्या उत्सवाच्या स्वरूपातच निघून जातो. या सणाचे पौराणिक आणि
सामाजिक महत्व आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे मात्र या गोष्टीचे दु:ख
होते की, कित्येक वेळा सणांचे नकारात्मक चित्रण आपण
आपल्या मनात करून बसतो. न केवळ आपण नकारात्मक चित्रण करून बसतो तर याला आपल्या
जीवनात अंगिकारून दूस-यांचे नूकसान करण्यात प्रमुख भागिदारही बनतो. दीपावलीच्या
वेळी जे सण येतात त्यांची नकारात्मक व्याख्या आणि चूकीच्या परंपरा आपल्यासाठी कशा
प्रकारे हानीकारक असतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.
वस्तूंची खरेदी करताना -
अनेक ऑनलाईन संकेतस्थाळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या
जातात. एकूण ग्राहकांना खरेदी करण्यासाठी जबरदस्त पद्धतीने प्रोत्साहित केले जाते. ठिक आहे, खरेदी ही केलीच पाहिजे मात्र हे
आपल्याला माहित आहे का की, अनेक धूर्त व्यापारी या सणांच्या मानसिकतेचा
फायदा उठवतात. ही लोक खाद्यपदार्थांमध्ये केवळ भेसळच करत नाहीत तर लोकांचे आर्थिक
नुकसान करून त्यांच्या आरोग्याला हानी पोहचवितात. खव्या मध्ये होणारी भेसळ आपल्याला
माहित आहेच. एवढंच नाही तर बाजारात चांदीचे नकली शिक्के सुद्धा विकले जात असल्याची
बातमी एका न्युज चॅनलने दाखविली होती. आपल्या सराफामार्फत आपल्याला शुद्ध
चांदीच्या नावावर नकली माल लादला जात असेल तोही असली चांदीची किंमत वसूल करून
ज्यात ५० टक्के पेक्षा कमी चांदी आहे तर खरेदीदारांची किती लूट होत असेल. या न्युज
चॅनलने पडताळणी करण्यासाठी या चांदीच्या शिक्क्यांचे परिक्षण केले. आपल्याला
विश्वास बसणार नाही ५ मागे ४ शिक्के नकली निघाले.
हे उघड आहे की, आपल्याला
काही ना काही खरेदी करायची घाई आहे, दुकांनांमध्ये खूप गर्दी
आहे तर याचा गैरफायदा उठवणारेही हजारो लोक आहेत. अशात आपल्याला सल्ला आहे की, आपण खरेदी
करताना खूप सावध रहावे. जर आपल्याला किमती वस्तू खरेदी करावयाची आहे तर ती
धनत्रयोदशीला खरेदी करू नये. आपण ही खरेदी धनत्रयोदशीनंतर पूर्ण चौकशी करून करू
शकता. या सणाच्या वेळी अनेक कंपन्या ऑफर्स देतात किंवा खरेदीवर कूपन देतात मात्र
आपण विना काही चौकशी करता खरेदी केल्यास आपल्याला नकली वस्तूही दिली जावू शकते. या
व्यतीरिक्त दीपावलीला महागड्या भेटवस्तू ज्यात कधी-कधी उंची मद्याचाही समावेश असतो
यांची देवाण-घेवाण निसंदेह चूकीची पंरपरा आहे. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.
चीनी वस्तूंबाबत –
दीपावलीशी संबंधीत चीनी वस्तूंच्या
खरेदीचा सोशल मीडीयावर आजकाल खूप विरोध केला जात आहे. चीनी वस्तू भारतीय वस्तूंच्या
तूलनेत स्वस्त असल्याने चीनी झालर, फटाके, मिठाई आणि
कपडयांनी भारतीय बाजारपेठ व्यापली आहे. व्यापारात चीनने आपले पाय मजबूतीने
रोवल्याने आपला पैसा चीनमध्ये जातो आणि आपल्या दुर्दैवाने चीन याच पैशाने
पाकिस्तानला भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करतो. अशा प्रकारे आपण चीनी वस्तूंची
खरेदी करून अप्रत्यक्षरित्या दहशतवादाला हातभार लावतो. यासाठी होईल तेवढ चीनी वस्तूची
खरेदी करणे आपण टाळले पाहिजे त्याऐवजी भारतीय लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले
पाहिजे मग या वस्तू काही प्रमाणात महागड्या का असेना.
फटाक्यांच्या बाबतीत-
खरेदीच्या नंतर आपल्या
स्वास्थ्याच्या दृष्टीने बघीतले तर देशातील अनेक मोठया शहरात वायू प्रदूषणाचा धोका
वाढलेला आहे तोही ठिक दीपावलीच्या अगोदर. आपल्याला हे चांगले माहित आहे की, मोठया
प्रमाणावर फटाके वाजवल्याने कशा प्रकारे वायू प्रदूषण होते. हे प्रदूषण वृद्ध आणि
नवजात बालकांसाठी एक प्रकारचे विषच आहे. आता या बाबतीत लोकांमध्ये काही प्रमाणात
जागरूकता निर्माण झाली आहे तरीही याबाबतीत खूप काही करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या
आसपासच पिकांची कापणी होते. पिकांची कापणी झाल्यानंतर राहिलेले अवशेष उघड्यावर
जाळल्याने जो धूर हवेत मिसळतो त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशात ऐन दीपावलीच्या अगोदर वायू
प्रदूषण धोकादायक स्तरापर्यंत पोहचते आणि जेंव्हा दीपावलीला फटाक्याच्या धूराने
आकाश झाकून जाते तेंव्हा परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर होवून जाते.
