मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोनाला हलके घेवू नका.

 

    भारतातील कोरोनाचा वेग अॉक्टोंबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत मंदावला, रुग्ण संख्या घटु लागली आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जवळपास सर्व काही सुरु झाल आहे. या वातावरणात अनेकजण मात्र जणुकाही कोरोना संपला या अविर्भावात वागत आहेत. तोंडाला मास्क नाही, सॅनीटायजरचा वापर नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर नाहीच नाही. दूसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकांना कोरोनाच कसलच गांभीर्य नाही. कोरोना सारखा आजार झाल्यानंतर स्वतः सोबत कुटुंबाची काय दुरावस्था होते हे जे यातुन गेले आहेत त्यांना विचारा, नव्हे मलाच विचारा. कोरोनामुळे मी माझ्या वडिलांना कायमचा गमावून बसलो एवढच नाही तर स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकलो नाही याहुन मोठे काय दु:ख असेल? 

तो दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. ९ अॉक्टोंबरला संध्याकाळी गावाकडून डॉक्टर असलेल्या चुलत भावाचा फोन आला. त्याने वडिलांना श्वास घेण्यात अडचण येत असुन तात्काळ अॉक्सिजनची गरज असल्याच सांगितल. मी तात्काळ गावाकडे धाव घेतली आणि वडिलांना स्वाराती मध्ये घेवून आलो. त्यांचा एक्सरे काढला असता न्युमोनिया असल्याच कळाले. त्यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्याने कोरोना संशयितांच्या वार्डात अॉक्सिजनवर ठेवण्यात आल होत. त्यांच्या सोबत ती रात्र मी त्याच वार्डात काढली. त्यांचा आरटीपीसीआर अहवाल दुस-या दिवशी पॉझिटिव्ह येणार याची खात्री असली तरी मी त्यांना एकटं सोडु शकत नव्हतो. दुस-या दिवशी त्यांची अवस्था गंभीर असल्याचे मला जाणवल्याने मी त्यांना अहमदनगरला खाजगी दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला. 

                 अॅ म्ब्युलन्सने तिथे दाखल केल्यानंतर परतीच्या वाटेवर असताना मला त्यांचा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्याच कळाले पण वडिल याने घाबरतील म्हणून याची माहिती मी त्यांना दिली नाही. दूस-या दिवशी डॉक्टरांनी मला त्यांचे दोन्ही फुफ्फुस खूप संक्रमीत झाले असुन त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवल्याचे फोनवर सांगितले. जवळपास १४ दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. या १४ दिवसात मी वडिलांना तिथेच असल्याचे भासवत राहिलो, मागतील ते कोणत्या न कोणत्या माध्यमातून पुरवित राहिलो. दूसरीकडे त्यांच्यासोबत कुटुंबातील तब्बल सात जण पॉझिटिव्ह निघाले होते त्यात माझ्या आईचाही समावेश होता. परिस्थिती त्यामुळे आणखीनच गंभीर झाली असताना माझी जबाबदारी मात्र वाढली होती. ईतर सात जणांवर धारुरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते.

 १४ व्या दिवशी मात्र वडिल अहमदनगरला राहण्यास तयार नसल्याने त्यांना गावाकडे घेवून चाललो असं खोट सांगुन परत एकदा अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केलं. त्या दिवसापासून वडिल माझ्यावर नाराज होते, ते नंतर एकदाही मला फोनवर बोलले नाहीत. पूढे जवळपास ८ दिवस त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरु होते. जड अंतकरणाने मी रोज आयसीयुकडे जायचो. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारपूस करायचो. त्यांना खूप बघाव वाटायच पण ती हिम्मत माझ्यात कधीच आली नाही. त्यांचं मनोबल वाढावे म्हणून जेंव्हा - जेंव्हा शक्य होईल तेंव्हा भाच्याला पीपीई किट घालून त्यांच्या जवळ बसवलं मात्र नियतीच्या मनात काही वेगळच होत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतच गेली. 

एव्हाना मलाही हलका ताप येवू लागला होता. थोडा खोकलाही येत होता. २९  आॅक्टोंबरला माझी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्याने नाईलाजास्तव मला उपचारासाठी धारुरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हाव लागलं. मी कुटुंबातील १० वा कोरोनाबाधित होतो. माझ संपूर्ण लक्ष मात्र वडिलांकडे लागल होत. ३० अॉक्टोंबरला राञी ११ वाजता मला माझ्या वडिलांच निधन झाल्याच फोनद्वारे कळवण्यात आल. त्यांची २० दिवसांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली होती. हे २० दिवस त्यांना कुटुंबापासून एकांतात काढावे लागले होते. यादरम्यान त्यांना काय भोगावे लागले असेल याची कल्पनाच करवत नाही. शेवटी कोरोनाबाधिताच्या नशिबी उपेक्षिताच जीवन येत हेच खरं. ती रात्र मी एकट्याने जागुन काढली. अश्रु अनावर झाले होते मात्र ते कोविड सेंटर असल्याने मनसोक्तपणे रडुही शकत नव्हतो. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांचे अंत्यदर्शनही घेवु शकलो नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल? 

आज ८ दिवस झाले कोविड सेंटर मध्ये उपचार घेतोय. यादरम्यान येथील डॉक्टरांनी खूप मानसिक आधार दिला. ईथे मला ९९ वर्षांचे उपचार घेत असलेले आजोबा भेटले. त्यांना पाहून कोरोनाची बरीचशी भीती कमी झाली. आता घराची ओढ लागली आहे. घरी जाऊन मनसोक्तपणे रडायचय, भावनांना वाट मोकळी करून द्यायची आहे. म्हणून म्हणतो, कोरोनाला हलके नका घेऊ. माझ्यासारखं बिकट अवस्थेला आपल्याला सामोरे जावू लागु नये म्हणून काळजी घ्या, नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा. 

-सुरेश मंत्री. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...