मुख्य सामग्रीवर वगळा

समलैंगिकांना समाज स्विकारेल?


२०१८ चा ६ सप्टेंबर हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहायला पाहिजे. यासाठी नाही की,या दिवशी सवर्णांनी एससी/एसटी कायदयाच्या विरोधात भारत बंद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच सांगितले होते की, अनुसुचित जाती आणि जमातीच्या अत्याचार निवारण कायद्याअंतर्गत होणा-या गुन्हयात आरोपीला वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या परवानगी वा प्राथमिक तपासानंतरच अटक करता येईल मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने वटहुकुम आणला आणि अगोदरच कायदा निश्चित केला. सवर्णांना हा अन्याय वाटल्याने सरकारच्या या वटहुकुमाच्या विरोधात भारत बंद होता.
या दिवशी एकीकडे भारत बंद होता तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना समाजाची दारे उघडून दिली. अशा समाजाची ज्यात याच समाजाचा एक हिस्सा गुलाम बनून राहिला होता. नव्हे तो समाजाचा भागच नव्हता.समाजाने यांना तर कधी आपल मानलच नव्हत. समाजाला वाटत की हे निसर्गाच्या विरोधात आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला लपवून ठेवले पाहिजे. यांना तर तो समाज पाहिजे ज्यात बलात्कारी, खुनी, लुटमार करणारे आणि दुस-यांचा हक्क हिरावून घेणारी सन्मानीत पुरुष आहेत जी उच्च पदावर बसतात. यांना तर तो समाज पाहिजे जिथे जातीच्या आधारावर हे निश्चित केले जाते की, कुणी अस्वच्छतेची कामे केली पाहिजेत, कुणी खुर्चीवर बसाव आणि कुणी त्यांच्या पायाजवळ. हा तोच समाज आहे जो निसर्गाची पुजा तर करतो मात्र याच निसर्गाचा एक भाग असलेल्या समलैंगिकांबद्दल संकुचित भावना ठेवतो.या समाजाला स्त्रीवर होणारे बलात्कार दिसत नाहीत, होणारे खुन दिसत नाहीत तर याच तथाकथित समाजात अब्रु जाईल म्हणून घरातील बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीचे तोंड बंद केले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला मान्यता दिल्यानंतर सर्व काही ठिक झाल असत तर ठिकच झाल असत मात्र निर्णय आल्यानंतर सुद्धा समाजाने कायद्यापासून मुक्त झालेल्या या गटाला शिव्या द्यायला सुरुवात केली. असे शब्द लिहिले गेले जे भांडण झाल्यानंतर एक पुरुष दुस-याच्या आई-बहिणी विषयी उच्चारतो. माणूस आपल्या दु:खाने त्रस्त होत नाही तर दुस-याला सुखी बघून त्याला त्रास होतो. सवर्णांच्या भारत बंद मध्ये हे नाही दिसले की, त्यांचे दु:ख काय आहे तर हे दिसले की, त्यांना दलितांच्या सुखात दु:ख आहे. जर आपण दलितांना तुच्छ्तेच्या नजरेने बघीतले नाही तर कायदा आपले काय बिघडवेल? खुन, लुटमारी करणा-यांच्या विरोधात किती तरी कायदे बनले आहेत मात्र आपण ना लुटमार केली ना खुन तर मग आपल्याला भिती कशाची? आपण खोट्या आरोपाखाली फसवले जावू या भितीने जर हे कायदेच संपुष्टात आणण्याची मागणी करत असू तर मग खुनी आणि लुटमार करणारे सुद्धा बेलगाम होवून जातील. अशाच पद्धतीने एस्सी/एसटीचे शोषण करणारे सुद्धा बेलगाम होवून जातील त्यामुळे दलित तुच्छ असतात ही युगानुयुगे चालत आलेली समाजाची विचारधारा बदलणार नाही. त्यांना माणुस समजल जाणार नाही.
असच समलैंगिकांबद्दल आहे.जर त्यांना सामाजिक मान्यता मिळाली नाही तर त्यांना माणुस म्हणून नाही तर सर्व समलैंगिकांना तृतीयपंथी म्हणून समजल जाईल. आजही आपला मीडियासुद्धा फक्त तृतीयपंथीयांना दाखवण्यात व्यस्त असतो.टाळ्या वाजवत हाय-हाय करणा-या लोकांना दाखवल जात जेंव्हाकी समलैंगिकात गे,लेस्बियन, बायसेक्स्युअल, क्वीर सुद्धा असतात. यापैकी काही चांगल्या घरातील सुद्धा असू शकतात.शिकलेले, नौकरीपेशा लोक असू शकतात. डॉक्टर, इंजीनीअर असू शकतात मात्र यांना तर सहानुभूतीसाठी रेडलाईट भागात टाळ्या वाजवणारे तृतीयपंथीच दिसतात.
आता यांना कायद्याची मान्यता मिळाल्याने ती मोकळेपणाने जगू शकतील. आपल्या आसपास राहतील. यामुळे ही अपेक्षा जागते की, काही तरी बदलेल.नाहीतर आत्तापर्यंत आपल्या कुटुंबात तृतीयपंथीयापासून दूर रहा हेच शिकवल जायच. ते अश्लील असतात, नाराज झाले तर कपडे काढतात हेच सांगितले जायचे. एवढच काय जर कुणी मुलाने सैल--ढिल्ले कपडे घातले तर त्याला तृतीयपंथी म्हणून चिडवल जात कारण यांच्या नजरेत तृतीयपंथी ही एक शिवी आहे. तो माणुस नाही.एखाद्या मुलाच चालण बदलल,त्याचा आवाज नाजुक असला की त्याला मुलीची उपमा दिली जाते. असच काहीस मुलींच्या बाबतीतही होत.
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला मान्यता दिली आहे मात्र समाजाची विचारधारा या बाबतीत बदलणे ही दूरची गोष्ट आहे कारण आता तर कुठे देशात शौचाला कुठ बसल पाहिजे हे शिकवल जात आहे. अशात समलैंगिकतेबद्दल विचारधारा तात्काळ कशी बदलेल? जाती घटना बनल्यापासून आजपर्यंत सन्मानासाठी संघर्ष करित आहेत. या नव्या समलैंगिकांच्या जातीलाही संघर्ष करावाच लागेल. खुलेपणाने लोकात रहावे लागेल.यांच्या राहण्या, खाण्या आणि पेहरावाच्याबाबतीत अडचणी येतील मात्र घाबरण्याची गरज नाही कारण या अडचणी तर जातीच नाही तर धर्माच्या सोबत सुद्धा येत आहेत. कुठ जाती वा धर्माच्या आधारावर रहायला घर मिळत नाही. कुठ खाण्यावरून जमाव खून करतो.हा लेख एक प्रयत्न आहे. जर आपण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहात तर दुस-यांना सुद्धा सांगा.केवळ शिव्या देण्याने काहीच मिळणार नाही. त्या शिव्या देणा-याच अस्तित्व किती आहे ते दाखवतात. समोरच्याच यामुळ काहीच बिघडत नाही. स्वतंत्र रहा आणि स्वतंत्र राहु द्या. तुम्ही जे आहात ते रहा. जे बनू ईच्छीता ते बना मात्र कुणावर बंदी आणू नका.आपण ज्या समाजात जगता तो समाजही सुखी राहिल.
-सुरेश मंत्री.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...