मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोनाविरूद्ध लढाई आणि आकडयांचा खेळ

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखाच्या पूढे गेली आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर तर दूसरीकडे देवेंद्र फडणविस यांनी महाराष्ट्र सरकार वर कोरोना चाचण्या कमी असल्याने रूग्णांची संख्या कमी दिसत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. दूसरीकडे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारं हे युद्ध योग्यरित्या लढत असल्याच चित्र निर्माण करताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच ब्राझीलच्या तुलनेत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाची आकडेवारी कमी असल्याने समाधान व्यक्त केल आहे. व्यवस्थापन आणि प्रचार या दोन्ही कला आहेत. पंतप्रधानांचे हे वक्तव्य सुद्धा याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. मोदींनी आपला मतदार संघ वाराणसीच्या एनजीओ प्रतिनिधिंशी व्हिडिओ कॉन्फरंस मार्फत संवाद साधत असताना म्हटले की, ब्राझील मध्ये कोरोना विषाणू मुळे ६८ हजार मृत्यू झाले आहेत. उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढेच आहे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. मात्र ईथे केवळ ८०० मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. साहजिकच पंतप्रधानांच्या मतानुसार उत्तरप्रदेश मधिल कोरोनाची कमी आकडेवारी ही समाधानाची बाब आहे.
त्यांनी म्हटले की, ज्यावेळी कोरोना महामारी आली त्यावेळी सर्वजण भारताच्या बाबतीत घाबरलेले होते. उत्तरप्रदेशच्या बाबतीत तर अनेक जणांना जास्त सांशकता होती कारण येथील लोकसंख्या २३-२४ कोटी आहे. मात्र उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाला नियंत्रणात ठेवले. अशाप्रकारे केवळ आकडेवारीने केलेली तुलना अनेकांना प्रभावित करेल मात्र अधिक खोलात गेल्यास हिच आकडेवारी आपल्याला आरसा दाखवेल.
चला तर मग, मोदींच्या या विधानाच्या अधिक खोलात जावू या. हे सत्य आहे की, उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. ब्राझिल मध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे १७ लाखाहून अधिक रूग्ण आढळले आहेत आणि मृत्यू ६८ हजार. उत्तरप्रदेश मध्ये ३१ हजार रूग्ण आणि मृत्यू ८४५ झाले. या आकडेवारीतुन मात्र उत्तरप्रदेश सरकारने कोरोना संक्रमणावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले आहे असं म्हणन घाईचे होईल. आपल्याला हे पहाव लागेल की, कुठे कोरोनाच्या किती चाचण्या झाल्या. १२ जुलै पर्यंत ब्राझिल मध्ये कोरोनाच्या ४५.७२ लाख चाचण्या झाल्या. म्हणजेच १० लाख लोकसंख्येच्या मागे २१,५०८ चाचण्या झाल्या. दूसरीकडे १२ जुलै पर्यंत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाच्या केवळ ११.०८ लाख चाचण्या झाल्या. म्हणजेच १० लाख लोकसंख्येच्या मागे केवळ ४,९२९ चाचण्या. हे स्पष्ट आहे की, जोपर्यंत चाचणी होणार नाही तोपर्यंत कोणी व्यक्ती कोरोनाने बाधित आहे की नाही हे कसे समजेल? उत्तरप्रदेश मधील कोरोनाच्या कमी चाचण्या हा विवादाचा विषय राहिला आहे. राज्याचे माजी आईएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी यूपी सरकारवर ’ नो टेस्ट, नो कोरोना’ पॉलिसी चालवल्याचा आरोप केला होता ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशात पंतप्रधानांचे आकडे आपल्याला अनेक बाबींवर विचार करण्यास बाध्य करतात. उत्तरप्रदेश आणि ब्राझिलची तुलना जशी लोकसंख्येच्या आधारावर केली गेली तशीच तुलना भारत आणि चीनची करून बघितली तर चित्र उलटे दिसेल. चीनची लोकसंख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. २०२० मध्ये चीनची अनुमानित लोकसंख्या १४३ कोटी तर भारताची १३८ कोटी. यावरून भारतात कोरोना रुग्णांची संख्या चीनच्या तुलनेत कमी असायला हवी. आकडेवारीनुसार १२ जुलै पर्यंत चीनमध्ये कोरोनाचे ८३,६०२ रूग्ण आणि मृत्यू ४,६३४. दूसरीकडे भारतात या तारखेपर्यंत ८ लाख ८८८ रूग्ण आणि २३,२०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ भारतात चीनच्या तुलनेत १०.५२ पट अधिक प्रकरणे आहेत. सोबत चीनच्या तुलनेत भारतात ५ पट अधिक मृत्यू झाले आहेत.
