नुकतच एका शाळेतील हिंदू-मुसलमान
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गात वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.उत्तर
दिल्लीच्या महानगर पालिकेची ही शाळा आहे वजीराबाद गावातील.या शाळेतील पहिली
वर्गाच्या अ तुकडीत ३६ हिंदू आहेत तर ब तुकडीत ३६ मुसलमान.दूसरीच्या अ तुकडीत ४७ हिंदू,ब तुकडीत २६ मुसलमान आणि १५ हिंदू तर क तुकडीत ४०
मुसलमान. तीसरीच्या अ वर्गात ४० हिंदू,ब
तुकडीत २३ हिंदू आणि ११ मुसलमान,क
तुकडीत ४० मुसलमान तर ड तुकडीत १४ हिंदू आणि २३ मुसलमान.चौथीच्या अ तुकडीत ४०
हिंदू,ब तुकडीत १९ हिंदू आणि १३ मुसलमान आणि क तुकडीत
३५ मुसलमान.पाचवीच्या अ तुकडीत ४५ हिंदू,ब
तुकडीत ४९ हिंदू,क तुकडीत ३९ मुसलमान आणि २ हिंदू तर ड तुकडीत ४७
मुसलमान.शाळांचे काम असते मुलांमध्ये सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना
वाढीस लावणे.शाळांमध्येच असे प्रकार घडू लागले तर भारताचे भवितव्य काय असेल?
शाळेमध्ये विद्यार्थी तुकड्यांमध्ये
विभागले जातात ही मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे आणि ती सगळ्या शाळांमध्ये राबविली
जाते मात्र एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या धर्माच्या आधारावर तुकड्या करणे कितपत
योग्य आहे?या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सी.बी.सहरावत
यांनी दिलेले स्पष्टीकरण हास्यास्पद आहे.त्यांनी म्हटले की,आम्ही धर्माच्या आधारावर नाही तर आहाराच्या आधारावर
तुकड्या निर्माण केल्या आहेत.हा प्रशासनाचा निर्णय होता की जे सर्वात चांगल असेल
ते कराव ज्यामुळे शांती बनून राहिल.त्यांनी दिलेले हे स्पष्टीकरण पूरेशे आहे का?असजर असेल तर मग धर्माच्या नावावर नाही तर
शाकाहारी आणि मांसाहारीच्या नावावर विद्यार्थ्यांची वाटणी व्हायला हवी होती कारण
मांसाहारी मुले तर हिंदू धर्मात सुद्धा असतात.आपण कशा-कशाच्या आधारावर
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तुकड्यांत वाटणार याचा थोड थांबून विचार केला पाहिजे.
येथील लोकांचे असे
म्हणने आहे की,जेंव्हा पासून हे नविन मुख्याध्यापक रूजू झाले
आहेत तेंव्हा पासूनच अशा प्रकारे विद्यार्थ्यांची वाटणी करण्यात आली आहे.काही
लोकांनी याची तक्रार सुद्धा केली मात्र ती लिखीत स्वरूपात नाही.अनेक तुकड्या
स्पष्टपणे हिंदू-मुसलमानात स्वतंत्र वाटल्या गेल्या आहेत तर काही तुकड्यात दोन्ही
धर्माच्या मुल आहेत मात्र त्यांना स्वतंत्र गटात बसवण्यात आले आहे जेणेकरून ते
एकमेकात मिसळणार नाहीत.जरा विचार करा एवढ्या लहान वयात धर्माच्या आधारावर जर वाटणी
केली जात असेल तर अशा प्रकारच्या राजकारणाने आपले जीवन चांगले होत आहे का?
राजकारण आपल्यात सतत
फुट पाडत आहे.राजकारणी धर्माच्या नावावर एकजुट होण्याचे आव्हान करतात मात्र यांचा
उद्देश केवळ मतं मिळवण हा असतो.एक प्रकारची असुरक्षितता निर्माण करण्यासाठी हे सर्व
केले जाते.आपण जेंव्हा धर्माच्या नावावर एकजुट होता तेंव्हा घटनेने आपल्याला
दिलेल्या अधिकारांपासून स्वत:ला वेगळे करता.आपण आपल्या नागरिकत्वापासून वेगळे
होता.खरी विभागणी याच स्तरावर होते.एकदा का आपण आपल्या नागरिकतेला या धार्मिक
तत्वांच्या हवाली केले की आपल्यावर यामुळे बनलेल्या जमावाचा कब्जा होतो,ज्या जमावावर कायद्याचा कसलाच परिणाम होत नाही.असाहय
लोकांचा समूह धर्माच्या नावावर एकत्र येवून देशाचे कधीच भले करू शकत नाही,धर्माचे तर सोडूनच द्या.
आपणच सांगा की,शाळांमध्ये अशा प्रकारची विभागणी व्हायला पाहिजे
का?अशा प्रकारची विभागणी करणा-या शिक्षकाची मानसिक
तपासणी व्हायला पाहिजे ज्यामुळे कळू शकेल की,त्याच्यावर
कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे.राष्ट्रीयतेचा कोणत्या धर्माशी काहीच देणे-घेणे
नाही.जर धर्मात राष्ट्रीयता असती तर स्वत:ला हिंदू राष्ट्राचा हिंदू म्हणणारे लोक
कधीच भ्रष्ट नसते.सर्व काही प्रामाणिकपणे केले असते.हिदू-हिंदू वा
मुस्लिम-मुस्लिम केल्यानंतरही नगरपालिके पासून तहसिल पर्यंतच्या कार्यालयात भ्रष्टाचारच
करतात.हे प्रश्न धर्माच्या आधारावर सुटणार नाहीत तर नागरिक अधिकारांनी सुटतील.आपल्यावर
काही अन्याय झाला तर आपण धार्मिक संघटनांकडे जाल की कायद्याने मिळालेल्या
अधिकारांचा उपयोग कराल?यामुळेच हिंदू संघटन
असो वा मुस्लिम संघटन त्यांना धार्मिक कार्यांऐवजी राजकिय क्षेत्रात येवू दिल तर
हिच अवस्था होईल.धर्माची भूमिका जर आहे तर ती फक्त व्यक्तीगत स्तरावरच आहे.धर्मामुळे
नागरिक जीवनात नैतिकता येत नाही तर ती घटनात्मक कर्तव्यांमुळे येते.कायदा
तोडण्याच्या भीतीमुळे येते.
अगोदरच अनेक
स्वार्थी लोक या देशाचे तुकडे पाडू पाहत आहेत.शांळांचे काम असते
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची,एकजुटीची,समानतेची भावना वाढीस लावणे.शाळाच जर धार्मिक आधारावर
विद्यार्थ्यांची अशा प्रकारची विभागणी करू लागल्या तर भविष्यात देशाची अखंडता
निश्चितच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
-सुरेश मंत्री

शाळा हे शिक्षकाचे मंदिर, विदयार्थी हा दैवत व शिकवणे हे कर्तव्य आहे. पण असे शिक्षकच द्रोणाचार्यासारखे पक्षपाती व जातीवादी असतील तर देशाचे तुकडे का होणार नाहीत ? अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाI request to government to close such schools and restrict such teachers.that dangerous for our land.
उत्तर द्याहटवा