मुख्य सामग्रीवर वगळा

नागपंचमीच्या निमित्ताने...

 

जनमानसात श्रावण महिन्याला फार मोठे महत्व आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक धार्मिक सण या महिन्यात येतात. त्यामुळे या महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. सापाचे पर्यावरणीय महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. मात्र आता केवळ सापांची पूजा करून चालणार नाही तर त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, गरजेचे आहे. 

साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो सस्तन प्राणी नाही. त्यामुळे तो लहान असताना सुद्धा दूध पीत नाही. त्यामुळे दूध हा त्याचा आहार नाही. तो दूध पितो असे म्हणणे खोटे आहे. दूध पचविण्यासारखी त्याची पचनसंस्था बनलेली नसते. हळद, पिंजर या गोष्टीही सापाच्या कातडीसाठी मारक ठरू शकतात. त्यामुळे सापाची पूजा करताना या गोष्टी करू नयेत. जिवंत सापाची पूजा करणे टाळावेच.

साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे म्हणतात. त्याचे कारण साप उंदीर, घुशी खाऊन पिकाची नासाडी रोखतात. उंदीर आणि त्याच्या कुटुंबातील प्रजातींची संख्या खूप वेगाने वाढते. त्यामुळे त्यांना नियंत्रित करणे फार जिकिरीचे काम असते. त्यासाठी सापाचे असणे फार महत्वाचे आहे. साप हा फक्त शेतकऱ्याचा मित्र नसून पूर्ण मानवजातीचा मित्र आहे. आजच्या घडीला मानवाचे आजार दूर करण्यासाठी तयार केलेल्या बहुतेक औषधांमध्ये सापाचे विष वापरतात. अल्प प्रमाणात हे जालीम विष मानवाला पुनर्जीवन देऊ शकते. त्यामुळे साप हा उपयुक्त प्राणी आहे. 

एरवी दिसला साप की उचलली काठी, अशी आपली मानसिकता असते. आपल्या देशात सर्पाच्या सुमारे ३००  हून अधिक जाती आहेत. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चारच जाती विषारी आहेत. हे साप ओळखू न आल्याने माणूस सापाला घाबरतो व लगेच त्याला मारण्याचा पावित्रा घेतो. पण साप आपणहून कधीच चावत नाही. चुकून त्याच्यावर पाय पडला तरच तो आत्मसंरक्षणासाठी चावा घेतो. 

कुणाच्याही घरी किंवा परिसरात साप निघाला की तातडीने सर्पमित्रांचे फोन नंबर शोधून संपर्क करावा. सर्पमित्र तेथे धावून जातात आणि साप पकडून नागरिकांची भीती दूर करतात. सापांचा आणि लोकांचा जीव वाचण्याचे कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पमित्र करित असत्तात. अनेकदा साप पकडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी होत होती. याची दखल घेवून शासनाने सर्पमित्रांना “फ्रंटलाईन वर्कर” म्हणून घोषित केले आहे. राज्यातील सर्पमित्रांना आता १० लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात शिफारस केली आहे. यासोबतच राज्य सरकारकडून सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार असून आणि त्यांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत देखील होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 -सुरेश मंत्री. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...