मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे पुस्तक : शाळा एके शाळा

  द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड येथे कार्यरत असणारे सहशिक्षक श्री. माधव अरूणराव डाके लिखित 'शाळा एके शाळा' ही लघुकादंबरी. पुस्तकाच्या शिर्षकावरूनच हे पुस्तक शिक्षणक्षेत्राशी संबंधित असल्याचे लक्षात येते. माधव डाके हे स्वत: शिक्षक म्हणून एका शाळेत काम करत असल्याने शिक्षण संस्था, संस्थाचालकांचा शाळेच्या प्रगतीबद्दलचा दृष्टीकोन, मुख्याध्यापकाला संस्था व शिक्षक यामधील दुवा म्हणून काम करीत असताना प्रशासन चालवताना करावी लागणारी कसरत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे मनोभाव यांचे त्यांनी जवळून निरीक्षण केलेले असल्याने ही कादंबरी लिहीताना त्यांनी शिक्षणक्षेत्राच्या वास्तविकतेशी सांगड घातली आहे.  पुस्तकास पत्रकार, साहित्यिक स्वर्गीय प्रा. एकनाथ आबुज यांची प्रस्तावना लाभलेली असून ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे यांचा शुभेच्छा संदेश आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि बोलके आहे. एक चांगला मुख्याध्यापक उत्तम शिक्षक असतोच असे नाही तसेच एक चांगला शिक्षक चांगला मुख्याध्यापक बनु शकतोच असे नाही असे म्हटले जाते. एक चांगला मुख्याध्यापक शाळेला केवळ एक इमारत नाही, तर एक समुदाय ...

महाराष्ट्र भूषण : अशोक सराफ

 ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला आहे. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली आहे. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिर...

ज्येष्ठ अभिनेत्रीचा उचित सन्मान

भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. वहिदा रहमान यांनी ६०–७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. इतकंच नाही तर, वहिदा यांनी १९६४ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडिने बघतात. अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान असून, त्यांनी अनेक चित्रपटात बिग बींच्या आईची भूमिका साकारली आहे. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’ पासून ‘गाईड’ पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत. नेमकं देव आनंद यांच्या वाढदिवशी वहिदा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा झाली याचा आनंद स्वतः वहिदा यांनी व्यक्त केला.                    वहिदा यांचा जन्म जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात एका उच्चविभूषीत मुस्लीम कुटुंबा...

भारत-कॅनडा मधील वाढता तणाव

 मागच्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले होते. खलिस्तानी समर्थकांना कॅनडामध्ये आश्रय दिला जातो, हे दोन्ही देशातील संबंध बिघडण्यामागच मुख्य कारण आहे. आता दोन्ही देशातील तणाव टिपेला पोहोचला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी २० परीषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले होते. कॅनडाला पोहोचल्यावर त्यांनी भूमिका बदली असून भारता विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी संघटना खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकऱणी मोठं विधान केलंय. जस्टीन ट्रुडो यांनी सांगितलं की, भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांच्या कनेक्शनचा तपास देशाच्या सुरक्षा संस्था करत आहेत. ओटावात हाउस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना जस्टीन ट्रुडो म्हणाले की, कॅनडाची सुरक्षा संस्था भारत आणि निज्जरच्या हत्या प्रकरणाचे कनेक्शन आहे का याचा वेगाने तपास करत आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की कॅनडा आपल्या भूमीवरुन खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यात अपयशी ठरला आहे. इतकंच नाही तर त्यांना उघडपणे पाठिंबाही दिला आहे. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपा...

'एक देश एक निवडणूक' किती व्यवहार्य

  केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यामुळे या विशेष अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची योजना असं या प्रस्तावाचं स्वरूप आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक याबाबतची चर्चा समोर आली होती. त्यानंतर वारंवार याबाबत चर्चा होत राहिल्या. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे याचबाबतचा अध्यादेश सरकार आणण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणूका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. देशात एकाच वेळी निवडणूका घेण्याचं समर्थन करणा-यांनी दिलेली कारणे आणि खरंच ही कारणे व्यवहार्य आहेत का याचा आढावा घेणारा हा लेख. देशात १९५१-५२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तिच्या बरोबरच सर्व राज्यांमध्ये त्य...

इतिहास घडला... चंद्र कवेत आला

२३ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताचे चांद्रयान-३ मिशन संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँड झालं. चांद्रयान-३ लँड होण्याच्या काही दिवसांआधी रशियाचं लुना-२५ हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं. रशियाची मोहिम अपयशी ठरली. जे रशियाला जमलं नाही ते भारताने करून दाखवल. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली... श्वास रोखले गेले... हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले... आणि बातमी आली... चांद्रयान-३ मोहीम फत्ते झाली... प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले... आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले... "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे"; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. त्यामुळे हा क्षण फक्त भारताच्याच नाही तर, अखंड जगाच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे. १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वी...

भरड धान्य : काळाची आवश्यकता

संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील ७० हून अधिक राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्वीकारला गेला. शाश्वत शेतीमध्ये भरड धान्याची महत्त्वाची भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपरफूड म्हणून त्याचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात त्यामुळे मदत होईल. भरड धान्ये सुमारे १३१ देशांमध्ये घेतली जातात. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे ६० कोटी लोकांचे हे पारंपरिक अन्न आहे. आशियातील ८० % पेक्षा जास्त भरड धान्याचे उत्पादन भारतात होते. १७० लाख टनांहून अधिक उत्पादनासह भारत भरड धान्याचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे.                                                                              ज्वारी , बाजरी , नाचणी , भगर , राळ ,...