               भारत आणि चीनची तुलना करताना एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. चीनने आत्तापर्यंत ९ कोटीहून अधिक कोरोना चाचण्या घेतल्या आहेत तर भारतातील चाचण्या १.१८ कोटीपर्यंत मर्यादित आहेत. याचाच अर्थ भारताच्या ९ पट अधिक चाचण्या चीनमध्ये झाल्या. जर भारतानेही एवढयाच चाचण्या घेतल्या असत्या तर आज कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या किती असती याचा अंदाज लावणे कठिण आहे. सर्वाधिक कोरोना पॉजिटिव्ह रुग्णात लक्षणेच दिसून येत नाहीत. यामुळे जर कोणी संक्रमित असेल तर त्याला याचा पत्ता लागत नाही. त्यांना जर ईतर गंभीर आजार नसेल तर ती सामान्यत: १५ दिवसात आपोआप ठिक होतात मात्र या कालावधित ते वाहकाचे काम करतात आणि दुस-यांना संक्रमित करतात.
                  याचच एक उदाहरण झारखंडच्या धनबाद मध्ये पहायला मिळाल. जुलैच्या पहिल्या आठवडयात ईथे दोन पत्रकार कोरोना संक्रमित आढळ्यानंतर प्रशासनाने ईतर पत्रकारांसाठी स्वईच्छेने कोरोना चाचणीची व्यवस्था केली. ज्या पत्रकारांमध्ये काहीच लक्षणे नव्हती त्यांचीही चाचणी घेण्यात आली. एकूण ५५ पैकी थोडे नव्हे २३ पत्रकार संक्रमित आढळले. या पत्रकारांची स्वईच्छा चाचणी झाली नसती तर अधिकांना ते कोरोना संक्रमित असल्याच माहित झाल नसत. मुंबईमध्ये सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत मागे असच घडल होत. यामुळे केवळ आकडेवारीवरून कोरोना विरूद्ध लढाईचे मूल्यांकन करताना चाचण्या किती झाल्या ही आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. भारतात १० लाख लोकसंख्येच्या मागे ८,५५३ चाचण्या होत आहेत. यातुलनेत यूपीत केवळ ४,९२९ चाचण्या होण कमीच मानल जाईल. याच कालवधित दिल्लीत १० लाखामागे ३९,८६३ चाचण्या झाल्या. यामुळेच दिल्लीत कोरोनाची अधिक प्रकरणे दिसणे स्वाभाविक आहे. याउलट दिल्लीतील रिकव्हरी रेट वाढण आणि एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होणं ही समाधानाची बाब आहे.
पंतप्रधानांनी मागिल शनिवारी आढावा घेताना दिल्ली सारखे प्रयत्न करण्यावर जोर देवून चांगले संकेत दिले आहेत. सर्वाधिक कोरोना प्रकरणे असलेल्या महाराष्ट्रात १० लाखामागे ११,०१२ चाचण्या, तामिळनाडुत २१,२६२ चाचण्या आणि दुसरा क्रमांक. तीस-या क्रमांकावर असणा-या दिल्लीत ४.६६ पट अधिक चाचण्या झाल्या. यातुलनेत १० लाखामागे बिहार मध्ये २५९४, उत्तरप्रदेश मध्ये ४९२९,मध्यप्रदेश ५९१२,गुजरात ६८३९, छत्तीसगड ७३०६ आणि उत्तराखंड ८४४८ चाचण्या खूप कमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेतल्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच ब्राझील सोबत तुलना करून उत्तर प्रदेशच्या यशावर खूश होणे आत्मघाती ठरेल. जर आपण कोरोनाच्या अधिकाधिक रूग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या जबाबदारी पासून पळणार असू तर कोरोनाविरूद्ध लढाई यशस्वीरित्या लढता येणार नाही. 
-सुरेश मंत्री. 


              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...