श्वसनाचे आजार असणा-या रुग्णांसाठी
हा धूर जीवघेणा ठरू शकतो. खरंतर या गोष्टी अनेक वर्षांपासून सांगितल्या जात आहेत, शोध केला
जातो,वसर्व्हे
केला जातो, शोध निबंध बनवला जातो मात्र तरीही
आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच वागण भावशून्य आहे. शेवटी याची जबाबदारी
घेणार तरी कोण ? अशात आपण या भारताचे नागरिक म्हणून
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांचा खूप नियंत्रीत वापर केला पाहिजे. अस म्हणन
योग्य ठरणार नाही की, दीपावलीचा सण आहे आणि आपण फटाके फोडू नयेत, मात्र
केवळ औपचारिकता म्हणून खूप कमी प्रमाणात ! अगोदरच शहरात वाहनांची संख्या
खूप वाढली आहे त्यात फटाके फोडल्याने आरोग्याशी संबंधीत किती प्रश्न निर्माण होतात
आपण याची कल्पना नाही करू शकत. काही लोक या गोष्टीचा विरोध करतात किंवा याला अन्य
धर्माशी जोडतात आणि म्हणतात की आपण भरपूर फटाके फोडले पाहिजेत, हे आपले
स्वातंत्र्य आहे. ठीक आहे याला नाकारले नाही जावू
शकत मात्र आपण कोण्या लहान मुलाच्या दृष्टीने, कोण्या वृद्धाच्या, ह्रदय रोगाच्या रुग्णाच्या दृष्टीने त्याच्या स्वास्थ्यावर फटाक्यांच्या
धूराचा होणारा परिणाम पाहिले तर एक वेळेस आपल्याही मनात हा विचार आल्याशिवाय
राहणार नाही की, आपण फटाके का फोडत आहोत ? वास्तविकदृष्ट्या आपण एक
हजारापासून दहा हजार रुपयांपर्यंत जे पैसे फटाक्यांवर खर्च करणार आहोत त्यातून
कोणा गरजवंताची मदत नाही का करता येवू शकत ? खरंतर फटाके फोडणे म्हणजे पैशाचा
सरळ-सरळ अपव्यच आहे, आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा
आहे आणि यातून अनेक वेळा दूर्घटनाही होतात जसे आग लागणे, डोळ्यांना दूखापत होणे, भाजणे इत्यादी. तसंतर
सणांच्या बाबतीत सकारात्मक बाबी खूप आहेत. खासकरून दीपावलीच्या संबंधीत अनेक
लेखांमध्ये या पर्वाचे अनेक फायदे आपण वाचले असतीलच, मात्र या जगातील प्रत्येक बाबीत काही वाईट
गोष्टीही असतात ज्यात आपण सुधारणेकडे अग्रेसर होवू शकतो.
जुगार खेळणे टाळा-
दीपावलीच्या दिवशी जुगार खेळण्याची
प्रथाही आपल्या समाजात काही ठिकाणी आहे. काही लोक असा तर्क देतात की, जर आपण या
दिवशी जुगारात जिंकलो तर पूढे नशीब खूप साथ देते. यामुळे अनेक ठिकाणी कवडी, पाश्यांसोबत अनेक प्रकारचे
पंरंपरागत आणि आधुनिक प्रकारचे जुगार खेळले जातात. जुगार आणि त्याच्या
परिणामाबद्दल जास्त काही बोलण्याची गरज नाही कारण याचा परिणाम काय होतो ते
महाभारतात खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. अनेक शकुनीमामा सारखे जुगारी
आपल्या कपटी डोक्याने कित्येक लोकांना पशू बनविण्याचे कार्य करित आले आहेत. यापैकी
३५ टक्के लोक केवल शुभ शकुन म्हणून जुगार खेळतात तर उर्वरित १० टक्के लोक
शकुनीमामा आणि युद्धीष्टीरच्या जुगारासारख खतरनाक जुगार खेळातात जिथे आर्थिक
नुकसानीशिवाय काही हाती येत नाही. तसं बघितल तर सट्टेबाजी हा सुद्धा जुगाराचे
आधुनिक रूप आहे आणि जुगाराच्या विभिन्न वाईट गोष्टींना दूर करण्यासाठी सामाजिक
जागरूकता करणे अत्यंत गरजेचे आहे. जुगार हा कायद्यानेही गुन्हा आहे. भलेही
याद्वारे काही अवैध्य कमाई होत असेलही मात्र आहे शेवटी वाईटच. जर आपण वाईट गोष्टींपासून दूर
राहिलो, सावधगिरीने खरेदी केली, खूप फटाके फोडून वायू
प्रदूषण केले नाही तर काही कारण नाही की, आपले हे सण सामाजिक समरसता आणणार
नाहीत, सुख-समृद्धी आणणार नाहीत, आपल्यासाठी
उज्वल भवितव्याची आशा निर्माण करणार नाहीत.
तर चला दीपावलीत आपण या वाईट
बाबींपासून दूर राहू, सावधान राहू तेंव्हाच ख-या रूपाने लक्ष्मी, गणेश
आणि सरस्वतीचे आपण पूजन करू शकू आणि ख-या अर्थाने सणांचा अर्थ समजू शकू.
-सुरेश मंत्री.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा