मुख्य सामग्रीवर वगळा

देशातील उच्च शिक्षणाची अवस्था वाईट

अस वाटत आहे की,देशातील उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे वाईट दिवस आले आहेत.उच्च शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याची चर्चा मागिल पाच वर्षापासून सूरू आहे मात्र कोणत्याही सरकारने यासाठी काहीच केले नाही.आता देशातील उच्च शिक्षण पूर्णपणे ध्वस्त झाले आहे.काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाची सर्वात मोठी नियामक संस्था ऑल इंडिया कांउसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (एआईसीटीई) ने निश्चित केले आहे की,ज्या इंजिनियरिंग महाविदयालयांमध्ये मागिल ५ वर्षात ३० टक्के पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत अशी महाविदयालये बंद करण्यात येतील.
सध्या देशभरात एआईसीटीईशी संलग्न १०,३६१ इंजिनियरिंग महाविदयालय आहेत ज्यात ३,७०१,३६६ जागा आहेत.या ३७ लाख जागांपैकी २७ लाख जागा खाली आहेत.निश्चितच ही आकडेवारी खूप भयावह आहे. एआईसीटीईने सुरवातीला ना काही विचार करता,ना गुणवत्तेची चिंता करता देशात हजारो इंजिनियरिंग महाविदयालयांना परवानगी देवून टाकली आणि विना मागणी आणि पूरवठा या तत्वाचा व रोजगाराचा विचार करता एवढया मोठया प्रमाणावर जागा निर्माण केल्या.आता या जागाच भरत नसल्याने एआईसीटीई चिंतीत झाले आहे.
व्यावहारिकतेपासून दूर-
प्रश्न हा आहे की एआईसीटीईने सुरवातीलाच स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?जेंव्हा तंत्रज्ञान शिक्षणाचा दर्जा ढासळत होता,तेंव्हा तिने काही ठोस पाऊले का उचलली नाहीत.या संस्थेला हे माहीत नव्हते का की,एवढया मोठया प्रमाणावर जागा रिक्त राहणे आणि महाविदयालये बंद होण्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडू शकतो.हि सत्यता आहे की,देशातील उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाचा पाया २०१० पासूनच ढासळायला सूरूवात झाली होती.तीन वर्षांपूर्वी देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आशा होती की,ही परिस्थिती बदलेल मात्र असं काहीच झाल नाही.सरकार बदलली मात्र शिक्षणाच्या बाबतीतली नीती तीच राहिली.आता तर परिस्थिती अशी बनली आहे की,तिला सुधारणे खूपच कठिण दिसत आहे.यावर्षी तर आईआईटी मध्ये सुद्धा विदयार्थ्यांची रूची कमी दिसत आहे.२०१७-१८ मध्ये सूरू झालेल्या बॅचमध्ये १२१ जागा रिक्त राहिल्या आहेत.मागिल चार वर्षात आईआईटी मध्ये ईतक्या रिक्त जागा कधीच राहिल्या नाहित.जाणकारांचे असे म्हणणे आहे की,या जागा रिक्त राहण्यामागे मनाजोगे महाविदयालय न मिळणे हे सुद्धा कारण आहे.
देशात स्किल इंडियाचा जोरात प्रचार सूरू असताना सुद्धा अकुशल आणि बेरोजगार लोकांची संख्या वेगाने वाढत आहे.नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात कौशल्य विकास मंत्र्यांना त्यांच्या निष्क्रीयपणामुळे हटवले गेले.मात्र कोण आले आणि कोण गेले यामुळे काय फरक पडतो?जेंव्हा शैक्षणिक नीतीच ठिक नाहीत तेंव्हा फक्त योजना बनवून काय फायदा?

सध्या जी परिस्थिती आहे त्यावरून असे वाटते की,उच्च शिक्षणाची अवस्था आणखिनच वाईट होईल.आज इंजिनियरिंगच नाही तर मॅनेजमेंटचीही अवस्था वाईट आहे.एका ताज्या सर्व्हेनूसार देशातील २० एमबीए संस्था सोडून अन्य संस्थापैकी फक्त ७ टक्के विदयार्थी नौकरी मिळवण्यासाठी पात्र आहेत.२००७ मध्ये झालेल्या अशा सर्व्हे मध्ये २५ टक्के तर २०१२ मध्ये २१ टक्के एमबीए पदवी धारक विदयार्थ्यांना नौकरीसाठी पात्र समजले गेले होते.
             नियामक संस्था आणि केंद्र सरकारचे सर्व लक्ष काही खास सरकारी संस्थावरच असते,मात्र देशभरातील ९० टक्के युवक खासगी विदयापिठे आणि महाविदयालयात शिक्षण घेवून बाहेर पडतात.या ९० टक्के युवकांवर येणारे कोणतेही संकट संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत सामाजिक स्थितीला सुद्धा हानिकारक असेल.विकसित भारताचे स्वप्न फक्त आईआईटी आणि आईआईएमच्या आधारावर पूर्ण होवू शकत नाही.
खरं तर आपण ही गोष्ट समजण्यास खूप वेळ केला आहे की,शैक्षणिक शिक्षणासारख बाजाराच्या मागणीनूसार उच्च गुणवत्ता असणारे कौशल्य शिक्षण देणे गरजेचे आहे.आशियाची आर्थिक महाशक्ती दक्षिण कोरियाने जर्मनीलाही मागे टाकून हे करून दाखवले आहे.१९५० मध्ये दक्षिण कोरियाची औदयोगिक अवस्था भारतापेक्षा चांगली नव्हती.यानंतर मात्र त्याने कौशल्य विकासात गुंतवणूक करायला सूरूवात केली आणि १९८० च्या आसपास ते उदयोगाचे मोठे केंद्र बनले.
आज दक्षिण कोरियाची ९५ टक्के कार्यशक्ती कौशल्यप्राप्त आहे वा व्यावसायिक प्रशिक्षित आहे.या तुलनेत भारताचा आकडा फक्त ३ टक्के आहे.अशात भारत आर्थिक महाशक्ती कसा बनू शकतो?देशात इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट महाविदयालयांची संख्या सतत वाढली मात्र त्यांची गुणवत्ता मात्र काही वाढली नाही.उदयोगांच्या बदलत्या मागणीनूसार त्यांच्या अभ्यासक्रमातही आवश्यकतो बदलही केला गेला नाही.आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,स्किल इंडिया शिवाय मेक इन इंडियाचे स्वप्न कधीच पूर्ण होवू शकत नाही.एवढया मोठया युवक लोकसंख्येचा लाभ अधिकाधिक उठवण्यासाठी भारताला कौशल्याधिष्ठित व्हायला पाहिजे.जर विदयार्थी कुशल झाले तर त्यांना रोजगार मिळेल आणि उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणावरिल संकट तेंव्हाच दूर होवू शकेल.
 मागणी आणि पूरवठा –
आज यूजीसी आणि एआयसीटीईला विचारले गेले पाहिजे की त्यांच्याकडे मॅनेजमेंट आणि इंजिनियरिंग पदवीधारकांची वर्तमान आणि भावी मागणीच्या संदर्भात काही विश्वसनिय आकडेवारी आहे का?आशा आहे की,भविष्यात नविन तंत्रज्ञान महाविदयालय आणि विदयापिठे खोलताना या गोष्टीचा विचार केला जाईल की,एमबीए, इंजिनियरिंग,फार्मसी,मेडिकल आणि डेंटल शिक्षणाच्या अभ्यासक्रमातील मागणी आणि पूरवठा यातील संतुलन राहिल.या गोष्टीचे प्रभावीपणे विश्लेषण केंद्रीय मानव संसाधन आणि विकास मंत्रालय आणि देशातील प्रमुख नियामक संस्थांना करावे लागेल कारण देशात उच्च शिक्षणाच्या बाबतीत सध्या जे संकट आहे त्यामागे नियामक संस्था प्रभावीपणे काम करत नाहीत हेही एक कारण आहे.जर त्यांनी सूरूवातीलाच उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित केली आसती तर आज देशाला उच्च शिक्षणाचे संकट झेलावे लागले नसते.
-सुरेश मंत्री


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...